एक्स्प्लोर

भाजपच्या चाणक्यांनी कसा गेला गेम, असा राबवला भाजपचा प्लॅन बी?

महाराष्ट्राच्या सत्ताकारणात नेमके कुठले चाणक्य भारी पडतायत...शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार बनवतायत म्हटल्यावर भाजपचे चाणक्य पराभूत झाले अशी टीका सुरु असतानाच एका रात्रीत सगळा खेळ बदलला..पाहुयात काय घडलं नेमकं पडद्यामागे..

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्ताकारणात नेमके कुठले चाणक्य भारी पडत आहेत. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार बनवतायत म्हटल्यावर भाजपचे चाणक्य पराभूत झाले अशी टीका सुरु असतानाच एका रात्रीत सगळा खेळ बदलला. महाराष्ट्रासारख्या राज्यात भाजपला सत्तेबाहेर करण्याचे प्रयत्न सुरु असताना मोदी-शाह गप्प का आहेत? याचं उत्तर अखेर आज मिळालं. शिवसेना ही काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत सरकार बनवण्याच्या चर्चेत मग्न असताना अचानक भाजपनं आपला प्लॅन बी समोर आणला आणि सकाळी सकाळी महाराष्ट्राला बातमी मिळाली ती देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याची. भाजपचं दिल्ली हायकमांड गेल्या काही दिवसांत कशी पावलं टाकत होते ते पाहुयात. महाराष्ट्राच्या निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबरला लागला. त्यानंतर 10 दिवसांनी म्हणजे 4 नोव्हेंबरला मुख्यमंत्री दिल्लीत आले. महायुतीचंच सरकार येणार असं निकालानंतर ठासून सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच पत्रकारांशी बोलताना नवीन सरकार असा शब्द प्रयोग केला. त्या दिवशी ते अमित शाह यांना भेटून आले होते. विशेष म्हणजे याच दिवशी अजित पवारही दिल्लीत होते. याच दिवशी शरद पवार-सोनिया गांधींची भेट घेणार होते, त्यासाठी सोबत म्हणून अजित पवार आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या दिवशी संध्याकाळी साडेपाच वाजता दिल्लीतून निघणार होते, पण नंतर त्यांचा मुक्काम रात्री 11 पर्यंत लांबला. दरम्यानच्या काळात काही महत्वाच्या घडामोडी घडल्या असणार यात शंका नाही. महाराष्ट्राच्या निकालानंतर अमित शाह गप्प होते. पण एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आव्हान केलं, ज्यांच्याकडे 145 चा आकडा आहे त्यांनी सरकार बनवावं. अमित शाह ज्या शैलीत हे बोलत होते, ते पाहता त्यात एक गंभीर आव्हान दडलेलं होतं. शिवसेनेला सरकार स्थापनेचा प्रयत्न करु न देता भाजपला दुसऱ्या कुणासोबत सत्ता स्थापन करता आली असतीच. पण त्यांनी तसं केलं नाही. कारण शिवसेनेला एक्सपोझ करण्यासाठी थोडं पुढे जाऊ देणं आवश्यक होतं. मुख्यमंत्रिपदासाठी प्रसंगी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जुळणी करायला सेनाही तयार आहे हे दाखवून सेनेला उघडं पाडायचा अमित शाहांचा प्लॅन असावा. आज जे काही घडलंय, त्यात सगळ्यात मोठं गूढ आहे. ते पंतप्रधान मोदी-शरद पवार यांच्या भेटीचं. महाराष्ट्रातल्या ओल्या दुष्काळाचं कारण देत ही भेट झाली. पण त्यात महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल चर्चा झाली हे नक्की. भाजपच्या प्लॅन बी ची कुणकुण पवारांना लागल्याशिवाय ही भेट झाली असेल यात काही शंका नाही. पण या भेटीनंतर महाविकास आघाडीच्या सगळ्या चर्चा वेगानं झाल्या. अगदी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर सहमती झाली असं पवार जाहीरपणे म्हणाले. त्यामुळे पवार खरंच अंधारात होते की अजित पवारांना नादी लावू नका हे त्यांचं सांगणं धुडकावत मोदी-शाहांनी आपला प्लॅन तडीस नेला याचं उत्तर भविष्यात कळेल. शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढून, भाजपनं आता आपल्या शत प्रतिशतचा मार्ग मोकळा केला आहे. त्यात हे करताना सेनेकडे नैतिक बळ राहणार नाही यासाठी थोडासा वेळ घेऊन हे ऑपरेशन तडीस नेलंय. आता विधानसभेतल्या बहुमत चाचणीत काय नवे डावपेच खेळले जातात हे पाहणे महत्वाचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 20 August 2026: आजचा श्रावणी गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत शुभ योग जुळले, दत्तगुरू कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत शुभ योग जुळले, दत्तगुरू कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
Pratap Sarnaik Warning : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget