एक्स्प्लोर

मांजरा नदी संवाद यात्रेचा बीड जिल्ह्यात समारोप, उद्यापासून लातूर जिल्ह्यात होणार मांजरा नदीचा जागर

Beed: आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून राज्यातील 75 नद्या यांची संवाद यात्रा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि या यात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी वर्धेच्या सेवाग्राम मधून केला.

Beed: आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून राज्यातील 75 नद्या यांची संवाद यात्रा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि या यात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी वर्धेच्या सेवाग्राम मधून केला. याचाच एक भाग म्हणून मांजरा नदीचे संवाद यात्रा मागच्या आठवड्याभरापासून सुरु झाली. बीड जिल्ह्यातील गोवळवाडी येथून मांजरा नदीच्या उगम स्थानापासून सुरू झालेली ही मांजरा संवाद यात्रा आपला आठ दिवसाचा बीड जिल्ह्यातील प्रवास करून आज या प्रवासाची सांगता झाली. उद्या मांजरा नदी संवाद यात्रा ही लातूर जिल्ह्यात पोहोचेल आणि तिथून पुढे कर्नाटक आणि तेलंगणा असा प्रवास करेल.

बिड जिल्ह्यातील चला जाणूया मांजरा नदीला अभियानाचा समारोप अंबाजोगाई तालुक्यातील देवळा या गावी झाला. पाटोदा तालुक्यातील गवळवाडी येथून निघालेले चला जाणूया नदीला अभियान पुढे लातूर जिल्ह्यात जाणार आहे. देवळा येथे बिड जिल्ह्यातील अभीयानाचा समारोप चला जाणूया नदीला अभियानाचे राज्य समिती सदस्य अनिकेत लोहिया, मानवलोकचे  सहकार्यवाह लालासाहेब आगळे, गावचे सरपंच रावसाहेब यादव , इन्फंट इंडियाचे दत्ता बारगजे, ग्राम पंचायत सदस्य,ग्रामसेवक, नदीयात्री, कृषी विभागाचे सूर्यकांत वडखेलकर, राजाराम बन, वनविभागाचे कस्तुरे व इतर अधिकारी कर्मचारी, गावातील  मुख्याध्यापक, शिक्षक शालेय विद्यार्थी, महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.यावेळी गावातील महिलांनी जल कलशाचे पूजन केले. गावकऱ्यांनी मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ, शाल श्रीफळ देऊन केले. त्यानंतर शाहीर सुधाकर देशमुख,राजू शेवाळे यांच्या नदीचा गोंधळ सादर करून जनजागृती केली.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मानवलोकचे  सहकार्यवाह लालासाहेब आगळे यांनी केलं ते म्हणाले की, आपण दैनंदिन जीवन जगताना अनेक भाषा बोलत असतो. पण या पलीकडे निसर्गाची एक भाषा असते ती आपण समजून घेतली पाहिजे, उंच डोंगर हे माणसाने ध्येय उच्च ठेवावे हे सांगतात. खोल दऱ्या कधी कधी समोरच्या माणसांच्या मनातील खोल दुःख, वेदना ओळखाव्यात आणि त्या दूर करण्यास मदत करावी हे सांगतात, पक्षी प्राणी मुक्तपणे विहरावे जीवनाचा आनंद घ्यावा हे सांगत असतात. नदीचं निळशार पाणी आपल्याला मानवाने कुणाचाही द्वेष न करता इतरांच्या नितळपणे उपयोगी पडावे, अशी आपल्या अबोल भाषेतून सांगत असतात. त्यामुळे ही निसर्गाची भाषा समजून घेतल्यास आपल्याकडून निसर्गाला धक्का पोचणार नाही, असे सांगितले.

तर  चला जाणूया नदीला अभियानाचे राज्य समिती सदस्य अनिकेत लोहिया यावेळी म्हणाले की, महाराष्ट्रातील गोदावरी, कृष्णा, भीमा, अशा मोठ्या नदीच्या यादीत मांजरा नदीचा समावेश होतो. पण लातूर शहराला पाणी पुरवठा करणारे  मांजरा धरण जेंव्हा कोरडे पडले आणि लातूर शहराला रेल्वेने पाणी आणावे लागले तेंव्हा मांजरा नदी चर्चेत आली. अशा मांजरा नदीचा उगम आपल्या बिड जिल्ह्यात होऊन ती सातशे हून अधिक किलोमिटर वाहत जाते. शंभर मोठी शहरे आणि हजारो खेड्यांची तहान लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली आणीत ती हा प्रवास करते. आपण या नदीचे लाभधारक आहोत. हिच्या वाहण्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात समृद्धी आली आहे.

नदी, नीर, नारी यांचा ज्या समाजात पावित्र्य राखले जाते,  तो समाज सुसंस्कृत समजला जातो. त्यामुळे अशा जीवनदायिनी नदीची आजची स्थिती काय आहे. तिला सतत वाहत कसे ठेवता येईल तिला अमृत वाहिनी कसे करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी ही चला जाणूया नदीला अभियान राबवण्यात येत आहे. खते आणि कीटकनाशके यांच्या अती वापरामुळे, नद्यात सोडण्यात येणाऱ्या सांडपाणी, टाकण्यात येणाऱ्या राडारोडा, कचरा यामुळे नद्या दूषित होत आहेत. अशा प्रदूषित नद्यातिल पाणी पिण्यासाठी वापरल्याने मानवाचे आरोग्य बिघडत आहे. त्यामुळे नद्यांच आरोग्य जर उत्तम राहील तर मानवी आरोग्य सुदृढ राहील हे लक्षात घेतलं पाहिजे. आज बिड जिल्ह्यातील यात्रेचा समारोप असेही लोहिया म्हणाले. नदी यात्रे विषयीची चित्रफीत यावेळी गावकऱ्यांना चित्ररथाद्वारे दाखवण्यात आली.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case: आम्हाला कागदपत्र देत नाहीत, सरकारी पक्षाकडूनच दिरंगाई; उज्वल निकम अन् आरोपींच्या वकिलामध्ये खडाजंगी, कोर्टात नेमकं काय घडलं?
आम्हाला कागदपत्र देत नाहीत, सरकारी पक्षाकडूनच दिरंगाई; सरपंच संतोष देशमुख प्रकरणात उज्वल निकम अन् आरोपींच्या वकिलामध्ये खडाजंगी, कोर्टात नेमकं काय घडलं?
Dhananjay Munde: महादेव मुंडेंना धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून संपवलं, राजाभाऊ फड यांच्या आरोपावर मुंडे समर्थकांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
महादेव मुंडेंना धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून संपवलं, राजाभाऊ फड यांच्या आरोपावर मुंडे समर्थकांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
बीडमध्ये दुचाकी चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश, 7 दुचाकींसह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त, तीन आरोपींना अटक 
बीडमध्ये दुचाकी चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश, 7 दुचाकींसह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त, तीन आरोपींना अटक 
बीडमध्ये भीषण अपघात, धुळवड साजरी करायला निघालेल्या कारच्या कोलांटउड्या; 1 ठार तीन जखमी
बीडमध्ये भीषण अपघात, धुळवड साजरी करायला निघालेल्या कारच्या कोलांटउड्या; 1 ठार तीन जखमी

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू
Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Budget 2026: देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
Maharashtra Budget 2026 : मेट्रो मार्गांचं जाळं वाढवणार, द्रूतगती मार्गांची उभारणी ते शेतकरी कर्जमाफी आणि स्टार्टअप हब, देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
विकसित महाराष्ट्राच्या दिशेनं पाऊल, मेट्रोचा विस्तार, द्रूतगती मार्गांची उभारणी ते कर्जमाफी, अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा
Maharashtra Budget 2026: गावांना कॉंक्रिट रस्त्याने जोडणार ते पशूधन ते शेतपाणंद; शेतकरी, ग्रामीण महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पातील 5 मोठ्या घोषणा
गावांना कॉंक्रिट रस्त्याने जोडणार ते पशूधन ते शेतपाणंद; शेतकरी, ग्रामीण महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पातील 5 मोठ्या घोषणा
Aaditya Thackeray: राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
अमेरिकेची रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची परवानगी; राहुल गांधींचा ससंदेतील शब्द खरा ठरल्याची चर्चा; म्हणाले, 'हे देशाचं 'धोरण' नाही, ते तडजोड करणाऱ्या व्यक्तीच्या शोषणाचा परिणाम'
अमेरिकेची रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची परवानगी; राहुल गांधींचा ससंदेतील शब्द खरा ठरल्याची चर्चा; म्हणाले, 'हे देशाचं 'धोरण' नाही, ते तडजोड करणाऱ्या व्यक्तीच्या शोषणाचा परिणाम'
Karnataka Social Media Ban : 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदीचा प्रस्ताव, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदीचा प्रस्ताव, कर्नाटकचं मोठं पाऊल
Maharashtra Budget 2026 Live Updates : शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
Share Market Fall : शेअर बाजार एका दिवसाच्या तेजीनंतर पुन्हा घसरला, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला,निफ्टीत घसरण
शेअर बाजार एका दिवसाच्या तेजीनंतर पुन्हा घसरला, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला,निफ्टीत घसरण
Embed widget