एक्स्प्लोर

Sukanya Mone : "हल्लीच्या मुलांना लग्नानंतर मूलबाळ नको असतं", सुकन्या मोनेंचं वक्तव्य चर्चेत; नेमकं प्रकरण काय?

Sukanya Mone : अभिनेत्री सुकन्या मोने यांचा 'जन्म ऋण'(Janma Runna) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने सध्या त्या प्रमोशन करत असून "हल्लीच्या मुलांना लग्नानंतर अपत्य नको असतं", असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

Sukanya Mone : "हल्लीच्या मुलांना लग्नानंतर अपत्य नको असतं, आई वडिलांनी आता सावध राहिलं पाहिजे, असं वक्तव्य मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सुकन्या मोने (Sukanya Mone) यांनी केलं आहे. सुकन्या मोने यांचा 'जन्म ऋण'(Janma Runna) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या त्या या सिनेमाचं प्रमोशन करत आहे. या सिनेमानिमित्ताने 'सिनेमागल्ली'ला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. 

सुकन्या मोने यांचा 'जन्म ऋण' हा सिनेमा सत्य परिस्थितीवर आधारित आहे. आजकाल आई-वडिलांना सोडून मुलं परदेशात जातात. मुलं विमानतळावर सोडून परदेशात गेल्यामुळे पालकांची दुर्दशा होते. अशावेळी पालकांची दुर्दशा की मुलांचं खडतर करिअर? असा प्रश्न उपस्थित होतो. अशावेळी आई-वडिलांनीदेखील स्वत:ला बळकट करणं गरजेचं आहे हे सांगणारा 'जन्म ऋण' हा चित्रपट आहे.

सुकन्या मोनेंनी 'जन्म ऋण' सिनेमा का केला? 

'सिनेमागल्ली'ला दिलेल्या मुलाखतीत सुकन्या मोने म्हणाल्या,"जन्म ऋण' सिनेमाची गोष्ट मी वाचली होती. या सिनेमाची गोष्ट आपण सर्वांनीच वर्तमानपत्रामध्ये वाचलेली असेल आणि माझ्या आसपास काही लोक मी पाहत होते त्यांची मुलं परदेशात आहेत. आमच्याकडे गणेशोत्सवामध्ये विसर्जनाला सोसायटीत पूर्वी 52 गणपती असायचे आता ते सहावर आले आहेत. कारण अनेकांची मुलं परदेशात असल्याने ते चांदीची गणपती आणतात. किंवा घरातच बादलीमध्ये विसर्जन करतात. मुलांना जरी गणेशोत्सव साजरा करायला भारतात यायचं असलं तरी तेवढ्यासाठी इथे येणं परवडणारं नसतं. परदेशात गेलेल्या मुलांचे आई-वडील एकटे पडायचे. मग आम्ही सोसायटीतले काही जणं त्यांची विचारपूस करायचो. संवाद हा मानसिक रोगावरचा उत्तम उपाय आहे".

आई-वडिलांनी आता सावध राहिलं पाहिजे : सुकन्या मोने

सुकन्या मोने म्हणाल्या," आजकालच्या मुलांचं करिअर उत्तम होतं. चांगले पैसे कमावतात. पण ही आजकालची मुलं लग्नानंतर मुलबाळ नको असा निर्णय घेतात. त्यामुळे नातवंडाची ओढ काय असते हेदेखील पालकांना अनुभवता येत नाही. त्यामुळे घरातील कामवाली, स्वयंपाक करणारी बाई, इस्त्रीवाला, दुधवाला,भाजीवाला, पेपरवाला यांच्यासोबत ते संवाद साधतात. अशाप्रकारे ही मंडळी त्यांचा त्यांचा आनंद शोधतात. जगण्याचं कारण शोधत असतात. मला या सिनेमात कुठेतरी हे दिसलं की आईवडिलांनी सुद्धा आता सावध राहायला पाहिजे. छोट्या-छोट्या गोष्टीसाठी मुलांनी परदेशातून भारतात यायला हवं असं नाही. आई-वडिलांनी या गोष्टीसाठी स्वत:ला तयार करायला पाहिजे". 

