एक्स्प्लोर

PM Narendra Modi : 'चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट फिक्स', अहमदनगरमधून पंतप्रधान मोदींचा प्रहार

PM Narendra Modi : भाजपा आणि एनडीएला भरपूर जन समर्थन मिळाले आहे. चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट फिक्स झाली आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीवर केली आहे.

PM Narendra Modi :  आज लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू आहे. भाजपा (BJP) आणि एनडीएला (NDA) भरपूर जन समर्थन मिळाले आहे. चार जूनला इंडिया आघाडीची (INDIA Aghadi) एक्सपायरी डेट फिक्स झाली आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी इंडिया आघाडीवर केली आहे. तसेच त्यांनी काँग्रेसवरही (Congress) निशाणा साधला आहे.

आज अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे (Ahmednagar Lok Sabha Constituency) भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे (Shirdi Lok Sabha Constituency) शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांच्या प्रचारार्थ महायुतीची सभा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी ते बोलत होते.  

चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट फिक्स

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट निश्चित झाली आहे. महाराष्ट्राच्या विकासात अहमदनगर जिल्हा दिशा देणारा आहे. विखे पाटील यांचं मोठं योगदान आहे आज याची मला आठवण येत आहे.  आज तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू आहे. भाजपा आणि एनडीएला भरपूर जन समर्थन मिळाले आहे. चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट फिक्स झाली. निवडणुकीआधी भानुमतीचा कुलाबा झाला होता तो मातीच्या किल्ल्यासारखा ढासळणार आहे. भारतीयांना संतुष्ट करण्याची ही निवडणूक आहे. इंडिया आघाडी आपल्याच लोकांच्या तूष्टीकरणांमध्ये लागली आहे.

 काँग्रेसने 50 वर्ष केवळ गरिबी हटावचे नारे दिलेत

काँग्रेसला मुस्लिम लीग बनूनन टाकले आहे. एनडीएचा मुद्दा विकास, सुरक्षा, सन्मान आणि स्वाभिमान आहे. मात्र काँग्रेस यामधील कोणत्याही मुद्द्यावर बोलत नाही. काँग्रेसने 50 वर्ष केवळ गरिबी हटावचे नारे दिलेत. इंडिया आघाडीचे सरकार आले तर गोर गरिबांचे आरक्षण काढून घेऊन ते मुस्लिम लोकांना देतील. स्वतःच्या वोट बँकेला खुश करण्यासाठी ते हा प्रयत्न करत आहेत, असा आरोप यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. 

मोदी सरकारचे प्रथम प्राधान्य शेतकरी

मोदी सरकारने सुरक्षा विकासाची गॅरंटी दिली आहे. काँग्रेसने शेतकऱ्यांना संकटात ढकलले आहे. नगर जिल्ह्यातील निळवंडे 1970 धरणाचे काम सुरू झाले आहे. त्यावेळी धरण बनवण्यासाठी 8 कोटी किंमत होती त्याची किंमत आता 5 हजार कोटी झाली. हे पाप काँग्रेसने केले आहे. निळवंडे धरणातून शेतकऱ्यांच्या हजारो एकर शेती सिंचनाखाली येणार आहे. मोदी सरकारचे प्रथम प्राधान्य शेतकरी आहेत. मोदी सरकारच्या काळात ऊस उत्पादकांना अधिक पैसे मिळाले आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले. 

3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार

मोदी सरकार 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार आहे. अहिल्यानगर- सोलापूर महामार्गाचे काम पूर्ण झाले  आहे. रेल्वे, एअरपोर्टचा विकास करणे याकडे आमचे लक्ष आहे. शिर्डीच्या भाविकांना अधिक सुविधा मिळाव्यात यासाठी, आम्ही प्रयत्नशील असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटले आहे.  

आणखी वाचा 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड घरात शिरला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड घरात शिरला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
NEET पेपरफुटीचं आता धाराशिव कनेक्शन; घराला कुलूप लावून आरोपी बायका-लेकरांसह फरार
NEET पेपरफुटीचं आता धाराशिव कनेक्शन; घराला कुलूप लावून आरोपी बायका-लेकरांसह फरार
Cheapest Flight Tickets : स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA PC On Monsoon Session : उद्यापासून विधिमंडळाचं अधिवेशन, सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कारManoj Jarange : मराठयांवरती 100 टक्के अन्याय होणार, आता ताकदीनं उठाव करणारABP Majha Headlines : 03 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 26 June 2024 ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड घरात शिरला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड घरात शिरला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
NEET पेपरफुटीचं आता धाराशिव कनेक्शन; घराला कुलूप लावून आरोपी बायका-लेकरांसह फरार
NEET पेपरफुटीचं आता धाराशिव कनेक्शन; घराला कुलूप लावून आरोपी बायका-लेकरांसह फरार
Cheapest Flight Tickets : स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
Rahul Gandhi: मोठी बातमी : शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीही ज्ञानोबा तुकारामाचा गजर करणार, पंढरीच्या वारीत पायी चालणार?
Marathi Serial Updates Zee Marathi : 'लाखात एक दादा'ची ऑन एअरची वेळ ठरली,  झी मराठीवरील 'या' मालिकेचे काय होणार?
'लाखात एक दादा'ची ऑन एअरची वेळ ठरली, झी मराठीवरील 'या' मालिकेचे काय होणार?
Potential Benefits of Tea Free Diet : एक महिना चहा घेतलाच नाही, तर काय होईल? शरीरात कोणते बदल होऊ शकतात?
एक महिना चहा घेतलाच नाही, तर काय होईल? शरीरात कोणते बदल होऊ शकतात?
पराभवानंतर नवनीत राणा 23 दिवसांनी फडणवीसांना भेटल्या; भाजपातच राहणार, पराभवावर काय झाली चर्चा?
पराभवानंतर नवनीत राणा 23 दिवसांनी फडणवीसांना भेटल्या; भाजपातच राहणार, पराभवावर काय झाली चर्चा?
Embed widget