एक्स्प्लोर

Kishore Kumar Death Anniversary: एक, दोन नाहीतर तब्बल चार लग्न, तीदेखील स्टार हिरोईन्ससोबत; दुसरी पत्नी तर बॉलिवूडची ब्लॉकबस्टर स्टार; ओळखलं का कोण?

Kishore Kumar Death Anniversary: हा फिल्मस्टार केवळ गायक नव्हता तर अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि संगीतकार देखील होता. त्याचा 'चलती का नाम गाडी' हा चित्रपट आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे.

Kishore Kumar Death Anniversary: भारतीय चित्रपटसृष्टीच्या (Indian Film Industry) सुवर्णकाळात लाखो हृदयांना स्पर्श करणारा आणि संगीताच्या जगात अमर झालेला आवाज ऐकायला मिळाला. किशोर कुमार (Kishor Kumar) हे केवळ गायक नव्हते, तर एक बहुमुखी कलाकार होते, ज्यांना 'किशोर दा' (Kishor Da) म्हणून ओळखलं जायचं. त्यांच्या मखमली आवाजानं आणि मध्येच विराम देण्याची अनोखी शैली त्यांना एक उत्कृष्ट संगीतकार बनवते.

4 ऑगस्ट 1929 रोजी मध्य प्रदेशातील खंडवा इथे जन्मलेल्या किशोर कुमार यांचं खरं नाव आभास कुमार गांगुली होतं. त्यांचे मोठे भाऊ अशोक कुमार हे आधीच एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते (Bollywood Actor) होते, ज्यामुळे किशोर कुमार यांचा सिनेसृष्टीत येण्याचा रस्ता मोकळा झाला. अशोक कुमार अभिनयात उत्कृष्ट होते, तर किशोर कुमार यांनी त्यांच्या गाण्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. 

किशोर कुमार यांचं पहिलं गाणं

किशोर कुमार यांनी सुरुवातील अभिनयातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. पण, त्यांचा आत्मा संगीतात होता. किशोर कुमार यांनी 1946 मध्ये 'शिकारी' या सिनेमातून अभिनयात पदार्पण केलं. पण, त्यांना अभिनयात अजिबात रस नव्हता. त्यांना के.एल. सैगल   यांच्यासारखं गायक व्हायचं होतं. 1948 मध्ये त्यांनी खेमचंद प्रकाश यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली 'जिद्दी' चित्रपटात देव आनंद यांच्यासाठी त्यांचं पहिलं गाणं 'मरने की दुआएं क्यूं मांगू, जीने की तमन्ना कौन करे' गायलं. त्यानंतर एक संगीतकार, गायक म्हणून त्यांनी बॉलिवूडमध्ये मोठं यश मिळवलं आणि कधीच मागे वळून पाहिलं नाही. 

किशोर कुमार यांची जोडी कोणासोबत जुळली?

किशोर कुमार हा असा आवाज होता, ज्यानं हिंदी चित्रपटसृष्टीला 'मेरे सपनो की रानी', 'पल पल दिल के पास' आणि 'जिंदगी एक सफर है सुहाना' अशी असंख्य सदाबहार गाणी दिली. त्यांचं गाण्याचं कसब जादुसारखंच होतं. ते रोमँटिक किंवा उत्साही गाणी गायचेच, पण त्यांनी दुःख व्यक्त करणारी अगदी थेट काळजाला भिडणारी गाणीही गायली. ते प्रत्येक भावना परिपूर्णतेनं गाण्यातून व्यक्त करायचे. त्यांच्या आवाजातील चैतन्यामुळे ते प्रत्येक पिढीचे आवडते बनले. त्यांच्या आवाजानं प्रत्येक भावना जिवंत केली. त्यांनी आरडी बर्मन आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल सारख्या संगीतकारांसोबत काम करून अनेक धमाकेदार गाणी गायली. किशोर कुमार यांचं संगीतकार आरडी बर्मन यांच्याशी एक खास नातं होतं. दोघांनी 'कटी पतंग' आणि 'अमर प्रेम' यासह असंख्य हिट गाणी दिली.

चार लग्न केली, चारही अभिनेत्रींसोबत... 

किशोर कुमार हे केवळ गायक नव्हते, तर एक उत्तम अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि संगीतकार देखील होते. त्यांचा 'चलती का नाम गाडी' हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये अजूनही लोकप्रिय आहे. त्यांच्या विनोदी शैलीनं आणि सहज अभिनयानं त्यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलं, पण किशोर कुमार यांचं वैयक्तिक जीवन त्यांच्या कलेइतकंच गुंतागुंतीचं होतं. रुमा घोष, मधुबाला, योगिता बाली आणि लीना चंदावरकर या अभिनेत्रींसोबत चार लग्न केली, त्यानंतर किशोर कदम यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहायला मिळाले.

किशोर कुमार यांचं 13 ऑक्टोबर 1987 रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं, पण त्यांचा आवाज आजही जिवंत आहे. मग ते रेडिओवर असो, संगीत मैफिलींमध्ये असो किंवा लोकांच्या हृदयात...

