एक्स्प्लोर

Manoj Jarange : "मराठ्यांना हक्काचं आरक्षण हवंय", 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचं वक्तव्य

Ashwini Mahangade : मराठे कधीच कोणाच्या हक्काचे खाणारे नाहीत. त्यांना हक्काचं आरक्षण हवं आहे, असं मत अश्विनी महांगडेने मांडलं आहे.

Ashwini Mahangade On Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. मराठा समाजाच्या आंदोलनाला (Maratha Reservation) राज्यभरातून पाठिंबा मिळतो आहे. दरम्यान 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) फेम मराठमोळी अभिनेत्री अश्विनी महांगडेदेखील (Ashwini Mahangade) या आंदोलनात सहभागी झाली आहे. मराठे कधीच कोणाच्या हक्काचे खाणारे नाहीत. त्यांना हक्काचं आरक्षण हवं आहे, असं मत अश्विनी महांगडेने मांडलं आहे.

एबीपी माझाशी बोलताना अभिनेत्री अश्विनी महांगडे म्हणाली,"मराठा क्रांती मोर्चामध्ये मी आधीपासूनच सहभागी आहे. ही लढाई यावर्षी सुरू झाली असं नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हे सुरू आहे. माझा ज्या परिसरात जन्म झाला तिथे आठवी-दहावीनंतर मुलं लष्करात भरती होण्याचं स्वप्न पाहतात. त्यासाठी ते घेत असलेली मेहनत मी पाहिली आहे. आजही 90 टक्क्यांपेक्षा जास्त टक्के असणारा विद्यार्थी भरती होत नाही. तर 60% मिळवणारा विद्यार्थी भरती होतो. त्यावेळी असं वाटतं की, प्रत्येकाच्या कुवतीनुसार ती जागा द्या. आता ही गोष्ट आपल्या देशात शक्य नाही. मग जर असं नसेल तर आम्हाला दुसरं कोणाचं आरक्षण नको आहे. किंवा त्यांच्यातला वाटा नको आहे. आम्हाला आमचं स्वतंत्र आरक्षण द्या. म्हणजे मेहनत घेणाऱ्या आमच्या मुलांना यश मिळेल. आरक्षण ही खरचं काळाची आणि मराठा मुलाची आणि मुलीची गरज आहे आणि ते व्हायला हवं". 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Asʜvɪɴɪ Pʀᴀᴅɪᴘᴋᴜᴍᴀʀ Mᴀʜᴀɴɢᴀᴅᴇ (@ashvinimahangade)

मनोज जरांगे पाटलांना अश्विनी महांगडेचं समर्थन

मनोज जरांगे पाटलांना अश्विनी महांगडे समर्थन देत आहे.  याबद्दल बोलताना ती म्हणाली," एक दिवस उपाशी राहायचं असेल तर आपल्याला ते जमत नाही आणि ज्यावेळी एक माणूस ही एवढी मोठी चळवळ इतक्या छान पद्धतीने मॅनेज करतो ही गोष्ट आहे. मराठ्यांनी इतकी वर्ष शांततेत आंदोलन केलं. पण कुठेतरी सहनशक्तीला पण मर्यादा असते. बरं मी पूर्णपणे शासनाला दोष देते असं नाही. हायकोर्टात ज्या पद्धतीने सगळी प्रोसेस सुरू आहे तेही चालुच आहे. पण किमान राज्याच्या अख्यारीत या गोष्टी होऊ शकतात तेव्हा सगळ्या आमदार, खासदारांनी एकत्र येऊन आरक्षण द्यायला हवं. इतकी वर्ष एक विषय तुम्ही इतका कसा काय चिघळत ठेऊ शकता".

ज्यांना निवडून दिलं आहे तेच लोक...

अश्विनी पुढे म्हणाली,"मला अजूनही वाटतं मराठा आरक्षणाचं आंदोलन शांत पद्धतीनेच व्हावं. पण कुठेतरी शासनानेसुद्धा इतका मोठ्या समाजाचा विचार करावा आणि सहनशक्ती आणखी बघू नये. एवढीच माझी शासनाला विनंती आहे. ज्यांना निवडून दिलं आहे तेच लोक याचा विचार करत नसतील तर अवघड आहे. त्यांनी मार्ग काढायला हवा".

मराठ्यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण हवं आहे : अश्विनी महागंडे

मनोज जरांगेंबद्दल बोलताना अश्विनी म्हणाली,"जरांगे पाटील साहेबांमुळे एक चेहरा मिळाला आहे. तो चेहरा दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन काम करतोय असंही नाही. तर ते स्वत: लढत आहेत. स्वत: उपाशीपोटी काम करत आहेत. मग अशावेळी समाजासाठी उभं राहणं हे वाईट नाही. ज्यांना आता आरक्षण आहे त्यांच्यातलं आरक्षण मराठ्यांना कधीच नको आहे. मराठ्यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण हवं आहे. मराठे कधीच कोणाच्या हक्काचे खाणारे नाहीत. शांततेच मराठा आरक्षण यशस्वी होईल अशी मी अपेक्षा करते". 

