एक्स्प्लोर

अतिविचारामुळे तुमचं मानसिक आरोग्य धोक्यात येतेय का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Mental Health : तुम्ही अतिवाचार करत आहात का? ऑफिस, घर कुटुंब, नोकरी, प्रवास, पैसा यासारख्या प्रश्नांचा सतत अतिविचार करत मनात नकारात्मकतेनं थैमान झालेय.

Mental Health : तुम्ही अतिवाचार करत आहात का? तुमच्या मनात अनेक प्रश्नासह चिंता अन् विचारांनी काहूर माजलं आहे. ऑफिस, घर कुटुंब, नोकरी, प्रवास, पैसा यासारख्या प्रश्नांचा सतत अतिविचार करत मनात नकारात्मकतेनं थैमान घातलं असेल. यासारख्या काही त्रासदायक विचारांना दूर करण्यास तुम्ही असमर्थ आहात काय? त्यासाठी तुम्ही किती अन् कसे प्रयत्न केलेत? वारंवार त्याच त्या नकारात्माक विचारात गुंतण्याइतकं त्रासदायक काहीच नाही. अतिविचारामुळे मन शांत राहत नाहीच त्याशिवाय परिणाम  फक्त तुमच्या मनावरच नव्हे तर उत्पादन क्षमता आणि झोपही उडवू शकतो. परंतु, काही अभ्यासांनुसार, अतिविचारामुळे नैराश्यसह इतर मानसिक आजारही उद्भवू शकतात. आज प्रत्येक ठिकाणी मानसिक आरोग्य हा विषय महत्वाचा ठरत आहे. त्यासाठी कोणताही कारणं असू शकतात. त्यापैकीच एक कारण अतिविचार हे आहे. पण अतिविचारामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. मानसिक आरोग्य हा शब्द ऐकतो किंवा वाचतो तेव्हा नकळत नकारात्मक गोष्टींचा विचार करू लागतो. पण या मानसिक त्रासातून बाहेर कसे पडायचे? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. 

ज्यावेळी तुम्ही सतत अतिविचार करता, त्यावेळी तुमचं मन नकारात्मकतेकडे झुकलं जातं. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला नकारात्मकता दिसून येते. विचार, परिस्थिती आणि लोक सर्व काही नकारात्मक दिसतात. स्वत:लाही सतत नकारात्मक समजलं जातं. पण तुमच्यात इच्छाशक्ती असेल मन कणखर असेल तर या गुंतागुंतीच्या अतिविचारांमधून सहज बाहेर पडता येऊ शकतं असं तज्ज्ञ सांगतात. अतिविचार करणं हे मोठं संकट असून त्याचे अनेक धोके आहेत. त्यामुळे त्यावर वेळीच उपचार करणं महत्वाचं आहे. अतिविचार करणं हा मानसिक आजार नाही. मात्र, सतत अतिविचार केल्यामुळे मानसिक आजार होऊ शकतो. अतिविचारामुळे मुलांमध्ये पीटीएसडी (Posttraumatic stress disorder ) चा धोका संभावतो. मानसशास्त्रज्ञ गरीमा जुनेजा यांनी अतिविचार आणि मानसिक आजार यासंदर्भातील अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. 

अतिविचाराचे धोके काय?

अतिविचाराचा परिणाम मानसिक आरोग्यवर होतेच. त्यामुले तुमच्या कामावरही त्याचा परिणाम जाणवतो. अतिविचारामुळे निर्माण होणाऱ्या कोर्टिसोल हार्मोनमुळे मेंदूच्या कनेक्टिव्हीटीवरही परिणाम होतो. सतत विचार केल्याने तणाव, चिंता, मुड स्विंग्स यांसारख्या मानसिक समस्या उद्भवतात. त्याचा परिणाम पचनक्रियेवर होतो. यामुळे पोटात जळजळ, बोवेल सिंड्रोम, गॅस्टिक सिक्रेशन, आतड्यांची अकार्यक्षमता यांसारखअया समस्यांना आमंत्रण मिळते. अतिविचारामुळे तुमच्यामध्ये नकारात्मकता वाढते. तुम्ही लोकांपासून स्वत:ला दूर ठेवायला लागतात. लोकांशी बोलणं टाळता. एकटेएकटे राहायला सुरुवात करताl. सतत अतिविचार केल्यामुळे झोप पूर्ण होतं नाही, त्यामुळे उत्पादक क्षमतेवरही परिणाम होतो. कामावरही परिणाम होतो. वेळ वाया घालवण्याची समस्याही वाढते. अतिविचार केल्यामुळे मानसिक आजारासह अनेक धोकादायक परिणाम होतात. यावर वेळीच उपाय करायला हवा. समस्येची जाणीव झाल्यानंतर लगेच यावर उपाय शोधायला हवा...

मानसिक आजारावर कशी मात कराल?

