एक्स्प्लोर

Sanjay Leela Bhansali : अनेक कलाकारांबद्दल आदर, पण बॉलिवूडमध्ये रिलेशन बनवायला आलेलो नाही; संजय लीला भन्साळी नेमकं असं का म्हणाले?

Sanjay Leela Bhansali :  भन्साळी यांनी दिलेल्या एका मुलाखतीत अनेक मुद्यांवर भाष्य केले. आपल्या चित्रपटांमध्ये एकाच अभिनेत्रीला पुन्हा संधी का देत नाही याबाबतही त्यांनी भाष्य केले

Sanjay Leela Bhansali :  बॉलिवूडचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांची 'हिरामंडी' (Heeramandi) वेब सीरिज सध्या चर्चेत आहे. या वेब सीरिजमधील अनेक दृष्ये, वेब सीरिजमधील भव्यता आदींची जोरदार चर्चा होत आहे. या वेब सीरिजसोबतच संजय लीला भन्साळी यांचीदेखील चर्चा सुरू आहे. 'हिरामंडी'च्या माध्यमातून भन्साळी यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले आहे. अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, संजय लीला भन्साळी यांना हे मान्य नाही.  भन्साळी यांनी दिलेल्या एका मुलाखतीत अनेक मुद्यांवर भाष्य केले. आपल्या चित्रपटांमध्ये एकाच अभिनेत्रीला पुन्हा संधी का देत नाही याबाबतही त्यांनी भाष्य केले. 

संजय लीला भन्साळी यांनी गलट्टा प्लसला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, मी खूपच चांगल्या कलाकारांसोबत काम केले आहे. रणबीर, रणवीर, दीपिका, माधुरी दीक्षित, अमिताभ बच्चन  अशा अनेक कलाकारांसोबत काम केले आहे. हृतिक रोशन, प्रियंका चोप्रा, नाना पाटकेर हे माझ्या आवडत्या कलाकारांपैकी एक आहेत. आता हिरांमडीमध्ये सोनाक्षी सिन्हा आणि ऋचा चढ्ढा यांनीही चांगले काम केले आहे.  या  कलाकारांसोबत माझे सूर जुळतात असे मला वाटते. मी आधीच्या चित्रपटातील कलाकारांना पुन्हा पुढील चित्रपटात घेत नसल्याने त्यांना अनेक प्रश्न पडत असतील. आम्ही संजयच्या मागील चित्रपटासाठी इतकं काही केलं तरी आम्हाला संधी का नाही? असा विचार त्यांच्या मनात येणे स्वाभाविक आहे.  

कलाकारांना पुन्हा संधी का नाही?

संजय लीला भन्साळी यांनी सांगितले की,  चित्रपटात कलाकारांची निवड ही ऑर्गेनिक पद्धतीने होते. आम्ही इथे संबंध तयार करायला आलो नाही. मी तुमचा (कलाकारांचा) खूप आदर करतो. माझ्यासाठी जी मेहनत घेतली, त्यासाठी मी प्रेम करतो. आपला वेळ आणि मेहनत देऊन रुपेरी पडद्यावर जादू केली यासाठी मी खूपच आभारी असल्याचे भन्साळी यांनी म्हटले. 
 
भन्साळी यांनी पुढे म्हटले की,  परफॉर्मेन्सबाबत बोलायचे झाले तर माझ्या चित्रपटात काम केलेल्या 90  टक्के कलाकारांनी पडद्यावर जादू निर्माण केली आहे. त्यांच्या प्रेम आणि आदरामुळेच हे शक्य झाले आहे.  या कलाकारांनी नेहमीच आपला चांगला परफॉर्मेन्स सादर करण्याचा प्रयत्न करतात.

आलिया भट्टला करायचे आहेत चार चित्रपट

आलिया भट्टने अलीकडेच एका चॅट शोदरम्यान भन्साळींसोबत पुन्हा-पुन्हा काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आलिया म्हणाली होती की भन्साळी यांनी दीपिकासोबत 3 चित्रपट केले आहेत. आता, त्यांना माझ्यासोबत किमान चार चित्रपट करावे लागतील.

आलियाने संजय लीला भन्साळी  यांच्या'गंगूबाई काठियावाडी'मध्ये काम केले आहे. त्यानंतर आता संजय लीला भन्साळी हे आलिया, रणबीर आणि विकी कौशलसोबत 'लव्ह अँड वॉर' करणार आहे. संजय लीला भन्साळी यांनी दीपिका पदुकोणसोबत 'गोलियों की रासलीला राम-लीला', 'बाजीराव मस्तानी' आणि 'पद्मावत'मध्ये काम केले आहे.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget