एक्स्प्लोर

Aurangabad: 'नामांतराच्या विरोधात रस्त्यावर उतरणार'; जलील यांच्या नेतृत्वाखाली झाली सर्वपक्षीय बैठक

Aurangabad Renamed: जलील यांनी बोलावलेल्या बैठकीत नामांतराच्या निर्णयाविरोधात आवाज उठवत, न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार करण्यात आला.

Aurangabad News: गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाता-जाता नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे नामांतराचा मुद्दा आणखीनच तापताना पाहायला मिळत आहे. त्यातच एमआयएमचे नेते तथा खासदार इम्तियाज जलील यांनी नामांतराला विरोध केला आहे. कुणाच्याही आजोबांच्या इच्छेसाठी औरंगाबादचं नामांतर होऊ देणार नाही, गरज पडल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा जलील यांनी दिला आहे. मंगळवारी जलील यांनी याबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, यावेळी काही महत्वाचे ठराव घेण्यात आले. 

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्यापूर्वी घेतलेल्या शेवटच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेतले होते. ज्यात औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचा सुद्धा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान याच निर्णयाला आता विरोध होतांना पाहायला मिळत आहे. एमआयएमसह अनेक संघटनांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. तर नामांतराच्या विरोधात खासदार जलील यांनी मंगळवारी एक बैठक बोलावली होती. या बैठकीत एमआयएम, राष्ट्रवादी, काँग्रेससह अनेक संघटनेच्या पदाधिकारी आणि नेत्यांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळाले. 

काय म्हणाले जलील...

जगभरात औरंगाबाद शहराची ऐतिहासिक ओळख आहे. परंतु केवळ हिंदुत्व हा मुद्दा दाखवण्यासाठी व बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे कुणाच्याही आजोबांच्या इच्छेसाठी औरंगाबादचं नामांतर होऊ देणार नाही. यासाठी कायदेशीर लढाई उभारली जाईल, तसेच गरज पडल्यास रस्त्यावर सुद्धा उतरू असा इशारा जलील यांनी दिला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाला आमचा विरोध नाही, आम्ही त्यांचा आदर करतो, संभाजी महाराजांचे नाव द्यायचे असेल तर ते पुणे शहराला देऊन दाखवा, असेही जलील म्हणाले. 

राष्ट्रवादी-काँग्रेससचे नेत्यांची हजेरी...

औरंगाबादच्या नामांतराच्या निर्णयाला विरोध करत यापूर्वीच राष्ट्रवादी-काँग्रेससच्या काही नेत्यांकडून राजीनामे देण्यात आले होते. त्यांनतर जलील यांनी बोलावलेल्या बैठकीत सुद्धा राष्ट्रवादी-काँग्रेससचे अनेक पदाधिकारी हजर असल्याचे पाहायला मिळाले. आमच्यासाठी पक्ष महत्वाचा नसून, जनतेचा विषय महत्वाचा असल्याने आम्ही नामांतराच्या विरोधात असल्याच काँग्रेससचे अफसर खान म्हणाले. तर जाणीवपूर्वक शहराचे नामांतर करण्याचा प्रयत्न केला जात असून, दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे एकत्र लढण्याची गरज असल्याच राष्ट्रवादीचे नेते इलियास किरमाणी म्हणाले.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis vs Sanjay Raut : धर्मवीर सिनेमा पडद्यावर, वादाचा ट्रेलर; फडणवीस राऊत भिडलेMaharashtra Vidhan Sabha 2024 : विधानसभा निवडणुका पार्श्वभूमीवर महायुतीच्या निवडणूक आयोगाकडे मागण्याTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM 27 September 2024 : ABP MajhaBhandara Rain Crop Loss : पिकांचा चिखल, स्वप्नांचं पाणी; पंचनामे,मदत कधी? शेतकऱ्यांचा आर्त सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Embed widget