एक्स्प्लोर

तलाठी परीक्षा उत्तीर्ण, महिने उलटले तरी नोकरी नाही, 3 हजारांपेक्षा जास्त तरुण-तरुणी नियुक्तीच्या प्रतीक्षेत!

महाराष्ट्र सरकारने तलाठी परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केलेल्या 3 हजार 749 तरुण-तरुणींची अद्याप नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे या तरुण-तरुणींकडून संताप व्यक्त केला जातोय.

मुंबई : सध्या संपूर्ण राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांत पोलीस भरती (Police Bharti) चालू झाली आहे. आजपासून या जिल्ह्यांत मैदानी चाचण्या घेतल्या जातायत. सरकारी नोकर होण्याची नामी संधी हीच आहे, असे समजून या चाचणी परीक्षात लाखो पीरक्षार्थीनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पोलीस विभागात वेगवेगळ्या पदांसाठी चालू असलेल्या या भरती प्रक्रियेत तरुण उत्साहाने सहभागी होत आहेत. मात्र एकीकडे पोलीस भरतीची प्रक्रिया चालू असताना दुसरीकडे तलाठी (Talathi) पदासाठी निवड झालेल्या मात्र अद्याप नियुक्ती न मिळालेल्या यशस्वी परीक्षार्थींचा मुद्दा समोर आला आहे. या यशस्वी परीक्षार्थीची  अद्याप तलाठी म्हणून नेमणूक झालेली नाही. त्यामुळे सरकारला ग्रामीण भागातील प्रशासनाची चिंता नाही का? असे विचारले जात आहे. 

3 हजार 749 तरुण तरुणींना अद्याप नेमणूक नाही

राज्य सरकारने तलाठी पदासाठी गेल्या वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात स्पर्धा परीक्षा घेतली. जानेवारी महिन्यात त्याचा निकालही लागला. या निकालानंतर 4 हजार 744 यशस्वी परीक्षार्थींचे प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्र व तपशिलांची पडताळणीही झाली. मात्र अजूनही तलाठी पदासाठी निवड झालेल्या राज्यातील सुमारे 3 हजार 749 तरुण तरुणींना नेमणूक दिली जात नाहीये. ग्रामीण भागात तलाठी हे पद फार महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांची बहुसंख्य कामे ही तलाठ्याकडेच असतात. मात्र अद्याप हजारो यशस्वी परीक्षार्थींना सेवेत सामावून घेण्यात आलेले नाही. त्यामुळे ग्रामीण भागात शासनाचं काम बळकट करण्यात राज्य सरकार इच्छुक नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

फडणवीसांची घेतली भेट, पण अद्याप निर्णय नाही

निवड होऊनही नेमणुकीच्या प्रतीक्षेत असलेले तलाठी गेले अनेक महिने त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. वेगवेगळे कारण सांगून संबंधित जिल्हा प्रशासन या तलाठ्यांना नेमणूक पत्र देत नाहीये. नुकतेच या तलाठ्यांच्या एका शिष्टमंडळांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात भेटही घेतली होती. मात्र अद्याप या यशस्वी परीक्षार्थिंना सेवेत सामावून घेण्यात आलेले नाही. त्यामुळे आता या यशस्वी परीक्षार्थींकडून संताप व्यक्त केला जात आहे. सरकार यांना सेवेत कधी सामावून घेणार असा प्रश्न विचारला जातोय.

हेही वाचा :

Police Bharti : नाशिक ते धुळे, संभाजीनगर ते अमरावती, राज्यात पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात; गैरप्रकार रोखण्यासाठी चोख व्यवस्था!

आठव्या वेतन आयोगाची स्थापना करण्याच्या मागणीला जोर, लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार?

सरकारी नोकरीची मोठी संधी! असिस्टंट लोको पायलट रिक्त पदांच्या संख्येत तिपटीने वाढ, तयारीला लागा

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Assam Election : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Donald Trump Warning Iran : Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार
Congress On Himanta Biswa Sarma : आसामचा रणसंग्राम, काँग्रेसची हिमंता बिस्वा यांच्यावर गंभीर आरोप
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Khalapur Bhondu Baba : खालापूरमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश, अनेक महिलांवर केला अत्याचार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Assam Election : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप
भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
Embed widget