एक्स्प्लोर

Business Idea: काय म्हणता 'या' हॉटेलमध्ये आई-वडिलांसोबत आलेल्या मुलांना मिळते फुकट जेवण

हॉटेलमध्ये ग्राहकांची गर्दी वाढवण्याकरीता हॉटेल व्यावसायिकाचा भन्नाट उपक्रम.

Business Idea: आपल्या विशेष जेवणामुळे अनेक हॉटेल ओळखल्या जातात. तर काही हॉटेल भन्नाट अशा आगळ्यावेगळे उपक्रम राबवून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. औरंगाबादमध्ये अशीच एक हॉटेल असून, या हॉटेल मालकाने ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर ठेवली आहे. हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या आई-वडिलांसोबत असलेल्या मुलांना पोटभर फुकट जेवण दिले जाते. 

औरंगाबाद-कन्नड रस्त्यावरील टोलनाक्या पुढील शिवराई फाट्याजवळ सद्गुरू कृपा हॉटेल लागते. अनिल बाबुराव वायडे असे या हॉटेलच्या मालकाचे नाव आहे. सुरवातीला छोटीशी नाश्त्याची हॉटेल सुरु करणाऱ्या वायडे यांनी दहा वर्षांपूर्वी डाळबट्टी बनवायला सुरवात केली. पाहता-पाहता त्यांचा व्यवसाय एवढा वाढला की, आज दिवसभरात 1 क्विंटल बट्टी आणि 50 किलो डाळीचे 200 लिटर वरण दिवसभरात लागते. पण यापेक्षा त्यांच्या जबरदस्त ऑफरमुळे येथे ग्राहकांची नेहमीच गर्दी पाहायला मिळते. कारण जेवणासाठी आलेल्या कुटुंबातील आई-वडिलांसोबत आलेल्या मुलांच्या जेवणाचे ते पैसे घेत नाही. त्यामुळे लोकं कुटुंबासोबत जेवण्यासाठी येथे नेहेमीच पसंती देताना पाहायला मिळतात. 

यामुळे देतात मुलांना मोफत जेवण... 

आपल्या हॉटेलमध्ये आलेल्या मुलांना जेवण मोफत देण्यामागचं कारण सांगताना अनिल वायडे म्हणतात की, बऱ्याच दा जेवणासाठी आलेल्या महिला थाळीचे जास्त पैसे लागतील म्हणून मुलांसमोर थाळी लावू देत नाही. त्यामुळे त्यांचही जेवण व्यवस्थित होत नाही. तर बऱ्याचवेळा सगळ्याच्या थाळीचे पैसे लागतील म्हणून निघून जातात. त्यामुळे आई-वडिलांसोबत असलेल्या लहान मुलांचे आपण पैसे न घेण्याचा आपण निर्णय घेतल्याच वायडे सांगतात. तसेच यामुळे आई-वडील सुद्धा निवांत जेवण करतात असेही वायडे म्हणाले. 

असा असतो मेनू... 

वायडे यांच्या हॉटेलमध्ये शाकाहारी जेवण मिळते. ज्यात गरमा-गरम डाळबट्टीचा समावेश आहे. चार प्रकारच्या डाळी, जिरा, मोहरी,अद्रक-लसूण अस सर्व मिळून वरण बनवले जाते. सोबतच शिरा, तरी,हिरवी मिरची आणि लिंबू कांदा सोबतीला असतो. 80 रुपयात पोटभर डाळबट्टी तुम्ही इथं खाऊ शकतात. त्यामुळे या हॉटेलमध्ये नेहेमीच गर्दी पाहायला मिळते.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget