Kangana Ranaut On Gen Z: तरुणांवर बरळणाऱ्या कंगना रनौतची भाषा बदलली; आता म्हणतेय, 'जेन-झी देशाचं भविष्य...'
Kangana Ranaut On Gen Z: काही दिवसांपूर्वीच जेन-झींना 'गटार जनरेशन' म्हणणाऱ्या कंगनानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. पण, यावेळी मात्र कंगनाचा सूर काहीसा बदलल्याचं पाहायला मिळालं.

Kangana Ranaut On Gen Z: दिल्लीतील (Delhi) जंतर-मंतरवर (Jantar Mantar) झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर (Student Protest) भाजप लोकसभा खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) कंगना रनौतनं (Kangana Ranaut) टीकेची राळ उठवली होती. जवळपास अख्खा देश तरुणांच्या पाठीशी ठामपणे उभा होता, पण कंगना रनौत मात्र तरुणाईवर उलट-सुलट बरळत सुटली होती. काही दिवसांपूर्वीच जेन-झींना (Gen Z) 'गटार जनरेशन' (Generation Gutter) म्हणणाऱ्या कंगनानं 'जनरेशन झेड' (Gen Z) बाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. पण, यावेळी मात्र कंगनाचा सूर काहीसा बदलल्याचं पाहायला मिळालं.
'जनरेशन झेड' (Gen Z) बाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्या प्रतिक्रिया देताना भाजप खासदार कंगना रनौत म्हणाली की, "जनरेशन झेड' ही आपल्या देशाची ताकद आणि एका अर्थानं आपल्या देशाचं भविष्य आहे. मोहन भागवत अत्यंत आदरणीय आहेत आणि त्यांचं ज्ञान, अनुभव ऐकण्याची संधी आम्हाला अनेकदा मिळाली आहे. देशातील तरुण पिढी आपल्या संस्कृतीचे दूत म्हणून पुढे येत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे..."
Delhi: On RSS chief Mohan Bhagwat's statement on Gen Z, BJP MP Kangana Ranaut says, "Gen Z is the strength of our country and, in a way, a very big heritage of our country. Mohan Bhagwat ji is highly respected, and we have had the opportunity to listen to his wisdom and… pic.twitter.com/c24oiTwYnq
— IANS (@ians_india) August 7, 2026
झारखंडमधील (Jharkhand) विविध भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेबाबत रांचीमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतनं तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. नवी दिल्लीतील संसद भवनाबाहेर माध्यमांशी बोलताना कंगना रनौत म्हणाली की, "आपली 'जनरेशन-झेड' (Gen-Z) मधील तरुण पिढी खरोखरंच विविध प्रकारच्या समस्यांचा सामना करतेय. हे प्रकार अनेक दशकांपासून सुरू आहेत... सगळीकडेच सध्या अशीच परिस्थिती पाहायला मिळतेय."
"केवळ तमाशा करण्यासाठी पुढे येणारा काँग्रेस पक्ष झारखंडमध्ये मात्र कुठेच दिसत नाही, जिथे विद्यार्थी अत्यंत कठीण परिस्थितीत आहेत. राहुल गांधी अशा ठिकाणी भेट देत नाहीत, तरीही तरुणांना भडकवण्याची वेळ येते, तेव्हा देशासाठी धोका निर्माण करण्यात तेच सर्वात पुढे असतात...", दिल्लीतील आंदोलनांबाबत राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावर कंगना रनौत यांनी कडक शब्दांत टीका केली आहे.
विद्यार्थ्यांचं 13 दिवसांपासून आंदोलन
JPSC आणि JSSC भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेची CBI द्वारे चौकशी करावी, या मागणीसाठी विद्यार्थी 13 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. या कथित अनियमिततेची CBI चौकशी ही त्यांची मुख्य मागणी असून, या प्रकरणावर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.
मला आनंद, त्यांनी चूक मान्य केली : कंगना रनौत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ हटवण्यावरून निर्माण झालेल्या वादाबाबत 'मेटा'नं (Meta) माफी मागितल्यानंतर कंगना रनौतनं समाधान व्यक्त केलंय. कंगना रनौत म्हणाली की, "मी सुद्धा त्या समितीची सदस्य आहे. आमचे अध्यक्ष निशिकांत दुबे यांनी अत्यंत ठाम भूमिका घेत माफीची मागणी केली होती. तसेच, देशविरोधी घटकांना कशा प्रकारे प्रोत्साहन दिलं जातं आणि व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातं, याबद्दलही आम्ही चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे, त्यांनी आपली चूक मान्य केली आहे, याचा आम्हाला आनंद आहे..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :






















