एक्स्प्लोर

Aamir Khan : आमिर खान तिसऱ्यांदा लगीनगाठ बांधणार? लग्न करण्याच्या प्रश्नावर 'मिस्टर परफेक्शनिस्ट'ने मौन सोडले

Aamir Khan : आमिर खान आणि किरण राव यांनी 2021 मध्ये परस्पर संमतीने संसारात काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आमिर खान याच्या तिसऱ्या विवाहाची चर्चा रंगली होती.

Aamir Khan Wedding :   बॉलीवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' अभिनेता आमिर खान (Aamir Khan)  हा आपल्या चित्रपटांमुळेच नाही तर त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. आमिर खान आणि किरण राव यांनी 2021 मध्ये परस्पर संमतीने संसारात काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आमिर खान याच्या तिसऱ्या विवाहाची चर्चा रंगली होती. त्याचे नाव बॉलिवूड अभिनेत्रीसोबतही जोडण्यात आले होते. त्यामुळे आमिर खान तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार का, याची चर्चा सुरू झाली होती. आपल्या विवाहाच्या चर्चेवर मौन सोडले आहे. 

आमिर खानने दोन लग्न केले होते. पहिला विवाह हा 18 एप्रिल 1986 रोजी रीना दत्तासोबत झाला होता.  आमिरला जुनैद नावाचा मुलगा आणि इरा नावाची मुलगी आहे. 2002 मध्ये आमिरचे नाते संपुष्टात आले आणि रीनाने दोन्ही मुलांचा ताबा घेतला. यानंतर आमिर खानने त्याची दुसरी पत्नी किरण रावशी लग्न केले आणि तिच्यापासून आमिरला आझाद नावाचा मुलगा आहे ज्याचा जन्म सरोगसीद्वारे झाला.

आमिर खान पुन्हा लग्नाच्या बेडीत अडकणार?

2021 मध्ये आमिर खान आणि किरण राव यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याची घोषणा केली होती. आता अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये आमिर खानने आपल्या लग्नाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले.  रिया चक्रवर्ती ही  सध्या यूट्यूबवर पॉडकास्ट करत आहे. या पॉडकास्टमध्ये नुकतीच अभिनेता आमिर खानने हजेरी लावली होती. यावेळी आमिरला तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. आमिर खानने सांगितले की, लग्न हा एक कॅनव्हास आहे. जे दोन लोक एकत्र रंगवतात. तू पुन्हा लग्न करशील का? असे विचारले असता आमिर म्हणाला- मी आता 59 वर्षांचा आहे.

पुन्हा लग्नाच्या बेडीत अडकणार?

आमिर खानने सांगितले की, मला वाटत नाही की मी पुन्हा लग्न करू शकेन. मला ते थोडं अवघड वाटत आहे. सध्या माझ्या आयुष्यात खूप नाती आहेत. मी पुन्हा एकदा माझ्या कुटुंबात सामील झालो आहे. मला मुले आहेत, भाऊ आणि बहिणी आहेत." आमिर खान म्हणाला की, माझ्या जवळ असणाऱ्या लोकांसोबत मी आनंदी आहे. मी एक चांगला व्यक्ती होण्यासाठी प्रयत्न करत आहे. 

अभिनेता आमिर खान हा सध्या 2007 मध्ये आलेल्या 'तारे जमीन पर' या आयकॉनिक चित्रपटाचा सिक्वेल बनवण्यात व्यस्त आहे. या चित्रपटाचे नाव 'सीतारे जमीन पर' असे असणार आहे. या चित्रपटात जेनेलिया डिसूझा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Urfi javed Slams Adnan Shaikh: 'पब्लिक प्रॉपर्टी..'प्रसिद्ध युट्यूबर विधवा अन् घटस्फोटीत महिलांबाबतीत काय म्हणाला? उर्फी जावेद का भडकली?
'पब्लिक प्रॉपर्टी..'प्रसिद्ध युट्यूबर विधवा अन् घटस्फोटीत महिलांबाबतीत काय म्हणाला? उर्फी जावेद का भडकली?
Anuradha Paudwal on Personal Life: 25 दिवसांत चिमुकलीचा मृत्यू, तरुण मुलालाही गमावलं; अनुराधा पौडवाल यांच्या आयुष्यात दु:खाचे वादळ
25 दिवसांत चिमुकलीचा मृत्यू, तरुण मुलालाही गमावलं; अनुराधा पौडवाल यांच्या आयुष्यात दु:खाचे वादळ
Alia Bhatt in Tumbad 2: 'पुन्हा हस्तरचा थरार...; 'तुंबाड 2'मध्ये आलिया भट्टची एन्ट्री, कोणती भूमिका साकारणार? रिलीज डेटही जाहीर
'पुन्हा हस्तरचा थरार...; 'तुंबाड 2'मध्ये आलिया भट्टची एन्ट्री, कोणती भूमिका साकारणार? रिलीज डेटही जाहीर
Marathi TV Actress Madhavi Nimkar Becomes Businesswomen: प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं व्यावसाय क्षेत्रात पाऊल, कल्याणमध्ये सुरू करणार हॉटेल, नावंही सांगितलं...
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं व्यावसाय क्षेत्रात पाऊल, कल्याणमध्ये सुरू करणार हॉटेल, नावंही सांगितलं...

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Embed widget