Janhavi Kapoor Wedding: जान्हवी कपूर लाँग टाईम बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार? नक्की खरं काय? वडील बोनी कपूर म्हणाले...
Boney Kapoor Reacts to Janhvi Kapoor Shikhar Pahariya Wedding: जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण.

Boney Kapoor Reacts to Janhvi Kapoor Shikhar Wedding: जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) आणि शिखर पहारिया (Shikhar pahariya) हे दोघेही बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत असल्याची माहिती आहे. दोघेही बऱ्याचदा एकत्र स्पॉट झाले आहेत. दोघांना एकत्र मंदिरात जाताना, एकत्र रेस्टॉरंटमध्ये डिनर करताना आणि इव्हेंट्समध्ये स्पॉट करण्यात आलं आहे. सोशल मीडियात या दोघांचे फोटो व्हायरल होतात. दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा बरीच रंगली आहे. अशातच या चर्चांमध्ये दोघेही एकत्र लग्नबंधनात अडकणार, अशी माहिती समोर आली आहे. दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकतील अशी माहिती आहे. विशेष म्हणजे, या माहितीवर जान्हवी कपूरचे वडील दिग्दर्शक बोनी कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांची प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
शिखर आणि जान्हवी कपूर लग्नबंधनात अडकणार? (Janhvi Kapoor and Shikhar Pahariya wedding)
अलिकडेच, जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया आपल्या नात्याला पुढच्या टप्प्यावर नेण्याचा विचार करत आहेत. रिपोर्ट्सनुसार, हे कपल या वर्षीच्या अखेरीस लग्नबंधनात अडकतील. सध्या याची चर्चा सोशल मीडियात प्रचंड प्रमाणात रंगत आहे. दरम्यान, चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. दोघांनीही लवकरात लवकर लग्न करावे, अशी काहींनी इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, ही चर्चा खरी ठरते की, अफवा, हे लवकरच समोर येईल.
जान्हवी कपूरच्या लग्नाच्या चर्चांना बोनी कपूरनं दिला पूर्णविराम (Boney Kapoor statement on Janhavi marriage)
या चर्चांवर जान्हवी कपूरचे वडील बोनी कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. इकोनॉमिक टाइम्सशी बोलताना त्यांनी या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. बोनी कपूर म्हणाले, 'नाही. हे खरं नाही आहे', अशाप्रकारे त्यांनी सध्यापुरते या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. माहितीनुसार, जान्हवी कपूर आणि शिखर हे लहानपणीचे मित्र आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आधी दोघांमध्ये मैत्री होती. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यांच्या नात्याबद्दलची अफवा सर्वात आधी 2016मध्ये पसरली होती. मात्र, दोघांपैकी कुणीही या अफवांना दुजोरा दिला नाही. किंवा नाकारलेही नाही.
2022पासून दोघांमधील नाते अधिक घट्ट झाले
रिपोर्ट्सनुसार, 2018 साली बॉलिवूडमध्ये डेब्यू केल्यानंतर दोघे वेगळे झाले होते. 'कॉफी विथ करण' या शोमध्ये तिनं ही माहिती दिली होती. दरम्यान, 2022साली दोघे पुन्हा एकत्र आले. तेव्हापासून त्यांचे नाते अधिक घट्ट झाले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
अजय-अतुलचा झिंगाट डान्स, VIDEO आला समोर; स्वत:च्याच 'या' गाण्यावर बेभान होऊन नाचले गायक






















