एक्स्प्लोर

जरांगेंचं मुंबई आंदोलन रोखण्यासाठी मीरा रोड प्रकरण घडवण्यात आले; जलील यांचा आरोप

Imtiyaz Jaleel : मराठा आंदोलकांनी मुंबईत (Mumbai) येऊ नयेत यासाठी मीरा रोडची घटना घडवण्यात आल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. 

Mumbai Meera Road:  संपूर्ण देशात अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्ताने उत्सवाचं वातावरण असतानाच, मुंबईतील मीरा रोडच्या (Mira Road Tension) नया नगर (Naya Nagar) परिसरात दोन गटात हाणामारी झाल्याची घटना समोर आली होती. दरम्यान, या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण देखील तापतांना पाहायला मिळत आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली असून, मीरा रोडवरील घडलेली घटना जाणीवपूर्वक घडवण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याकडून करण्यात येत असलेल्या शांतेतील आंदोलन रोखण्यासाठी आणि मराठा आंदोलकांनी मुंबईत (Mumbai) येऊ नयेत यासाठी ही घटना घडवण्यात आल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. 

मीरा रोडच्या नया नगर परिसरात दोन गटाच्या रॅली निघाल्या होत्या. या दोन रॅली आमनेसामने आल्यानंतर बाचाबाची झाली त्यांनी परिसरात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. या घटनेचे व्हिडिओ समोर आल्यावर भाजप आमदारांनी कारवाईची मागणी केली होती. तर, कारवाई होणारच असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. मात्र, यावरून जलील यांनी पोलिसांसह सत्ताधारी नेत्यांवर निशाणा साधला आहे. तर, मनोज जरांगे यांची आरक्षण यात्रा मुंबईत येऊ नयेत यासाठी अशा घटना घडवल्या जात असल्याचे जलील म्हणाले आहेत. 

काय म्हणाले जलील...

इम्तियाज जलील यांनी याबाबत ट्वीट करत म्हटले आहे की,“ मीरा रोडची घटना म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचे शांततापूर्ण सुरु असलेल्या आंदोलनाचा मुद्दा दुसरीकडे वळवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येत आहे. लाखो मराठ्यांनी मुंबई गाठू नयेत अशी सरकारची इच्छा आहे. त्यामुळे जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर, अशावेळी मुस्लिमांना शस्त्र म्हणून वापरण्याची त्यांची जुनी रणनीती आता पुन्हा वापरली जात आहे. या घटनेत दंगलखोरांवर कोणतेही कारवाई न करता, पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत होते. मीरा रोड हा संवेदनशील परिसर असून, तेथे अपेक्षित व्यवस्था का करण्यात आली नाही. सी ग्रेडच्या नेत्यांना द्वेषपूर्ण वक्तव्ये करून वातावरण बिघडवण्याची परवानगी का दिली जात आहे?, हिंसाचाराच्या घटनांवर कारवाई झाली पाहिजे. पोलिसांनी राजकीय दबावाला बळी पडू नयेत आणि प्रामाणिकपणे आपले काम करावे. तर, महाराष्ट्र शांत राहावा अशी आमची इच्छा असल्याचे जलील म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या: 

मीरारोडमध्ये दोन गटात मिरवणुकीदरम्यान वाद, वाहनांची तोडफोड; सध्या परिस्थिती नियंत्रणात

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Maharashtra Dam Water Storage: राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Maharashtra Dam Water Storage: राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
100 ISRO Scientists Quit Their Jobs: अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
Embed widget