सुकन्या पुढे म्हणाल्या,"वृद्धाश्रम म्हणजे यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही म्हणून यांना इथे आणून टाकलंय, असा समज आहे. पण खरंतर आपल्याकडे उत्तम वृद्धाश्रम झाली आहेत. त्यामुळे आई-वडिलांनी स्वत:चं ठरवावं की, आपल्याला वृद्धाश्रमात जायचं आहे आणि मुलांना सांगावं की तू आमची काळजी करू नको. आम्ही तिथे आनंदात राहू. मुलांना परदेशात अनेक आव्हांनाचा सामना करावा लागतो. घरातील काम करण्यासोबत ऑफिसमधली कामेदेखील करावी लागतात. त्यामुळे आई-वडिलांनी स्वत:ला तयार करायला हवं. मुलांना तुमच्याबद्दल प्रेम नाही का? असं नसतं. मुलांना मानसिक शांतता द्यायची असेल तर आई-वडिलांनी आपल्याला तयार करायला हवं. मुलांवर कोणत्याही गोष्टीवर अवलंबून राहता काम नये. घरबसल्या अनेक गोष्टी आपण करू शकतो. बिल भरायचं असेल तर त्यासाठी मुलांनी परदेशातून भारतात येण्याची गरज नाही". 

संबंधित बातम्या

Sukanya Mone : "जास्त दारू प्यायली का?" सुकन्या मोनेंच्या 'त्या' व्हिडीओवर महिलेची कमेंट; सडेतोड उत्तर देत अभिनेत्री म्हणाल्या,"नशा आहे ही..."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Update: पुण्यासह बहुतांश ठिकाणी तापमानाने आताच गाठली छत्तीशी! येत्या 5 दिवसात नुसता उन्हाचा चटाका, IMDने कुठे काय दिलाय अंदाज?
पुण्यासह बहुतांश ठिकाणी तापमानाने आताच गाठली छत्तीशी! येत्या 5 दिवसात नुसता उन्हाचा चटाका, IMDने कुठे काय दिलाय अंदाज?
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
Delhi Election Result 2025 Live: दिल्ली विधानसभेत कोण बाजी मारणार, भाजप केजरीवालांच्या गडाला सुरुंग लावणार?
दिल्ली विधानसभेत कोण बाजी मारणार, भाजप केजरीवालांच्या गडाला सुरुंग लावणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Delhi Election Result 2025 : दिल्लीत आम आदमी पक्ष हॅटट्रिक साधणार की 27 वर्षांनंतर भाजपचं पुनरागमनEknath Shinde in Delhi : ऑपरेशन टायगरची चर्चा; एकनाथ शिंदे दिल्लीत, भाजप नेत्यांना भेटणार?ABP Majha Headlines : 07 AM : 08 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Report Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची संख्या महिन्याभरात 5 लाखांनी घटली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update: पुण्यासह बहुतांश ठिकाणी तापमानाने आताच गाठली छत्तीशी! येत्या 5 दिवसात नुसता उन्हाचा चटाका, IMDने कुठे काय दिलाय अंदाज?
पुण्यासह बहुतांश ठिकाणी तापमानाने आताच गाठली छत्तीशी! येत्या 5 दिवसात नुसता उन्हाचा चटाका, IMDने कुठे काय दिलाय अंदाज?
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांकडून पैसे परत घेणार नाही; शासनाचा निर्णय
Delhi Election Result 2025 Live: दिल्ली विधानसभेत कोण बाजी मारणार, भाजप केजरीवालांच्या गडाला सुरुंग लावणार?
दिल्ली विधानसभेत कोण बाजी मारणार, भाजप केजरीवालांच्या गडाला सुरुंग लावणार?
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
निर्दयीपणाचा कळस, आधी हत्तीला उकसवलं, गजराज अटॅक  करण्यासाठी पुढे येताच जेसीबी डोक्यात हाणला Video
निर्दयीपणाचा कळस, आधी हत्तीला उकसवलं, गजराज अटॅक करण्यासाठी पुढे येताच जेसीबी डोक्यात हाणला Video
Dharashiv News : ओलीस ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची तब्बल 45 दिवसांनंतर सुटका; कामगार विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
ओलीस ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची तब्बल 45 दिवसांनंतर सुटका; कामगार विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Embed widget