एक्स्प्लोर

आज ते तिघेही अमर झाले, कवी प्रदीप, लतादीदी आणि....!

Lata Mangeshkar Passes Away : देशवासियांचे जसे आज अश्रू वाहत आहेत, तसंच त्यावेळीही वाहत होते, ज्यावेळी लता मंगेशकर यांनी ए मेरे वतन के लोगो हे अजरामर गाणं गायिलं.

Lata Mangeshkar Passes Away : संपूर्ण देशवासियांच्या डोळ्यात आज अश्रू आहेत. प्रत्येक भारतीयांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या आहेत. देशवासियांचे जसे आज अश्रू वाहत आहेत, तसंच त्यावेळीही वाहत होते, ज्यावेळी लता मंगेशकर यांनी ए मेरे वतन के लोगो हे अजरामर गाणं गायिलं. त्यावेळी तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनाही अश्रू आवरता आले नव्हते. लतादीदी यांनी गायलेलं हेच गाणं, ज्यांनी लिहिलं ते म्हणजे कवी प्रदीप. कवी प्रदीप यांच्या लेखणीतून उतरलेल्या या गीताला लतादीदींच्या सुरांचा साज चढला आणि हे गाणं अमर झालं. आज अनोखा योगायोग म्हणजे ज्या कवींच्या लेखणीतून ए मेरे वतन के लोगो हे गाणं उतरलं, त्या कवी प्रदीप यांची आज जयंती. आणि ज्या गोड गळ्यातून हे गाणं प्रत्यक्ष श्रोत्यांच्या कानातून मनात पोहोचलं त्या लतादीदींचा अखेरचा दिवस. ज्या दिवशी प्रदीप जन्मले, त्या दिवशीच म्हणजे 6 फेब्रुवारीला लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. 

आज जरी हे दोन्ही तारे आपल्यात नसले तरी ते तिघेही अमर आहेत. ते तिघे म्हणजे गाणं लिहिणारे कवी प्रदीप, त्या गाण्याला सुवर्णसाज चढवणाऱ्या लतादीदी आणि ए मेरे वतन के लोगो हे गाणं...  आज लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप दिला जातोय, तर आजच्याच दिवशी 107 वर्षांपूर्वी कवी प्रदीप यांचा जन्म झाला होता. 

कवी प्रदीप यांनी लिहिलेलं आणि लतादीदींनी गायलेल्या या गाण्याशिवाय देशभक्तीवरील कोणताही कार्यक्रम होऊच शकत नाही. 
 
कवी प्रदीप यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1915 रोजी मध्य प्रदेशातील बडनगरमध्ये झाला होता. तर 11 डिसेंबर 1998 मध्ये त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. 1940 मध्ये प्रदर्शित झालेल्या बंधन सिनेमामुळे कवी प्रदीप यांना ओळख मिळाली. मात्र ते लोकप्रिय झाले ते 1943 मध्ये आलेल्या किस्मत सिनेमातील 'दूर हटो ऐ दुनिया वालों हिंदुस्तान हमारा है' या गाण्यामुळे. या गाण्यामुळे त्यांना देशभक्तीपर गाणी लिहिणाऱ्या महानुभावांच्या पंक्तीत नेऊन ठेवलं.

कवी प्रदीप हे लहानपणी रामचंद्र नाराणय द्विवेदी या नावाने ओळखले जात होते. मात्र जसजसं कविता, गीतं लिहू लागले, तसतसं ते कवी प्रदीप म्हणून उदयास आले.

सिगारेट पाकिटावर अमर गीत - 
लता मंगेशकर आणि कवी प्रदीप यांच्या ए मेरे वतन के लोगो या गाण्याची कहाणीसुद्धा भन्नाट आहे. 1962 मध्ये चीनविरुद्ध झालेल्या लढाईत शहीद झालेल्या भारताच्या जवनांना आर्थिक मदतीसाठी एका चॅरिटी शोचं आयोजन करण्यात आलं होतं. हा शो 27 जानेवारी 1963 रोजी नियोजित होता. त्यावेळी तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरु आणि राष्ट्रपती राधाकृष्णन येणार होते. 
 
