एक्स्प्लोर

आज ते तिघेही अमर झाले, कवी प्रदीप, लतादीदी आणि....!

Lata Mangeshkar Passes Away : देशवासियांचे जसे आज अश्रू वाहत आहेत, तसंच त्यावेळीही वाहत होते, ज्यावेळी लता मंगेशकर यांनी ए मेरे वतन के लोगो हे अजरामर गाणं गायिलं.

Lata Mangeshkar Passes Away : संपूर्ण देशवासियांच्या डोळ्यात आज अश्रू आहेत. प्रत्येक भारतीयांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या आहेत. देशवासियांचे जसे आज अश्रू वाहत आहेत, तसंच त्यावेळीही वाहत होते, ज्यावेळी लता मंगेशकर यांनी ए मेरे वतन के लोगो हे अजरामर गाणं गायिलं. त्यावेळी तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनाही अश्रू आवरता आले नव्हते. लतादीदी यांनी गायलेलं हेच गाणं, ज्यांनी लिहिलं ते म्हणजे कवी प्रदीप. कवी प्रदीप यांच्या लेखणीतून उतरलेल्या या गीताला लतादीदींच्या सुरांचा साज चढला आणि हे गाणं अमर झालं. आज अनोखा योगायोग म्हणजे ज्या कवींच्या लेखणीतून ए मेरे वतन के लोगो हे गाणं उतरलं, त्या कवी प्रदीप यांची आज जयंती. आणि ज्या गोड गळ्यातून हे गाणं प्रत्यक्ष श्रोत्यांच्या कानातून मनात पोहोचलं त्या लतादीदींचा अखेरचा दिवस. ज्या दिवशी प्रदीप जन्मले, त्या दिवशीच म्हणजे 6 फेब्रुवारीला लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. 

आज जरी हे दोन्ही तारे आपल्यात नसले तरी ते तिघेही अमर आहेत. ते तिघे म्हणजे गाणं लिहिणारे कवी प्रदीप, त्या गाण्याला सुवर्णसाज चढवणाऱ्या लतादीदी आणि ए मेरे वतन के लोगो हे गाणं...  आज लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप दिला जातोय, तर आजच्याच दिवशी 107 वर्षांपूर्वी कवी प्रदीप यांचा जन्म झाला होता. 

कवी प्रदीप यांनी लिहिलेलं आणि लतादीदींनी गायलेल्या या गाण्याशिवाय देशभक्तीवरील कोणताही कार्यक्रम होऊच शकत नाही. 
 
कवी प्रदीप यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1915 रोजी मध्य प्रदेशातील बडनगरमध्ये झाला होता. तर 11 डिसेंबर 1998 मध्ये त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. 1940 मध्ये प्रदर्शित झालेल्या बंधन सिनेमामुळे कवी प्रदीप यांना ओळख मिळाली. मात्र ते लोकप्रिय झाले ते 1943 मध्ये आलेल्या किस्मत सिनेमातील 'दूर हटो ऐ दुनिया वालों हिंदुस्तान हमारा है' या गाण्यामुळे. या गाण्यामुळे त्यांना देशभक्तीपर गाणी लिहिणाऱ्या महानुभावांच्या पंक्तीत नेऊन ठेवलं.

कवी प्रदीप हे लहानपणी रामचंद्र नाराणय द्विवेदी या नावाने ओळखले जात होते. मात्र जसजसं कविता, गीतं लिहू लागले, तसतसं ते कवी प्रदीप म्हणून उदयास आले.

सिगारेट पाकिटावर अमर गीत - 
लता मंगेशकर आणि कवी प्रदीप यांच्या ए मेरे वतन के लोगो या गाण्याची कहाणीसुद्धा भन्नाट आहे. 1962 मध्ये चीनविरुद्ध झालेल्या लढाईत शहीद झालेल्या भारताच्या जवनांना आर्थिक मदतीसाठी एका चॅरिटी शोचं आयोजन करण्यात आलं होतं. हा शो 27 जानेवारी 1963 रोजी नियोजित होता. त्यावेळी तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरु आणि राष्ट्रपती राधाकृष्णन येणार होते. 
 
या कार्यक्रमासाठी दिग्गज कलाकारांनाही निमंत्रण होतं. यामध्ये महबूब खान, नौशाद, शंकर जयकिशन, मदन मोहन आणि सी रामचंद्र यासारख्या दिग्गजांचा समावेश होता. सी रामचंद्र हे उमदे संगीतकार होते, मात्र या कार्यक्रमासाठी त्यांना कोणतं गाणं मिळत नव्हतं. ऐनवेळी ते देशभक्तीसाठी प्रसिद्ध झालेल्या कवी प्रदीप यांच्याकडे गेले. त्यावेळी त्यांनी फुकटचं काम असलं की आमच्याकडे येतो, असा टोमणा रामचंद्र यांना मारला. मात्र त्यांनी गाणं लिहिण्यासाठी होकार दर्शवला. 
 
 असं सांगितलं जातं, कवी प्रदीप हे मुंबईतील माहिम समुद्रकिनारी फिरत होते त्यावेळी त्यांना गाणं सुचलं. त्याचवेळी त्यांनी सिगरेटच्या पाकिटावर शब्द रेखाटले... ए मेरे वतन के लोगो, जरा आँख में भरलो पानी...

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत महानायकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी, पण नेत्यांपासून नटांपर्यंत सगळेच गप्प, रोहित पवारांचा टोला  
मुंबईत महानायकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी, पण नेत्यांपासून नटांपर्यंत सगळेच गप्प, रोहित पवारांचा टोला  
Panchayat 5 OTT Release: बोहल्यावर चढणार ‘सचिव जी’, उपप्रधान होण्यासाठी रंगणार मोठा संघर्ष; ‘पंचायत 5’ कधी येणार?
बोहल्यावर चढणार ‘सचिव जी’, उपप्रधान होण्यासाठी रंगणार मोठा संघर्ष; ‘पंचायत 5’ कधी येणार?
Vicky Kaushal on Aamir Khan: आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; 'छावा'फेम अभिनेता विक्की कौशलची प्रतिक्रिया, हसून म्हणाला..
आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; 'छावा'फेम अभिनेता विक्की कौशलची प्रतिक्रिया, हसून म्हणाला..
Gaurav More Hindi Webseries: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम गौरव मोरे झळकला राजकुमार हिरानींच्या वेबसिरीजमध्ये! चाहत्यांच्या भुवया उंचावल्या; विशाखा सुभेदारची कमेंट चर्चेत
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम गौरव मोरे झळकला राजकुमार हिरानींच्या वेबसिरीजमध्ये! चाहत्यांच्या भुवया उंचावल्या; विशाखा सुभेदारची कमेंट चर्चेत

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
Share Market : शेअर बाजारात तेजीचं अमेरिका कनेक्शन, सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांनी 94 हजार कोटी कमावले
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 262 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 94270 कोटींची कमाई
Embed widget