संबंधित बातम्या

Manoj Jarange : "मनोज जरांगेंना काही झालं तर सरकारने तयारी ठेवावी"; 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरातील जवानाला भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावताना वीरमरण; सहा महिन्याच्या चिमुकल्या लेकराची भेट आयुष्यभरासाठी अधुरीच राहिली
कोल्हापुरातील जवानाला भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावताना वीरमरण; सहा महिन्याच्या चिमुकल्या लेकराची भेट आयुष्यभरासाठी अधुरीच राहिली
Supriya Sule : महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकाला सुप्रिया सुळेंचा कडाडून विरोध; म्हणाल्या, राज्यात 'पोलीसराज' प्रस्थापित करायचाय का?
महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकाला सुप्रिया सुळेंचा कडाडून विरोध; म्हणाल्या, राज्यात 'पोलीसराज' प्रस्थापित करायचाय का?
कोल्हापूर-सांगली महामार्ग बेमुदत रोखण्याचा इशारा, स्वाभिमानी कार्यकर्त्यांची पहाटेपासून धरपकड; राजू शेट्टींच्या घरी पोलिस पोहोचले
कोल्हापूर-सांगली महामार्ग बेमुदत रोखण्याचा इशारा, स्वाभिमानी कार्यकर्त्यांची पहाटेपासून धरपकड; राजू शेट्टींच्या घरी पोलिस पोहोचले
Manikrao Kokate : तर न्याय कोणाला मागावा? न्यायालयाच्या निर्णयावर संतापाचा कडेलोट; कृषीमंत्र्यांच्या मतदारसंघातील जनतेचा कौल घ्या; ठाकरे गटाची मागणी
तर न्याय कोणाला मागावा? न्यायालयाच्या निर्णयावर संतापाचा कडेलोट; कृषीमंत्र्यांच्या मतदारसंघातील जनतेचा कौल घ्या; ठाकरे गटाची मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut PC | महाराष्ट्र सरकार ढोंगी, दुतोंडी; संजय राऊतांची शिंदे-फडणवीसांवर टीकाABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 15 March 2025ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 15 March 2025ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 9 AM 15 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरातील जवानाला भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावताना वीरमरण; सहा महिन्याच्या चिमुकल्या लेकराची भेट आयुष्यभरासाठी अधुरीच राहिली
कोल्हापुरातील जवानाला भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावताना वीरमरण; सहा महिन्याच्या चिमुकल्या लेकराची भेट आयुष्यभरासाठी अधुरीच राहिली
Supriya Sule : महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकाला सुप्रिया सुळेंचा कडाडून विरोध; म्हणाल्या, राज्यात 'पोलीसराज' प्रस्थापित करायचाय का?
महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकाला सुप्रिया सुळेंचा कडाडून विरोध; म्हणाल्या, राज्यात 'पोलीसराज' प्रस्थापित करायचाय का?
कोल्हापूर-सांगली महामार्ग बेमुदत रोखण्याचा इशारा, स्वाभिमानी कार्यकर्त्यांची पहाटेपासून धरपकड; राजू शेट्टींच्या घरी पोलिस पोहोचले
कोल्हापूर-सांगली महामार्ग बेमुदत रोखण्याचा इशारा, स्वाभिमानी कार्यकर्त्यांची पहाटेपासून धरपकड; राजू शेट्टींच्या घरी पोलिस पोहोचले
Manikrao Kokate : तर न्याय कोणाला मागावा? न्यायालयाच्या निर्णयावर संतापाचा कडेलोट; कृषीमंत्र्यांच्या मतदारसंघातील जनतेचा कौल घ्या; ठाकरे गटाची मागणी
तर न्याय कोणाला मागावा? न्यायालयाच्या निर्णयावर संतापाचा कडेलोट; कृषीमंत्र्यांच्या मतदारसंघातील जनतेचा कौल घ्या; ठाकरे गटाची मागणी
Pandharpur Crime : पंढरपुरात धुलिवंदनाच्या दिवशीच गोमांस विक्री, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले अन्...; शहरात एकच खळबळ
पंढरपुरात धुलिवंदनाच्या दिवशीच गोमांस विक्री, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले अन्...; शहरात एकच खळबळ
Satara News : पोहायला शिकवणे बेतले जीवावर, विहिरीत बुडून एकाच गावातील दोघांचा दुर्दैवी अंत; साताऱ्यात शोककळा
पोहायला शिकवणे बेतले जीवावर, विहिरीत बुडून एकाच गावातील दोघांचा दुर्दैवी अंत; साताऱ्यात शोककळा
Mark Carney : कॅनडाला 24वे नवे पंतप्रधान मिळाले, भारतासाठी डोकेदुखी कमी होणार की वाढणार? खलिस्तानी दहशतवाद्यांवर काय भूमिका??
कॅनडाला 24वे नवे पंतप्रधान मिळाले, भारतासाठी डोकेदुखी कमी होणार की वाढणार? खलिस्तानी दहशतवाद्यांवर काय भूमिका??
Sunita Williams : सुनिता विल्यम्स तब्बल नऊ महिन्यांनी जमिनीवर पाय ठेवणार; एलॉन मस्क यांच्या स्पेस एजन्सी स्पेसएक्सचे रॉकेट फाल्कन 9 यशस्वी झेपावले
सुनिता विल्यम्स तब्बल नऊ महिन्यांनी जमिनीवर पाय ठेवणार; एलॉन मस्क यांच्या स्पेस एजन्सी स्पेसएक्सचे रॉकेट फाल्कन 9 यशस्वी झेपावले
Embed widget