या कार्यक्रमासाठी दिग्गज कलाकारांनाही निमंत्रण होतं. यामध्ये महबूब खान, नौशाद, शंकर जयकिशन, मदन मोहन आणि सी रामचंद्र यासारख्या दिग्गजांचा समावेश होता. सी रामचंद्र हे उमदे संगीतकार होते, मात्र या कार्यक्रमासाठी त्यांना कोणतं गाणं मिळत नव्हतं. ऐनवेळी ते देशभक्तीसाठी प्रसिद्ध झालेल्या कवी प्रदीप यांच्याकडे गेले. त्यावेळी त्यांनी फुकटचं काम असलं की आमच्याकडे येतो, असा टोमणा रामचंद्र यांना मारला. मात्र त्यांनी गाणं लिहिण्यासाठी होकार दर्शवला. 
 
 असं सांगितलं जातं, कवी प्रदीप हे मुंबईतील माहिम समुद्रकिनारी फिरत होते त्यावेळी त्यांना गाणं सुचलं. त्याचवेळी त्यांनी सिगरेटच्या पाकिटावर शब्द रेखाटले... ए मेरे वतन के लोगो, जरा आँख में भरलो पानी...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Prithvi Shaw Engagement With Girlfriend Akriti Agarwal: इकडे टीम इंडियानं विश्वचषक उंचावला अन् तिकडे प्रसिद्ध क्रिकेटरनं दिली गूड न्यूज; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
इकडे टीम इंडियानं विश्वचषक उंचावला अन् तिकडे प्रसिद्ध क्रिकेटरनं दिली गूड न्यूज; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
बॉलिवूडमध्ये येतोय जबरदस्त अ‍ॅक्शन थ्रिलर! आलिया भट्टचा कधी न पाहिलेला अंदाज, कधी रिलीज होणार?
बॉलिवूडमध्ये येतोय जबरदस्त अ‍ॅक्शन थ्रिलर! आलिया भट्टचा कधी न पाहिलेला अंदाज, कधी रिलीज होणार?
Govinda Denies Cheating Rumours With Wife Sunita Ahuja: गोविंदा 'बेवफा' आहे? पत्नी सुनीताला फसवत असल्याच्या चर्चांवर अभिनेता स्पष्टच म्हणाला, 'लॉयल्टी भलतीकडेच...'
गोविंदा 'बेवफा' आहे? पत्नी सुनीताला फसवत असल्याच्या चर्चांवर अभिनेता स्पष्टच म्हणाला, 'लॉयल्टी भलतीकडेच...'
टीम इंडियाचे गबरु!! वर्ल्ड कप जिंकताच बॉलीवूडमध्ये जल्लोष, शाहरुख, सनीसह सेलिब्रिटींची टीम इंडियाला सलामी 
टीम इंडियाचे गबरु!! वर्ल्ड कप जिंकताच बॉलीवूडमध्ये जल्लोष, शाहरुख, सनीसह सेलिब्रिटींची टीम इंडियाला सलामी 

व्हिडीओ

Share Market Update : आशियातील सर्व बाजारांत मोठी घसरण, सेन्सेक्स 1800 अंक तर निफ्टी 525 अंक घसरणीवर
Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
Kolhapur Crime: कोल्हापूरमध्ये विवस्त्र व्यक्तीचा मृतदेह सापडला, चेहरा-मानेवर खोल वार, मनेरमळा परिसरात खळबळ
कोल्हापूरमध्ये विवस्त्र व्यक्तीचा मृतदेह सापडला, चेहरा-मानेवर खोल वार, मनेरमळा परिसरात खळबळ
S. Jaishankar on Iran: 'आम्ही एका इराणी जहाजाला आश्रय दिला आहे, आखाती देशात पुरवठा साखळी बाधित झाली आहे' परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेत कोणकोणती माहिती दिली?
'आम्ही एका इराणी जहाजाला आश्रय दिला आहे, आखाती देशात पुरवठा साखळी बाधित झाली आहे' परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेत कोणकोणती माहिती दिली?
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
Raj Thackeray MNS Vardhapan Din: जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
Stock Market Crash Today: युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
Ind vs NZ Final T20 World Cup 2026: फायनलच्या एकदिवसाआधी टीम इंडियाच्या खेळाडूच्या बहिणीचा मृत्यू; कार अपघातामध्ये गमावला जीव, अर्धशतक ठोकताच...
फायनलच्या एकदिवसाआधी टीम इंडियाच्या खेळाडूच्या बहिणीचा मृत्यू; कार अपघातामध्ये गमावला जीव, अर्धशतक ठोकताच...
Embed widget