एक्स्प्लोर

Aai Kuthe Kay Karte : यशच्या निमित्ताने अरुंधती-अनिरुद्धमध्ये पुन्हा आपुलकी निर्माण होणार? ‘आई कुठे काय करते’ नव्या वळणावर!

Aai Kuthe Kay Karte : स्टार प्रवाह वाहिनीवरील (Star Pravah) ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या पुन्हा एकदा भरारी घेत आहे.

Aai Kuthe Kay Karte : स्टार प्रवाह वाहिनीवरील (Star Pravah) ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या पुन्हा एकदा भरारी घेत आहे. मालिकेत सध्याचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक ठरत आहे. कथानकातील ट्विस्टनंतर आता मालिका टीआरपी शर्यतीत देखील बाजी मारत आहे. मालिकेत सध्या यशवर खोट्या खुनाचा आरोप लागल्याचा ट्रॅक सुरु होता. याच निमित्ताने संपूर्ण देशमुख कुटुंब जवळ आलं आहे. यातच आपल्या मुलांना संकटातून बाहेर काढताना पुन्हा एकदा अरुंधती आणि अनिरुद्ध यांच्या नात्यात आपुलकी निर्माण झाली आहे.

यश देशमुख यांच्यावर नील कामत याचा खून केल्याचा आरोप लावण्यात आला होता. मात्र, आता यश त्यातून निर्दोष सुटला आहे. केवळ, गुन्हा लपवण्यासाठी आणि यशला फसवण्यासाठी हा कट रचण्यात आल्याचे अरुंधतीने सिद्ध केले आहे. देशमुख आणि गोखले कुटुंबाच्या मेहनतीमुळे यश तुरुंगातून आणि या आरोपांमधून निर्दोष मुक्त होऊन बाहेर पडला आहे.

नेमकं काय झालं होतं?

यश आणि ईशा, गौरी व मित्र-मैत्रिणींसोबत अनिरुद्धच्या मित्राच्या फार्महाऊसवर पिकनिकसाठी गेले होते. या फार्महाऊसवर त्यांचा अनिरुद्धच्या मित्राचा मुलगा नील देखील होता. ईशाला पाहताच क्षणी त्याच्या मनात विकृत इच्छा जागृत झाल्या. कुणाचेही लक्ष नसताना त्याने ईशाला एका खोलीत डांबून तिच्या अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याचवेळी यश ईशाला शोधात तिथे पोहचल्यामुळे ईशाला वाचवताना दोघांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती.

जवळचा चाकू उचलून नील यशला मारणार, इतक्यात यशने खाली पडलेला रॉड उचलून नीलच्या डोक्यात मारला होता. यावेळी नील मेला असं समजून यश आणि ईशा तिथून निघाले होते. मात्र, काहीवेळानंतर तिथून नील गायब झाला होता. यानंतर यशनेच त्याचा खून केला असा आरोप लावण्यात आला होता. या आरोपाखाली त्याला पाच दिवसांचा तुरुंगवासही भोगावा लागला होता. मात्र, नील कामात जिवंत असून, त्याचा गुन्हा लपवण्यासाठी तो आपल्या मुलाला यात अडकवतो आहे, हे अरुंधतीने सिद्ध केलं आहे.

मुलांच्या काळजीपोटी अनिरुद्ध-अरुंधती एकत्र येणार?

यशला या प्रकरणातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी अरुंधतीसोबतच अनिरुद्धने देखील कंबर कसली होती. आपल्या मुलांना मानसिकरित्या कोलमडताना पाहून अरुंधती देखील खचली होती. यावेळी अनिरुद्धने तिला आधार दिला. आपल्या मुलांना यातून बाहेर काढू असा विश्वास त्याने दिला. यामुळे आता मुलांच्या भविष्यासाठी अरुंधती आणि अनिरुद्ध पालक म्हणून नेहमी एकत्र उभे राहणार आहेत.

हेही वाचा :

Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’मधून ‘अरुंधती’ने घेतला ब्रेक! मालिकेत कधी परतणार?

PHOTO : नवी कोरी साडी लाखमोलाची...’संजना’ फेम रुपाली भोसलेच्या दिलकश अदा!

महत्त्वाच्या बातम्या

Shilpa Shinde Viral Video Controversy: 'भाभीजी का MMS'; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बदनामीचा कट, आईला ऐकावे लागले टोमणे, 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा
'भाभीजी का MMS'; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बदनामीचा कट, आईला ऐकावे लागले टोमणे, 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा
Krushnaichya Leki Marathi Serial: 'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्याच्या बायकोची 'कृष्णाईच्या लेकी'मध्ये वर्णी; मिळाली महत्त्वाची भूमिका, म्हणाली...
'लक्ष्मी निवास' फेम अभिनेत्याच्या बायकोची 'कृष्णाईच्या लेकी'मध्ये वर्णी; मिळाली महत्त्वाची भूमिका, म्हणाली...
Adinath Kothare Urmilla Kothare Divorced, Know There Love Story: झोपेतून उठताच उर्मिला समोर दिसली अन् आदिनाथ कोठारेचं मन तिच्यावर जडलं; आदिनाथ कोठारे- उर्मिला कानेटकरची लव्हस्टोरी
झोपेतून उठताच उर्मिला समोर दिसली अन् आदिनाथ कोठारेचं मन तिच्यावर जडलं; आदिनाथ कोठारे- उर्मिला कानेटकरची लव्हस्टोरी
Samarth Marathi Movie: ज्या समर्थ विचारांनी आयुष्याला दिशा दिली, त्याच संस्कारांची नव्यानं आठवण करून देणारा 'समर्थ'; टीझर पाहिलात?
ज्या समर्थ विचारांनी आयुष्याला दिशा दिली, त्याच संस्कारांची नव्यानं आठवण करून देणारा 'समर्थ'; टीझर पाहिलात?

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BCCI On Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
Sonam Wangchuk Hunger Strike: दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
Nashik Crime News: नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
Maharashtra Weather Update : राज्यातील पावसाबाबत मोठी अपडेट; चार दिवस कोकणसह घाटमाथ्यावर मुसळधार, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाता अंदाज
राज्यातील पावसाबाबत मोठी अपडेट; चार दिवस कोकणसह घाटमाथ्यावर मुसळधार, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाता अंदाज
Abhijeet Dipke : सोनम वांगचूक यांना 'जंतर मंतर'वरुन दिल्ली पोलिसांनी हटवलं, अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
सोनम वांगचूक यांना 'जंतर मंतर'वरुन दिल्ली पोलिसांनी हटवलं, अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "आंदोलकांना मारहाण अन् बळजबरीने..."
Maharashtra Breaking LIVE: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी
Maharashtra Breaking LIVE: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी
Manoj Jarange Patil: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आजचा 21वा दिवस; मनोज जरांगेंकडून आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, विद्यार्थी महत्त्वाचे की मंत्री?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आजचा 21वा दिवस; मनोज जरांगेंकडून आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, विद्यार्थी महत्त्वाचे की मंत्री?
Embed widget