एक्स्प्लोर

The Kerala Story Review : केरळमधील मुलींचं धर्म परिवर्तन करुन त्यांना दहशतवादी संघटना ISIS मध्ये कसं सामील केलं जातं हे सांगणारा 'द केरळ स्टोरी'

The Kerala Story : 'द केरळ स्टोरी' या सिनेमाचं कथानक खूपच भावनिक आहे.

The Kerala Story Review : केरळमधील (Kerala) मुलींचं धर्म परिवर्तन करुन त्यांना दहशतवादी संघटना आयएसआयएसमध्ये (ISIS) सामील केलं जात आहे. बेपत्ता झालेल्या मुलींचा आकडा नक्की किती आहे? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाचं कथानक खरं असल्याचं काहींचं मत आहे. तर काही मंडळी मात्र हा सिनेमा प्रपोगंडा असल्याचं म्हणत आहे. तर जाणून घ्या 'द केरळ स्टोरी'चा रिव्ह्यू...

'द केरळ स्टोरी' या सिनेमाचं कथानक काय? (The Kerala Story)

'द केरळ स्टोरी' या सिनेमाचं कथानक नर्सिंग महाविद्यालयात शिकणाऱ्या शालिनी उन्नीकृष्णनवर आधारित आहे. शालिनी आणि तिच्या मैत्रिणींना मुस्लिम मुलं प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. पुढे ते या मुलींची फसवणूक करतात. मुलगी गरोदर असल्याचं कळल्यानंतर ते तिला सोडून देतात. मुलीच्या चुकीमुळे घरच्यांना एका वेगळ्या संघर्षाचा सामना करावा लागतो. आलेल्या अडचणींचा ते कसा सामना करतात हे या सिनेमात दाखवण्यात आले आहे.

'द केरळ स्टोरी' या सिनेमाची बांधणी खूपच चांगल्याप्रकारे करण्यात आली आहे. या सिनेमातील प्रत्येक सीन तुम्हाला विचार करायला भाग पाडतो. महिलांचे ब्रेनवॉश करुन त्यांचे धर्मांतर करण्यासंदर्भातला संवाद सुरू होतो तेव्हा सिनेमा पाहणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर शहारे येतात. या सिनेमातील प्रत्येक फ्रेम तुम्हाला खिळवून ठेवते. मुलींची फसवणूक झाल्यानंतर सिनेप्रेक्षकाला अश्रू अनावर होतात. त्यामुळे मनोरंजन करण्यासोबत प्रेक्षकांना जागं करण्याचा प्रयत्न या सिनेमाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. 

'द केरळ स्टोरी' या सिनेमाच्या शेवटी काही गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. यात स्वत:च्या अस्तिस्वासाठी लढणाऱ्या मुलींच्या मुलाखतीदेखील दाखवण्यात आल्या आहेत. पण काही मुलींचे व्हिडीओ दाखवण्यात आले आहेत आणि 32,000 मुली बेपत्ता झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे आता सत्य काय आहे हे निर्मात्यांनाच ठाऊक. 

'द केरळ स्टोरी'च्या कलाकारांचा दर्जेदार अभिनय

'द केरळ स्टोरी' या सिनेमात अदा शर्मा (Adah Sharma) शालिनी उन्नीकृष्णनच्या भूमिकेत दिसत आहे. तिचा ताकदीच्या अभिनयाचं खूप कौतुक होत आहे. अभिनेत्रीने मुस्लिम आणि दाक्षिणात्य मुलगी दोन्हीची उत्तमप्रकारे सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे. अदा शर्मासह सर्वच कलाकारांनी दर्देदार कामगिरी केली आहे. 

सुदिप्तो सेनच्या दिग्दर्शनाचंदेखील कौतुक. केरळ महाविद्यालय ते ISIS चं जग सर्वंच गोष्टी प्रेक्षकांना सिनेमात गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. विरेश आणि बिसाख ज्योतीने खूप चांगल्या प्रकारे या सिनेमातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. सिनेमाचं कथानक पुढे जाण्यासाठी ही गाणी फायदेशीर ठरतात. या गाण्याचे बोल प्रेक्षकांना भावतात. एकंदरीतच 'द केरळ स्टोरी' हा भावनिक सिनेमा आहे. 

'द केरळ स्टोरी' या सिनेमात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बानी, सिद्धी इदनानी या अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. केरळमधील महिलांची फसवणूक होते. त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडलं जात. त्यानंतर या मुलींना आयएसएसच्या आतंकवाद्यांसोर उभं केलं जातं.  त्यानंतर अंगावर शहारे आणणाऱ्या खेळाला सुरुवात होते. 

The Kerala Story : केरळमधील मशिदीत हिंदू जोडपं अडकलं लग्नबंधनात; संगीतसम्राट ए आर रेहमान यांनी शेअर केला व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : हार्दिकला पप्पी, विराटला झप्पी, लाल मातीवर लोटांगण, भारतमातेला वंदन, रोहित शर्माचं सेलिब्रेशन
सतरा वर्षानंतर पुन्हा एकदा स्वप्न सत्यात उतरलं, रोहितचं जंगी सेलिब्रेशन, भारतमातेला वंदन
Hardik Pandya : आयपीएलमधील खराब फॉर्म, खासगी आयुष्यात संघर्ष, हार्दिक लढला, जिंकला अन् आनंदाश्रूंचा बांध फुटला, भारतानं इतिहास रचला
Hardik Pandya : कॅप्टन रोहितचा विश्वास सार्थ ठरवला, हार्दिकनं मोहीम फत्ते केली, पांड्याच्या डोळ्यात आनंदाश्रू
Virat Kohli :
"हा माझा अखेरचा टी20 वर्ल्ड कप", विराट कोहलीकडून टी20 मधून निवृत्तीचे संकेत
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 12 AM : 30 June : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Report : कसायला जमीन, पण गुंडांचे अतिक्रमण! सह्याद्री व्याघ्र प्रकल्पग्रस्तांचे अतोनात हाल!India Won T20 World Cup : एका कॅचने फिरवली मॅच..17 वर्षांनी भारत विश्वविजेता! ABP MajhaIndia Won T20 world cup : भारताने अखेरच्या षटकात जिंकला T20 वर्ल्डकप

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : हार्दिकला पप्पी, विराटला झप्पी, लाल मातीवर लोटांगण, भारतमातेला वंदन, रोहित शर्माचं सेलिब्रेशन
सतरा वर्षानंतर पुन्हा एकदा स्वप्न सत्यात उतरलं, रोहितचं जंगी सेलिब्रेशन, भारतमातेला वंदन
Hardik Pandya : आयपीएलमधील खराब फॉर्म, खासगी आयुष्यात संघर्ष, हार्दिक लढला, जिंकला अन् आनंदाश्रूंचा बांध फुटला, भारतानं इतिहास रचला
Hardik Pandya : कॅप्टन रोहितचा विश्वास सार्थ ठरवला, हार्दिकनं मोहीम फत्ते केली, पांड्याच्या डोळ्यात आनंदाश्रू
Virat Kohli :
"हा माझा अखेरचा टी20 वर्ल्ड कप", विराट कोहलीकडून टी20 मधून निवृत्तीचे संकेत
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले, दक्षिण आफ्रिका ठरली पुन्हा चोकर्स
IND vs SA Final : फायनलमध्ये 76 धावा चोपल्या, तरीही किंग कोहलीच्या नावावर लाजीरणा विक्रम! 
IND vs SA Final : फायनलमध्ये 76 धावा चोपल्या, तरीही किंग कोहलीच्या नावावर लाजीरणा विक्रम! 
मोठी बातमी : बीडच्या परळीत गोळीबार; अजित पवार गटातील सरपंचाचा जागीच मृत्यू, तर दोन जण जखमी
मोठी बातमी : बीडच्या परळीत गोळीबार; अजित पवार गटातील सरपंचाचा जागीच मृत्यू, तर दोन जण जखमी
Majha Katta : मराठा समाज मागास का नाही? लक्ष्मण हाकेंनी माझा कट्ट्यावर भूमिका मांडली
मराठा समाज मागास का नाही? लक्ष्मण हाकेंनी माझा कट्ट्यावर भूमिका मांडली
IND vs SA Final : 34 धावा 3 विकेट... मग विराट-अक्षरनं केली कमाल, आफ्रिकासमोर 177 धावांचे आव्हान
IND vs SA Final : 34 धावा 3 विकेट... मग विराट-अक्षरनं केली कमाल, आफ्रिकासमोर 177 धावांचे आव्हान
Embed widget