विचार करण्याची पद्धत बदला. नकारात्मक विचारांना थांबवा.  अतिविचारपासून सुटका करण्यासाठी वारंवार तुम्हाला स्वत:ला पॉझिटिव्ह विचार करावे लागतील.

नकारात्म विचार येत असतील तर पाच तुमच्या पाच इंद्रियांवर लक्ष केंद्रित करा.

अतिविचाराने नकारात्मकता येत असेल तर डोळे बंद करुन दीर्घ श्वास घ्या अन् सोडा...  

आपल्या कामातील सुधारणावर भर द्या...

एक डायरी करा... त्यामध्ये दररोजची नोंद ठेवा. त्यासोबत सकारात्मक विचार लिहा, ज्याने तुमचं मन प्रसन्न होईल अन् पॉझिटिव्हिटी येईल.

भूतकाळात अथवा भविष्यकाळात जास्त काळात जास्त रमू नका.

मित्रांशी अथवा जोडीदारासोबत मनमोकळेपणाने बोला.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Neem Study : कडुनिंब कॅन्सरवर उपाय ठरू शकतो, नव्या संशोधनातून आशादायक संकेत
कडुनिंब कॅन्सरवर उपाय ठरू शकतो, नव्या संशोधनातून आशादायक संकेत
आई-बाळाच्या जीवाशी खेळ नको! गर्भावस्थेतील क्षयरोगावर वेळीच उपचार गरजेचे, डॉक्टर सांगतात...
आई-बाळाच्या जीवाशी खेळ नको! गर्भावस्थेतील क्षयरोगावर वेळीच उपचार गरजेचे, डॉक्टर सांगतात...
Health News: भारतात वाढतंय TBचं संकट; किती आठवडे खोकला राहिल्याने त्रास वाढतो? लक्षणे कोणती?
भारतात वाढतंय TBचं संकट; किती आठवडे खोकला राहिल्याने त्रास वाढतो? लक्षणे कोणती?
Women Health: गर्भावस्थेतच क्षयरोगाचा धोका? आई-बाळाच्या सुरक्षेकरिता तज्ज्ञांचा इशारा, 'ही' लक्षणं वेळीच ओळखा..
गर्भावस्थेतच क्षयरोगाचा धोका? आई-बाळाच्या सुरक्षेकरिता तज्ज्ञांचा इशारा, 'ही' लक्षणं वेळीच ओळखा..

व्हिडीओ

Nagpur Crime : नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन जीवन संपवलं
Ashok Kharat Police Custody | अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प
Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal Assembly Elections 2026: पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात काँग्रेसनं उमेदवार दिला
पश्चिम बंगालसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर,अधीर रंजन चौधरी विधानसभेच्या रिंगणात   
Houthi Rebels : कोण आहेत हुथी बंडखोर? इराण-इस्रायल युद्धात उतरले तर चित्र पालटण्याची क्षमता, ट्रम्प यांची डोकेदुखी वाढणार
कोण आहेत हुथी बंडखोर? इराण-इस्रायल युद्धात उतरले तर चित्र पालटण्याची क्षमता, ट्रम्प यांची डोकेदुखी वाढणार
US-Iran War : पर्शियाच्या आखातात याल तर परत जाणार नाही, इराणचा अमेरिकन सैन्याला इशारा
पर्शियाच्या आखातात याल तर परत जाणार नाही, इराणचा अमेरिकन सैन्याला इशारा
Mhada Lottery 2026 : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2640 घरांसाठी सोडत जाहीर, मुंबईत घर घेण्यासाठी अर्ज कसा करायचा?
म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 2640 घरांसाठी सोडत जाहीर, म्हाडाच्या घरांसाठी अर्ज कसा करायचा?
Kerosene : 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल पंपावर रॉकेल मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, परवानगी किती दिवसांसाठी?
21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पेट्रोल पंपावर रॉकेल मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय,परवानगी किती दिवसांसाठी?
Pope Leo on War: देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाचा नावाचा वापर करणं साफ चुकीचं; पोप लिओंनी युद्धखोर नेत्यांना फटकारलं
देव कधीही युद्धाचे समर्थन करत नाही आणि युद्धाचे समर्थन करण्यासाठी धर्माचा किंवा देवाचा नावाचा वापर करणं साफ चुकीचं; पोप लिओंनी युद्धखोर नेत्यांना फटकारलं
Share Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं 4 दिवसात मोठं नुकसान, पावणे दोन लाख कोटी स्वाहा, रिलायन्सला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं 4 दिवसात मोठं नुकसान, पावणे दोन लाख कोटी स्वाहा, रिलायन्सला सर्वाधिक फटका
Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांना प्रश्न, देवेंद्र फडणवीस सुनेत्राताई पवार यांचं नाव घेत म्हणाले...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांना प्रश्न, देवेंद्र फडणवीस सुनेत्राताई पवार यांचं नाव घेत म्हणाले...
Embed widget