एक्स्प्लोर

अजितदादा परत आमच्याबरोबर या : राधाकृष्ण विखे पाटील

भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजित पवार यांना दिलेल्या सल्ल्यामुळे खळबळ माजली आहे. अजितदादा हे स्पष्टवक्ते आणि खरे बोलणारे नेते असून त्यांनी आता आमच्याबरोबर परत या, असं विखे पाटील म्हणाले.

शिर्डी : "अजितदादा हे स्पष्टवक्ते आणि खरे बोलणारे नेते असून त्यांनी आता आमच्याबरोबर परत या," असा सल्ला भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. निमित्त होतं राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित प्रगट मुलाखतीचे. याच मुलाखती दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संयमी असल्याचं सांगताना चुकीच्या सल्लागारांच्या गराड्यात ते अडकले असून त्यातून त्यांनी बाहेर येण्याचा सल्ला दिला. अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी घेतलेल्या मुलाखतीत विखे पाटील यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य केलं.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बंधू राजेंद्र विखे यांनी प्रवरा अभिमत विद्यापीठाच्या सभागृहात अभिनेते पुष्कर श्रोत्री यांच्या उपस्थितीत प्रगट मुलाखत या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी विखे पाटील यांनी अनेक विषयांवर भाष्य करताना शेवटच्या टप्प्यात फायर राऊंडमध्ये विचारलेल्या प्रश्नावर विखे पाटील यांनी अजित पवार स्पष्टवक्ते आणि खरे बोलणारे असून त्यांनी आता आमच्याबरोबर यावे, असा सल्ला दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. 

याचवेळी देवेंद्र फडणवीस उत्तम प्रशासक आणि आक्रमक नेते असून त्यांनी लवकर भाजपचं सरकार राज्यात आणावं, अशी विनंती केली. तर उद्धव ठाकरे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना विखे पाटील यांनी मुख्यमंत्री संयमी आणि मितभाषी असल्याचं सांगत चुकीच्या सल्लागारांच्या गराड्यात ते सापडले असून त्यांना बाजूला करावं, असा सल्ला दिला.

मुलाखतीमधील प्रश्न

1. प्रश्न - वेळेच्या बाबतीत तुम्ही काटेकोर आहात पण तुमच्या हातात घड्याळच नाही
उत्तर - 1975 साली परीक्षेसाठी खासदार बाळासाहेब विखेंनी घड्याळ दिलं त्यानंतर मी त्यांना परत केलं. पण मी घड्याळ घातलं नाही परत, त्याचा फायदा आज झाला. घड्याळाबरोबर माझा संबंध आला नाही.

2. प्रश्न - तुम्ही अनेक वर्षे अनेक पदं उपभोगली, मात्र मुख्यमंत्री पदावर आपली चर्चा कधीच झाली नाही
उत्तर - चर्चा झाली तर पद मिळत नाही. अनेकांची नाव चर्चेत येतात मात्र ते त्यांना मिळत नाही. आम्ही जनतेसाठी काम करतोय. मानसिक समाधान कामात आहे 

3. प्रश्न - विखे आणि पवार कुटुंबातील संघर्षाचं कारण काय? 
उत्तर - आमचा व्यक्तिगत संघर्ष नव्हता. शरद पवार यांचे बंधू आमच्याकडे नोकरीला होते. मात्र सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या प्रति होणाऱ्या चर्चेत वडील बाळासाहेब विखेंनी शेतकऱ्यांची बाजू घेतली. त्याकाळी असलेले गट, तेव्हापासून मतभेद निर्माण झाले आणि दरी वाढत गेली. गेल्या लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत शरद पवार यांनी घेतलेली भूमिका योग्य नव्हती. ती त्यांनी घ्यायला नको होती. काँग्रेसमध्ये अंतर्गत लोकशाही राहिली पाहिजे ही भूमिका माझ्या वडिलांनी राजीव गांधीच्या काळात घेतली. त्यावेळी हे सर्व बरोबर होते आणि नंतर विरोधात गेले. मात्र आमची तेव्हापासून तत्वाची लढाई होती आणि आजही तीच कायम आहे.