'पल पल दिल के पास'चा रोमँटिक सूर असो किंवा 'एक लडकी भिगी भागी सी' गाण्यातला खट्याळपणा असो, किशोर कुमार यांची जादू कधीही कमी होणार नाही. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

फिल्मसाठी सोडली मोठ्या पगाराची नोकरी, पण वडिलांपासून लपवलं; अखेर नशीब चमकलं, आता ब्लॉकबस्ट किंग म्हणून ओळखला जातो 'हा' अभिनेता

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vijay Wadettiwar on Parth Pawar: पुण्यात एक लाख कोटींचा जमीन घोटाळा, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा; म्हणाले, पार्थ पवारांनी...
पुण्यात एक लाख कोटींचा जमीन घोटाळा, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा; म्हणाले, पार्थ पवारांनी...
Rohit Pawar: 'आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, ज्याप्रमाणे छत्रपती दोषींना कडक शासन करायचे त्याचप्रमाणे आपण देखील..' रोहित पवारांनी कोणती मागणी केली?
'आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, ज्याप्रमाणे छत्रपती दोषींना कडक शासन करायचे त्याचप्रमाणे आपण देखील..' रोहित पवारांनी कोणती मागणी केली?
Maharashtra weather update: महाराष्ट्राला थंडीची चाहूल! पुढील 24 तासांत मुंबईसह राज्यभरात तापमान कमी होणार, हवामान खात्याचा अंदाज काय?
महाराष्ट्राला थंडीची चाहूल! पुढील 24 तासांत मुंबईसह राज्यभरात तापमान कमी होणार, हवामान खात्याचा अंदाज काय?
Ambadas Danve: अजित पवार शेतकऱ्यांना म्हणतात, तुम्हाला सगळं फुकट लागतं, मग तुम्हाला का जमीन फुकट लागते? 1800 कोटींची जमीन 300 कोटीत का लागते?? अंबादास दानवेंचा बोचरा सवाल
अजित पवार शेतकऱ्यांना म्हणतात, तुम्हाला सगळं फुकट लागतं, मग तुम्हाला का जमीन फुकट लागते? 1800 कोटींची जमीन 300 कोटीत का लागते?? अंबादास दानवेंचा बोचरा सवाल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Politics: 'शेतकरी भोळा आहे, पण मूर्ख नाही', Uddhav Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
Uddhav Thackeray : लाडक्या बहिणीला 2100 रुपये द्या, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, ठाकरेंची मागणी
Marathwada Tour 'अदानीच्या सिमेंटला हमीभावापेक्षा कमी भाव मिळतो का?', Uddhav Thackeray यांचा सवाल
Pune Land Scam: 'तोंडात किडे पडतील', सरकारची फसवणूक करताय; विजय वडेट्टीवारांचा घणाघात
Vijay Wadettiwar on Parth Pawar : पुणे जमीन घोटाळ्याचे आरोप, वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijay Wadettiwar on Parth Pawar: पुण्यात एक लाख कोटींचा जमीन घोटाळा, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा; म्हणाले, पार्थ पवारांनी...
पुण्यात एक लाख कोटींचा जमीन घोटाळा, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा; म्हणाले, पार्थ पवारांनी...
Rohit Pawar: 'आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, ज्याप्रमाणे छत्रपती दोषींना कडक शासन करायचे त्याचप्रमाणे आपण देखील..' रोहित पवारांनी कोणती मागणी केली?
'आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, ज्याप्रमाणे छत्रपती दोषींना कडक शासन करायचे त्याचप्रमाणे आपण देखील..' रोहित पवारांनी कोणती मागणी केली?
Maharashtra weather update: महाराष्ट्राला थंडीची चाहूल! पुढील 24 तासांत मुंबईसह राज्यभरात तापमान कमी होणार, हवामान खात्याचा अंदाज काय?
महाराष्ट्राला थंडीची चाहूल! पुढील 24 तासांत मुंबईसह राज्यभरात तापमान कमी होणार, हवामान खात्याचा अंदाज काय?
Ambadas Danve: अजित पवार शेतकऱ्यांना म्हणतात, तुम्हाला सगळं फुकट लागतं, मग तुम्हाला का जमीन फुकट लागते? 1800 कोटींची जमीन 300 कोटीत का लागते?? अंबादास दानवेंचा बोचरा सवाल
अजित पवार शेतकऱ्यांना म्हणतात, तुम्हाला सगळं फुकट लागतं, मग तुम्हाला का जमीन फुकट लागते? 1800 कोटींची जमीन 300 कोटीत का लागते?? अंबादास दानवेंचा बोचरा सवाल
Parth Pawar: पार्थ पवारांनी 1800 कोटींच्या जमिनीसाठी फक्त 500 रूपये मुद्रांक शुल्क भरले? राज्य सरकारकडून 21 कोटींचे मुद्रांक शुल्क माफ?
पार्थ पवारांनी 1800 कोटींच्या जमिनीसाठी फक्त 500 रूपये मुद्रांक शुल्क भरले? राज्य सरकारकडून 21 कोटींचे मुद्रांक शुल्क माफ?
सर्वात मोठ्या किडनी तस्करी टोळीचा पर्दाफाश; एकाच गावातील 40 टक्के लोकांची एक किडनी गायब! महिला सुद्धा बळी पडल्या
सर्वात मोठ्या किडनी तस्करी टोळीचा पर्दाफाश; एकाच गावातील 40 टक्के लोकांची एक किडनी गायब! महिला सुद्धा बळी पडल्या
NCP Pune Politics: पवार काका-पुतणे एकत्र येणार? पिंपरी चिंचवडमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं पहिलं पाऊल, अजितदादांचा पक्ष भाजपविरोधात आमच्यासोबत आला तर...
पवार काका-पुतणे एकत्र येणार? पिंपरी चिंचवडमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं पहिलं पाऊल, अजितदादांचा पक्ष भाजपविरोधात आमच्यासोबत आला तर...
Brazilian Model Video Rahul Gandhi:  Hello India...राहुल गांधींनी फोटो दाखवलेल्या ब्राझीलियन मॉडेलची पहिली प्रतिक्रिया, व्हिडीओमध्ये मनातलं सगळं बोलली!
Hello India...राहुल गांधींनी फोटो दाखवलेल्या ब्राझीलियन मॉडेलची पहिली प्रतिक्रिया, व्हिडीओमध्ये मनातलं सगळं बोलली!
Embed widget