![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Health : काय मंडळी...! उन्हाळ्यात पुरेसं पाणी पिताय ना? अन्यथा 'हा' त्रास होऊ शकतो.
Health :जर तुम्हालाही उन्हाळ्यात या 5 समस्या होत असतील तर समजून घ्या की, तुम्ही कमी प्रमाणात पाणी पीत आहात.
![Health : काय मंडळी...! उन्हाळ्यात पुरेसं पाणी पिताय ना? अन्यथा 'हा' त्रास होऊ शकतो. Health lifestyle marathi news Drinking enough water in summer it can cause trouble Health : काय मंडळी...! उन्हाळ्यात पुरेसं पाणी पिताय ना? अन्यथा 'हा' त्रास होऊ शकतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/06/62a5ee31d5f1e1dac822c3d7c7e350611714991833522381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Health : उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेच्या लाटेने सर्वांना हैराण केलंय, अशात कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या लोकांना या गरमीचा त्रास सहन करावा लागतोय. या उन्हाळ्यात शरीराला सर्वात जास्त गरज ही पाण्याची असते. कारण उच्च तापमानामुळे डिहायड्रेशनशी समस्या उद्भवते. आपले शरीर 75 टक्के पाण्याने बनलेले आहे. अशा परिस्थितीत शरीर सुरळीत चालण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते हे समजून घेणे आवश्यक आहे. चांगल्या आरोग्यासाठी दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी पिण्याचा सल्लाही डॉक्टर देतात. याशिवाय तुम्हाला इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जेव्हा जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा शरीर आपल्याला त्याचे संकेत देऊ लागते जेणेकरून आपण लवकरात लवकर आपल्या पाण्याच्या सेवनाकडे लक्ष देऊ शकतो. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास कोणती लक्षणे दिसतात ते जाणून घेऊया.
ही चिन्हे दर्शवतात की तुम्ही पुरेसे पाणी पीत नाही...
पुरेसे पाणी न पिल्याने शरीरात द्रवपदार्थांची कमतरता निर्माण होते. त्यामुळे रक्ताचे प्रमाणही कमी होते. शरीराच्या अनेक भागांमध्ये ऑक्सिजन आणि पोषक घटक पोहोचत नाहीत. यामुळे थकवा आणि ऊर्जेची कमतरता जाणवते.
या दिवसात तुम्हाला थकवा आणि उर्जेची कमतरता जाणवत असेल. जर तुम्हाला सतत झोप येत असेल तर तुम्ही पाणी कमी पीत आहात हे समजून घ्यावे लागेल.
पाणी तुमचे मल मऊ करून आतड्याच्या हालचालींना प्रोत्साहन देते. पुरेसे पाणी न पिल्याने तुमचे शरीराला पाण्याची कमतरता भासू शकतो. ज्यामुळे मल कठीण होऊ शकतो. त्यामुळे विष्ठा जाण्यास खूप त्रास होतो. यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होतो.
पाणी तुमची त्वचा चमकदार आणि चिरतरुण दिसण्यास मदत करते. पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचेचा कोमलता आणि लवचिकता कमी होऊ शकते, ज्यामुळे त्वचा कोरडी, फ्लॅकी आणि बारीक रेषांनी भरलेली दिसते. यामुळे मुरुमे देखील होऊ शकतात.
आजकाल तुम्हाला सतत डोकेदुखी होत असली तरी तुम्ही तुमच्या पाण्याच्या सेवनाकडे लक्ष दिले पाहिजे, कारण पाण्याच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते.
जर तुम्हाला श्वासाच्या दुर्गंधीचा त्रास होत असेल तर ते कमी पाणी पिण्याचे संकेत देते. त्यामुळे लाळ निर्मितीसाठी पाणी आवश्यक आहे. हे बॅक्टेरिया काढून टाकण्यास मदत करते. पाण्याच्या कमतरतेमुळे लाळेचे उत्पादन थांबते, ज्यामुळे दात आणि हिरड्यांवर बॅक्टेरिया तयार होतात आणि श्वासाची दुर्गंधी येते.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>>
Mothers Day 2024 : 'आईसारखे दैवत...' मदर्स डे निमित्त आईवर 'असं' भाषण कराल की, प्रत्येकजण होईल भावूक, इथून आयडिया घेऊ शकता
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)