दरम्यान तासभर चाललेल्या या मुलाखती दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनेक प्रश्नांना सडेतोड उत्तर देत आठवणींना उजाळा दिला. याशिवाय कौटुंबिक, सामाजिक आणि राजकीय प्रश्नाबाबत विखे पाटील यांनी दिलेली उत्तर आणि कौटुंबिक किस्से हे या मुलाखतीचं वैशिष्ट्य ठरलं. तर सुजय विखे यांनी श्रद्धा आणि सबुरी या मंत्राचा अवलंब करावा असा सल्ला सुद्धा त्यांनी दिला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ahilyanagar Shrirampur Crime News: किरकोळ कौटुंबिक वाद विकोपाला, लेकानं जन्मदात्या वडिलांना संपवलं, अहिल्यानगरच श्रीरामपूर हादरलं!
किरकोळ कौटुंबिक वाद विकोपाला, लेकानं जन्मदात्या वडिलांना संपवलं, अहिल्यानगरच श्रीरामपूर हादरलं!
Vidhan Parishad Election 2026 BJP: भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी 5 उमेदवार जाहीर, सोशल इंजिनिअरिंग अन् निष्ठावंतांना संधी, नेमकं काय गणित साधलं?
भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी 5 उमेदवार जाहीर, सोशल इंजिनिअरिंग अन् निष्ठावंतांना संधी, नेमकं काय गणित साधलं?
Vidhan Parishad Election 2026 BJP Candidates: भाजपचा विधानपरिषदेचा पहिला उमेदवार ठरला? तरुण नेत्याने रात्री फडणवीसांच्या भेटीला अन् चर्चांना उधाण
भाजपचा विधानपरिषदेचा पहिला उमेदवार ठरला? तरुण नेता रात्री फडणवीसांच्या भेटीला अन् चर्चांना उधाण
धक्कादायक! पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळला, अहिल्यानगरमध्ये खळबळ
धक्कादायक! पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळला, अहिल्यानगरमध्ये खळबळ

व्हिडीओ

Sanjay Jadhav On Uddhav Thackeray : खासदार संजय जाधव ठाकरेंची साथ सोडणार?
Sanjay Shirsat On Mahesh Shinde : महेश शिंदेंनी सत्ता मिळवण्यासाठी जे केलं ते शिंदेंना रुचलं नाही
Nasrapur Case Women Reaction : काळीज चिरेल, छाती फुटेल, हृदय पिळवटून निघेल, नसरापूरची हादरवणारी कहाणी
Maharashtra HSC Exam Result 2026 : बारावीच्या निकालात राज्यात कोकण विभाग अव्वल
NDMA alert system Disaster Alert Test : आपत्कालीन स्थितीत एकत्रित संदेश देण्यासाठी विशेष यंत्रणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या 15 वर्षांच्या मुलाला बघून इतका घाबरलो..' वैभव सू्र्यवंशीच्या क्रिकेटच्या मैदानातील दहशतीविरोधात कोणी दिली जाहीर कबुली?
'माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या 15 वर्षांच्या मुलाला बघून इतका घाबरलो..' वैभव सू्र्यवंशीच्या क्रिकेटच्या मैदानातील दहशतीविरोधात कोणी दिली जाहीर कबुली?
'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज
'गुजराती गँग आणि ज्ञानेश कुमारसारखी प्यादी दहा जन्मात सुद्धा डायमंड हार्बर मॉडेल मोडू शकणार नाही, जर तुमच्यात हिंमत असेल तर...' तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जींचं भाजपला ओपन चॅलेंज
Delhi Fire Video: अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप
Video: अंथरुणातच तीन मृतदेह सापडले; पहाटेच्या साखरझोपेतच भीषण आगीत जिवंत जळून फक्त हाडांचा सांगाडा राहिला, ओळखही पटवता येईना, भीषण अग्निकांडात राजधानीत थरकाप
Pune Bhor Crime news: नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
नसरापूरमध्ये चिमुकलीवर अत्याचार, प्रचंड गदारोळानंतर बालहक्क आयोगाला जाग, पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Delhi Vivek Vihar Fire Accident : दिल्लीच्या विवेक विहारमध्ये अग्नीतांडव, चार मजली इमारतीला भीषण आग; नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
दिल्लीच्या विवेक विहारमध्ये अग्नीतांडव, चार मजली इमारतीला भीषण आग; नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
Zodiac Personality: ब्रेकअपनंतरही अत्यंत 'पझेसिव्ह'! 'या' राशीच्या लोकांना जोडीदाराच्या आठवणी विसरणं अशक्य! कुंडलीत ग्रहांचा खेळ, ज्योतिषशास्त्र..
ब्रेकअपनंतरही अत्यंत 'पझेसिव्ह'! 'या' राशीच्या लोकांना जोडीदाराच्या आठवणी विसरणं अशक्य! कुंडलीत ग्रहांचा खेळ, ज्योतिषशास्त्र..
Pankaja Munde: मला डॉक्टर व्हायचं होतं, पण मार्क कमी पडले, धनंजय मुंडे मात्र भाग्यवान, कारण...; पंकजा मुंडे परळीतील कार्यक्रमात नेमकं काय म्हणाल्या?
मला डॉक्टर व्हायचं होतं, पण मार्क कमी पडले, धनंजय मुंडे मात्र भाग्यवान, कारण...; पंकजा मुंडे परळीतील कार्यक्रमात नेमकं काय म्हणाल्या?
Devendra Fadnavis on Nasrapur Bhor Crime: काही लोकांना प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं होतं, नवले पुलावरुन आई-वडिलांना निघू देत नव्हते: देवेंद्र फडणवीस
काही लोकांना प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं होतं, नवले पुलावरुन आई-वडिलांना निघू देत नव्हते: देवेंद्र फडणवीस
Embed widget