एक्स्प्लोर

Ahmednagar News : अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयातील वकिलांचे काम बंद आंदोलन, नेमकं प्रकरण काय?

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये झालेल्या दोन वकिलांच्या हत्येनंतर जिल्हा न्यायालयातील वकिलांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे.

अहमदनगर : अहमदनगर (Ahmednagar) बार असोसिएशनच्या वतीने जिल्हा न्यायालयातील कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये असलेल्या राहुरी तालुक्यात अॅड.राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी अॅड. सौ. मनिषा आढाव यांटी निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली होती. याचाच निषेध म्हणून जिल्हा न्यायालयातील वकिलांनी काम बंद आंदोलन सुरु केले आहे. 

या हत्येचा तपास सीआयडीकडे देण्यात यावा, तसेच वकिलांवर होणारे हल्ले आणि खोट्या केसेस याबाबत वकील प्रोटेक्शन अॅक्ट करावा अशी मागणी देखील अहमदनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नरेश गुगळे यांनी केली आहे. अनेक प्रकणांमध्ये वकिलांवर हल्ले झाल्याच्या बातम्या समोर येत असतात. त्यामुळे आता वकिलांकडून त्यांच्या सुरक्षेची मागणी होत असल्याचं चित्र आहे. 

तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने सोमवार 29 जानेवारी रोजी वकिलांनी काम बंद आंदोलन ठेवून या घटनेचा निषेध केला आहे. भविष्यामध्ये अशा घटना थांबल्या नाहीत तर वकील संघटनेच्या वतीने तीव्र आंदोले केली जातील असा इशाराही यावेळी वकील संघटनांनी दिलाय. अहमदनगरमधील जिल्ह न्यायालयातील बंदमध्ये अहमदनगर बार असोसिएशन, सेंट्रल बार असोसिएशनचे तसेच कौटुंबिक न्यायालय, महसूल न्यायालय, औद्योगिक आणि कामगार न्यायालय, लवाद न्यायालय, ग्राहक मंच या सर्व न्यायालयांमधील वकिलांनी सहभाग घेतला होता. 

नेमकं प्रकरण काय?

अहमदनगर येथील एका वकिल दाम्पत्याचे पाल लांखांच्या खंडणीसाठी आधी अपहरण करण्यात आले. त्यानंतर या दाम्पत्याचा खून करु मृतदेह विहिरीत फेकून देण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या उंबरे येथे 25 जानेवारी रोजी धक्कादायक घटना घडली. तसेच स्थानिक गुन्हे शाखेने 24 तासांच्या आत मुख्य आरोपी आणि त्याच्या तीन साथीदारांना ताब्यात घेतलं. दरम्यान 5 लाखांची खंडणी न दिल्याने हे कृत्य केल्याची कबुली आरोपींनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजाराम जयवंत आढाव 52 वर्षे आणि मनीषा राजाराम आढाव वय 42 वर्षे असं या दाम्पत्याचं नाव होतं. नेहमीप्रमाणे ते 25 जानेवारी रोजी राहुरी येथून न्यायालयात गेले. पण त्या दिवशी दुपारनंतर त्यांचा त्यांच्या नातेवाईकांशी कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार केली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ आरोपींचा शोध सुरु केला. 

हेही वाचा : 

Ahmednagar Sambhaji Nagar Accident: अहमदनगरच्या शेतमजुराच्या कुटुंबावर काळाचा घाला; आई-वडिलांसह दोन भावंडांनी जागीच गमावला जीव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget