एक्स्प्लोर

आज ते तिघेही अमर झाले, कवी प्रदीप, लतादीदी आणि....!

Lata Mangeshkar Passes Away : देशवासियांचे जसे आज अश्रू वाहत आहेत, तसंच त्यावेळीही वाहत होते, ज्यावेळी लता मंगेशकर यांनी ए मेरे वतन के लोगो हे अजरामर गाणं गायिलं.

Lata Mangeshkar Passes Away : संपूर्ण देशवासियांच्या डोळ्यात आज अश्रू आहेत. प्रत्येक भारतीयांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या आहेत. देशवासियांचे जसे आज अश्रू वाहत आहेत, तसंच त्यावेळीही वाहत होते, ज्यावेळी लता मंगेशकर यांनी ए मेरे वतन के लोगो हे अजरामर गाणं गायिलं. त्यावेळी तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनाही अश्रू आवरता आले नव्हते. लतादीदी यांनी गायलेलं हेच गाणं, ज्यांनी लिहिलं ते म्हणजे कवी प्रदीप. कवी प्रदीप यांच्या लेखणीतून उतरलेल्या या गीताला लतादीदींच्या सुरांचा साज चढला आणि हे गाणं अमर झालं. आज अनोखा योगायोग म्हणजे ज्या कवींच्या लेखणीतून ए मेरे वतन के लोगो हे गाणं उतरलं, त्या कवी प्रदीप यांची आज जयंती. आणि ज्या गोड गळ्यातून हे गाणं प्रत्यक्ष श्रोत्यांच्या कानातून मनात पोहोचलं त्या लतादीदींचा अखेरचा दिवस. ज्या दिवशी प्रदीप जन्मले, त्या दिवशीच म्हणजे 6 फेब्रुवारीला लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. 

आज जरी हे दोन्ही तारे आपल्यात नसले तरी ते तिघेही अमर आहेत. ते तिघे म्हणजे गाणं लिहिणारे कवी प्रदीप, त्या गाण्याला सुवर्णसाज चढवणाऱ्या लतादीदी आणि ए मेरे वतन के लोगो हे गाणं...  आज लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप दिला जातोय, तर आजच्याच दिवशी 107 वर्षांपूर्वी कवी प्रदीप यांचा जन्म झाला होता. 

कवी प्रदीप यांनी लिहिलेलं आणि लतादीदींनी गायलेल्या या गाण्याशिवाय देशभक्तीवरील कोणताही कार्यक्रम होऊच शकत नाही. 
 
कवी प्रदीप यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1915 रोजी मध्य प्रदेशातील बडनगरमध्ये झाला होता. तर 11 डिसेंबर 1998 मध्ये त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. 1940 मध्ये प्रदर्शित झालेल्या बंधन सिनेमामुळे कवी प्रदीप यांना ओळख मिळाली. मात्र ते लोकप्रिय झाले ते 1943 मध्ये आलेल्या किस्मत सिनेमातील 'दूर हटो ऐ दुनिया वालों हिंदुस्तान हमारा है' या गाण्यामुळे. या गाण्यामुळे त्यांना देशभक्तीपर गाणी लिहिणाऱ्या महानुभावांच्या पंक्तीत नेऊन ठेवलं.

कवी प्रदीप हे लहानपणी रामचंद्र नाराणय द्विवेदी या नावाने ओळखले जात होते. मात्र जसजसं कविता, गीतं लिहू लागले, तसतसं ते कवी प्रदीप म्हणून उदयास आले.

सिगारेट पाकिटावर अमर गीत - 
लता मंगेशकर आणि कवी प्रदीप यांच्या ए मेरे वतन के लोगो या गाण्याची कहाणीसुद्धा भन्नाट आहे. 1962 मध्ये चीनविरुद्ध झालेल्या लढाईत शहीद झालेल्या भारताच्या जवनांना आर्थिक मदतीसाठी एका चॅरिटी शोचं आयोजन करण्यात आलं होतं. हा शो 27 जानेवारी 1963 रोजी नियोजित होता. त्यावेळी तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरु आणि राष्ट्रपती राधाकृष्णन येणार होते. 
 
या कार्यक्रमासाठी दिग्गज कलाकारांनाही निमंत्रण होतं. यामध्ये महबूब खान, नौशाद, शंकर जयकिशन, मदन मोहन आणि सी रामचंद्र यासारख्या दिग्गजांचा समावेश होता. सी रामचंद्र हे उमदे संगीतकार होते, मात्र या कार्यक्रमासाठी त्यांना कोणतं गाणं मिळत नव्हतं. ऐनवेळी ते देशभक्तीसाठी प्रसिद्ध झालेल्या कवी प्रदीप यांच्याकडे गेले. त्यावेळी त्यांनी फुकटचं काम असलं की आमच्याकडे येतो, असा टोमणा रामचंद्र यांना मारला. मात्र त्यांनी गाणं लिहिण्यासाठी होकार दर्शवला. 
 
 असं सांगितलं जातं, कवी प्रदीप हे मुंबईतील माहिम समुद्रकिनारी फिरत होते त्यावेळी त्यांना गाणं सुचलं. त्याचवेळी त्यांनी सिगरेटच्या पाकिटावर शब्द रेखाटले... ए मेरे वतन के लोगो, जरा आँख में भरलो पानी...

महत्त्वाच्या बातम्या

Aamir Khan and Gauri Spratt: आमिर अन् गौरी लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले; सिंपल लूक्सने जिंकले चाहत्यांचे मन, पाहा VIDEO
आमिर अन् गौरी लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले; सिंपल लूक्सने जिंकले चाहत्यांचे मन, पाहा VIDEO
Shraddha Kapoors Eetha: 'ईठा'बाबत मोठी अपडेट! श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार 'ही' भोजपुरी अभिनेत्री; भूमिकेबाबत सस्पेन्स कायम
'ईठा'बाबत मोठी अपडेट! श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार 'ही' भोजपुरी अभिनेत्री; भूमिकेबाबत सस्पेन्स कायम
Huma Kureshi On Bold Scene: आलिया भट्टच्या 'अल्फा' ला टक्कर; न्यूड सीनचा विषय निघताच बॉलिवूड अभिनेत्रीचा स्पष्ट नकार; कारण देत म्हणली ..
आलिया भट्टच्या 'अल्फा' ला टक्कर; न्यूड सीनचा विषय निघताच बॉलिवूड अभिनेत्रीचा स्पष्ट नकार; कारण देत म्हणली ..
Hemant Dhome on Mumbai-Pune Missing Link: पहिल्याच पावसात मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची सणसणीत पोस्ट, 4 शब्दांत भरपूर बोलला
पहिल्याच पावसात मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळला; प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची सणसणीत पोस्ट, 4 शब्दांत भरपूर बोलला

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget