एक्स्प्लोर

Diwali 2022 : या दिवाळीत फराळही खा आणि हेल्दी राहा; जाणून घ्या आरोग्यदायी फराळाची पद्धत

Diwali 2022 : दिवाळीचा सण हिवाळा ऋतूत येतो. त्यामुळे या थंडीच्या दिवसांमध्ये शरीरातील ऊर्जा वाढविण्यासाठी पौष्टिक आहार शरीराला मिळावा यासाठीच या दिवाळीच्या फराळाची सुरुवात झाली.

Diwali 2022 : दिवाळीचा (Diwali 2022) सण 21 ऑक्टोबरपासून सगळीकडे साजरा केला जाणार आहे. दिवाळी म्हटलं की दिवे, आकाशकंदील, विविध रंगांच्या रांगोळी या सगळ्या गोष्टी तर डोळ्यांसमोर येतातच पण त्याआधीच खवय्येप्रेमी आतुरतेने वाट पाहतात ती खमंग फराळाची. दिवाळी लाडू, चकली, चिवडा, करंजी असे कितीतरी फराळांचे पदार्थाची चव आपल्या जीभेवर तरळू लागते. पण, या बदलत्या ऋतुचक्रानुसार दिवाळीमध्ये आपण जे पदार्थ खातोय ते आरोग्यासाठी हितकारक हेत का? हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. 

काळानुसार फराळातील पदार्थांमध्ये अनेक बदल होत गेले. मग ती चॉकलेटची मिठाई असो किंवा चॉकलेटपासून केली जाणारी करंजी असो. पण, सध्याच्या जीवनशैलीमध्ये आरोग्याच्या दृष्टीने आपण सध्या खात असणाऱ्या फराळामध्ये काही प्रमाणात बदल होणंही गरजेचं आहे. 

पूर्वीच्या फराळाचे स्वरूप :

पूर्वीच्या काळी म्हणजे आपल्या आजी किंवा पणजीच्या काळात गहू, तांदूळ, चणे, मूग यांसारख्या धान्यांचा आणि कडधान्यांचा वापर करून दिवाळी मधला संपूर्ण फराळ तयार केला जायचा. पण गेल्या काही वर्षांमध्ये फराळांचं स्वरूप पूर्णपणे बदललेलं आहे. आता धान्याची जागा मैद्याने घेतली आहे. आणि गुळाची जागा भरमसाठ साखरेने घेतली आहे.  

दिवाळीचा सण हिवाळा ऋतूत येतो. त्यामुळे या थंडीच्या दिवसांमध्ये शरीरातील ऊर्जा वाढविण्यासाठी पौष्टिक आहार शरीराला मिळावा यासाठीच या दिवाळीच्या फराळाची सुरुवात झाली असावी. मात्र, निसर्गाच्या बदलत्या ऋतु चक्रानुसार सध्या दिवाळीमध्ये थंडीचा मागमूसही नसतो. थंडीच्या दिवसांमध्ये कधी ऊन तर कधी पावसाचे चित्र दिसते. त्यामुळेच या अशा स्थितीत सध्या ज्या प्रकारचे फराळाचे पदार्थ आपण दिवाळीत खातोय त्याचे दुष्परिणाम दिवाळी झाल्यानंतर अगदी काही दिवसांतच दिसू लागतात.

तज्ज्ञांच्या मते, अपचन होणं, पित्त, पोटदुखी, मूळव्याध, खोकला, रक्तातील साखर वाढते, अचानक वजन वाढणे यांसारखे काही आरोग्यावर दुष्परिणाम होतात. मात्र, हे दुष्परिणाम अनेकदा जीभेच्या चवीला कळत नाहीत. त्यामुळे दिवाळीत लोक फराळांवर अगदी ताव मारतात. मात्र, यावर्षीची दिवाळी आरोग्यदायी जाण्यासाठी, फक्त तुमच्या घरी बनवल्या जाणाऱ्या फराळाच्या पदार्थांमध्ये थोडासा बदल करणं गरजेचं आहे. 

साखरेऐवजी गुळाचा वापर करा 

  • दिवाळीत गोड पदार्थ म्हणजेच शंकरपाळी, करंजी, लाडू यांसारख्या पदार्थांमध्ये साखरेऐवजी तुम्ही नैसर्गिक गुळाचा वापर करू शकता. 
  • मैदा न वापरता भाजलेल्या डाळी किंवा गव्हाचं, ज्वारीचं पीठ वापरू शकता.
  • घरच्या घरी तुम्ही मिठाई बनवत असाल तर त्यात माव्याचा वापर न करता सुका मेवा वापरून मिठाई बनवा.
  • चकली बनवताना गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ काही प्रमाणात मूग डाळ आणि अगदी थोडा मैदा वापरून चकली केलीत तर तुमच्या चकलीमध्ये खूप कमी प्रमाणात तेल उरेल.
  • जर तुम्ही गहू, तांदूळ यांसारख्या धान्यांपासून फराळाचे पदार्थ तयार करत असाल तर हे धान्यसुद्धा आरोग्यदायी आहेतच. पण या धान्यांना पर्याय म्हणून तुम्ही भगर, वरी, राळ यासारख्या तृणधान्यांचा वापर करून फराळाचे पदार्थ बनवा.

पौष्टिक फराळाचा आरोग्यासाठी फायदा :

तृणधाण्यांमुळे शरीरावर अतिरिक्त चरबी येत नाही. शरीरातील साखर वाढत नाही आणि तुमचं वजनही वाढणार नाही. कॉलेस्ट्रॉलची समस्या तुम्हाला जाणवणार नाही. त्यामुळे यंदाचा दिवाळीचा फराळ बनवताना तुम्ही जर अशा सकस घटकांचा वापर करून फराळाचे पदार्थ बनवले तर तुमची दिवाळी ही आरोग्यदायी जाईल. 

महत्वाच्या बातम्या : 

Diwali 2022 : दिवाळीत अभ्यंगस्नानाला आहे विशेष महत्त्व; जाणून घ्या उटणे लावण्याचे फायदे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget