![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
'शेतकरी फूड सोल्जर', शेतकरी आंदोलनाला प्रियांका चोप्रा, सोनम कपूरचा पाठिंबा
नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने उद्या 8 डिसेंबरला 'भारत बंद' (Bharat Bandh 8 December) पुकारण्यात आला आहे. या आंदोलनाला राजकीय पक्ष, खेळाडू, साहित्यिक यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. आता अभिनेत्री सोनम कपूर आणि प्रियांका चोप्रा आता शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पुढं आल्या आहेत.
!['शेतकरी फूड सोल्जर', शेतकरी आंदोलनाला प्रियांका चोप्रा, सोनम कपूरचा पाठिंबा priyanka chopra and sonam kapoor supported farmer movement by writing a post Bharat Bandh Farmer Protest 'शेतकरी फूड सोल्जर', शेतकरी आंदोलनाला प्रियांका चोप्रा, सोनम कपूरचा पाठिंबा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/07153128/farmer-protest.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने उद्या 8 डिसेंबरला 'भारत बंद' पुकारण्यात आला आहे. गेल्या 12 दिवसांपासून राजधानी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला राजकीय पक्ष, खेळाडू, साहित्यिक यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. यात आता दोन अभिनेत्रींचा समावेश झाला आहे. अभिनेत्री सोनम कपूर आणि प्रियांका चोप्रा आता शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पुढं आल्या आहेत. सोनम आणि प्रियांकानं सोशल मीडियावरुन शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे.
शेतकरी मानवी सभ्यतेचे संस्थापक- सोनम
शेतकरी आंदोलनाला सपोर्ट करताना सोनमनं आंदोलनाचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. या फोटोंसोबत सोनमनं डॅनियल वेबस्टर यांचं एक वाक्य शेअर केलंय. त्यात शेतकरी मानवी सभ्यतेचे संस्थापक असल्याचं लिहिलं आहे. सोनमचा पती आनंद आहूजानं देखील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
शेतकरी फूड सोल्जर - प्रियांका अभिनेत्री प्रियांका चोप्रानं शेतकऱ्यांना भारतीय सैनिक म्हटलं आहे. त्यांच्या अपेक्षा पूर्ण व्हायला हव्यात असं तिनं म्हटलं आहे. प्रियांकानं पोस्टमध्ये लिहिलं आहे की, आपले शेतकरी भारताचे फूड सोल्जर आहेत. त्यांची भीती दूर होणं गरजेचं आहे. त्यांच्या अपेक्षा पू्र्ण व्हायला हव्यात. एक सशक्त लोकशाही असलेल्या देशात शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा निघायला हवा, असं प्रियांकानं म्हटलं आहे.
अनेक सेलिब्रेटींचा पाठिंबा प्रियंका आणि सोनमशिवाय अनेक कलाकारांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यात रितेश देशमुख, हंसल मेहता, गौहर खान, चित्रांगदा सिंह यांचा समावेश आहे. अभिनेता दिलजीत दोसांझने तर या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक कोटी रुपये दिले आहेत.
'भारत बंद'ला अनेक पक्षांचे समर्थन
शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला देशातील अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, बसपा, पीएजीडी, एसीपी, सीपीआई, सीपीएम, सीपीआई (एलएल), आरएसपी, आरजेडी, डीएमके, एआयएफबी, जेएमएम, टीआरएस, आम आदमी पार्टी, राष्ट्रीय लोकशाही पार्टी यामध्ये प्रमुख पक्षांचा समावेश आहे. राजस्थानचे खासदार आणि आरएलपीचे नेते हनुमान बेनीवाल यांनी तर 8 डिसेंबरनंतर एनडीएकडे रहायचे की नाही याबाबत आपण निर्णय घेणार असल्याचेही म्हटले आहे. केंद्र सरकारने चर्चेविना अंमलात आणलेल्या जाचक कृषी कायद्याविरोधात तीव्र आंदोलनासाठी शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबर रोजी राष्ट्रव्यापी ‘भारत बंद’ पुकारला आहे. या ‘भारत बंद’ला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे समर्थन देत आहे, असं जयंत पाटलांनी सांगितलं आहे. तर कोरोनामुळे देशच बंद असल्याची स्थिती वर्षभर होती, परंतु या संकटाच्या काळातही देशातील शेतकरी कर्तव्यभावनेने शेतावर राबत होता हे विसरता येणार नाही. त्यामुळे शेतकरी जर आपल्या मागण्यांसाठी एक दिवसाचा बंद करत असतील तर जनतेने स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी होऊन आपल्या अन्नदात्याच्या मागे ठामपणे उभे राहावे, असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.
Bharat Bandh : 8 डिसेंबरला 'भारत बंद' दरम्यान काय सुरू राहणार, काय बंद?
राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनांशिवाय या बंदला अनेक बॅंक कर्मचारी संघटनांनी देखील पाठिंबा दिला आहे. बॅंक यूनियन्सने सरकारला लवकरात लवकर या मुद्द्यावर तोडगा काढावा असं आवाहन केलं आहे. ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉइज असोसिएशन (एआयबीईए)नं म्हटलं आहे की, सरकारने पुढं येऊन देश आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या मागण्यांवर विचार करुन समाधान केलं पाहिजे.
कोणते आहेत ते तीन कायदे, ज्याचा होतोय विरोध 1. मूल्य उत्पादन आणि कृषी सेवा अधिनियम, 2020 2. आवश्यक वस्तू (संशोधन) अधिनियम, 2020 3. शेतकऱ्यांचं उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (संवर्धन आणि सुविधा) अधिनियम, 2020
9 तारखेला केंद्र सरकार कृषि कायद्याबाबत मोठा निर्णय घेणार?
तीन वाजेपर्यंत चक्का जाम राहील रविवारी 'भारत बंद'च्या दिवशी सकाळी आठ ते संध्याकाळपर्यंत देशव्यापी बंद राहणार असल्याची माहिती शेतकऱ्यांकडून देण्यात आली आहे. यासह सकाळी आठ ते दुपारी तीन या वेळेत एकूण रहदारी ठप्प होईल. अशा परिस्थितीत, जर आपण या दिवशी बाहेर पडणार असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा. याशिवाय केवळ अत्यावश्यक सेवांनाच परवानगी दिली जाईल. रुग्णवाहिका इत्यादी अत्यावश्यक सेवांना थांबवलं जाणार नाही. याखेरीज भारत बंद दरम्यान लग्नासाठीच्या गाड्यांना न थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दूध-फळ-भाजीच्या सेवेवर बंदी भारत बंदच्या दिवशी शेतकरी संघटनांनी दूध, फळे आणि भाजीपाल्याच्या सेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, म्हणजे तुम्हाला 8 डिसेंबरला या सेवा मिळणार नाहीत. विशेष म्हणजे, रविवारी दिल्लीत निषेध करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांचा अकरावा दिवस आहे. 8 डिसेंबरला शेतकर्यांनी भारत बंद पुकारला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)