एक्स्प्लोर

Shah Rukh Khan Birthday : बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या किंग खानचं शिक्षण किती? ऐकाल तर अवाक् व्हाल

Shah Rukh Khan : बॉलीवूडच्या किंग खानने रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवले आहे.

Shah Rukh Khan Birthday : बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मोठा चाहतावर्ग आहे. छोट्या पडद्यावरुन आपल्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात करणाऱ्या शाहरुख खानने त्याच्या मेहनतीच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत आपला दबदबा निर्माण केला आहे. जाणून घ्या त्याच्या शिक्षणाबद्दल... 

शाहरुख खानचे शालेय शिक्षण कुठे झाले?

शाहरुख खानने 1989 साली 'फौजी' या मालिकेच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. 'रोमान्स किंग', 'बादशाह' आणि 'किंग खान' म्हणून शाहरुखला जगभरात ओळखले जाते. पण शाहरुखचे शालेय शिक्षण दिल्लीतील 'सेंट कोलंबा' या शाळेत झाले आहे. 

दिल्लीच्या हंसराज कॉलेजमधून केलं ग्रॅज्युएशन 

शाहरुखने 12 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्याने दिल्लीतील हंसराज कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. 'अर्थशास्त्र' या विषयात त्याने पदवी मिळवली आहे. ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर त्याने 'मास कम्युनिकेशन' या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात प्रवेश घेतला. परंतु काही वैयक्तिक कारणाने तो पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकला नाही. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

शाहरुख खानचे वडील ताज मोहम्मद खान हे व्यापारी होते. त्याच्या आईचे नाव लतीफ फातिमा खान आणि बहिणीचे नाव शहनाज लाला रुख. शाहरुख खान आज खूप यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेता आहे. किंग खान सध्या पत्नी गौरी आणि सुहाना, आर्यन आणि अब्राहम या तीन मुलांसह मुंबईतील 'मन्नत' या आलिशान बंगल्यात राहतो.

शाहरुख खानचे ब्लॉक बस्टर सिनेमे!

शाहरुख खानने अनेक ब्लॉक बस्टर सिनेमांत काम केलं आहे. 'डर' (Dar) या सिनेमातील शाहरुखची नकारात्मक भूमिका आजही चाहत्यांच्या पसंतीस उतरते. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे (DDLJ), 'दिल तो पागल है' (Dil to Pagal hai), 'स्वदेश' (Swades), वीर जारा (Veer Zara), 'जब तक है जान' (Jab Tak Hai Jaan), माइ नेम इज खान (My Name is Khan) अशा अनेक सिनेमांच्या माध्यमातून शाहरुखने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. 

संबंधित बातम्या

Shah Rukh Khan Net Worth : सलमान, आमीरपेक्षाही संपत्तीच्या बाबतीत शाहरुख ठरतो सरस; बंगला, महागड्या गाड्या अन् बरंच काही

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!

व्हिडीओ

Ravindra Waikar Delhi : मुंबईत जलमेट्रो सुरू व्हायला हवी, राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल
Majha Mahakatta : भारतीय संस्कारांचा अभिमान, शिक्षण क्षेत्रात काम, Yash Birla 'माझा महाकट्ट्यावर'
Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Dombivli Pollution :  गुलाबी रस्ता आणि डोंबिवलीकर रागाने लाले लाल Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Devendra Fadnavis: आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
Dattaprasad Jadhav: 'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Embed widget