एक्स्प्लोर

एबी फॉर्म म्हणजे काय? एबी फॉर्म महत्त्वाचा का असतो?

सध्याच्या राजकीय रणधुमाळीतील परवलीचा शब्द म्हणजे 'एबी फॉर्म'. काल शिवसेनेने 'मातोश्री'वर आपल्या काही उमेदवारांना 'एबी फॉर्म' दिले. नेमका काय असतो हा 'एबी फॉर्म'? प्रत्येक राजकीय कार्यकर्ता या 'एबी फॉर्म'साठी का जोर लावतो? राजकीय पक्षाची उमेदवारी आणि चिन्हासाठी का महत्त्वाचा आहे 'एबी फॉर्म'? पाहूयात स्पेशल रिपोर्ट...

अकोला : महाराष्ट्र राजकीय घडामोडी आणि रणधुमाळीत पार रंगून गेला आहे. पक्षांतर, चढाओढ, शह-काटशह असं सारं काही. हे सारं चाललंय सत्ता अन् त्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या आमदारकीसाठी. पक्षाची आमदारकी पाहिजे असेल तर त्यासाठी महत्त्वाचा आहे 'एबी फॉर्म'. काल शिवसेनेन राज्यातील अनेक ठिकाणच्या उमेदवारांना 'एबी फॉर्म' दिले. अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातून शिवसेनेचा 'एबी फॉर्म' मिळालेल्या नितीन देशमुखांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहतोय. कारण, आता त्यांचं तिकीट कन्फर्म झालं आहे.
निवडणूक प्रक्रियेत याच 'एबी फॉर्म'ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण, यामुळेच संबंधित उमेदवार हा 'एबी फॉर्म' देणाऱ्या पक्षाचा अधिकृत उमदेवार समजला जातो आणि त्याला संबंधित पक्षाचं अधिकृत चिन्हंही दिलं जातं. 
काय आहे 'एबी फॉर्म'?
* एबी फॉर्म' हा पक्ष आणि त्या पक्षाचं अधिकृत चिन्हं मिळवण्यासाठीचा महत्त्वाचा दस्तावेज आहे.
* ए फॉर्म' हा त्या पक्षाची मान्यता आणि चिन्ह यासाठीचा अधिकृत दस्तावेज आहे.
* ए फॉर्म'वर पक्षाने तिकीट वाटपासाठी अधिकृत केलेल्या व्यक्तीची स्वाक्षरी असते.
* 'बी फॉर्म' हा अधिकृत उमेदवारासंदर्भातील दस्तावेज आहे.
* 'बी फॉर्म'वर पक्षाच्या अधिकृत उमेदवारासह पक्षाने सूचवलेल्या आणखी एका उमेदवाराचं नावं असतं. काही कारणास्तव पहिल्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला गेला तर दुसऱ्याला निवडणूक आयोग अधिकृत करु शकतो.
 
उमेदवारी अर्ज भरताना सर्वच गोष्टी अगदी काटेकोरपणे तपासल्या जातात. त्यात 'एबी फॉर्म' हा सर्वात महत्त्वाचा दस्तावेज ठरतो. उमदेवारीच्या वेळी पक्षाचा उल्लेख करणाऱ्या उमेदवाराला 'एबी फॉर्म' द्यावाच लागतो. तो 'एबी फॉर्म' सादर करु शकला नाही तर त्याचा दावा न्यायालयही ग्राह्य धरत नाही.
सध्याची राजकीय लढाई ही प्रामुख्याने तिकीटासाठी आहे. म्हणजेच राजकारणाचं चक्रव्यूहच 'एबी फॉर्म'चं भेदण्यासाठी असतं. त्यामुळे याच 'एबी फॉर्म'वरुन पुढच्या आठवडाभरात महाराष्ट्रात रणकंदन माजणार आहे हे मात्र निश्चित.
अतिरिक्त आणि महत्त्वाची माहिती
आपल्या देशात अनेक राजकीय पक्ष आहेत. निवडणुकांमध्ये हे पक्ष त्यांचे अधिकृत म्हणून काही उमेदवार रिंगणात उतरवतात. त्यांना संबंधित राजकीय पक्षाकडून 'ए' फॉर्म दिला जातो. त्यात उमेदवाराचं नाव, पक्षातील पद आणि कोणत्या मतदारसंघातून पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे, याची माहिती द्यावी लागते. उमेदवारी अर्ज भरताना अनेक कागदपत्रं, प्रतिज्ञापत्र काळजीपूर्वक द्यावी लागतात. काहीवेळा अधिकृत उमेदवाराने अर्ज भरल्यानंतरही छाननीच्या वेळी त्यात काही त्रुटी निघाल्या, तर अर्ज बाद ठरु शकतो. त्यामुळे पक्षाचा अधिकृत उमेदवार रिंगणातून बाहेर पडतो. अशा वेळी पक्षाचा कुणीतरी पर्यायी उमेदवार असावा यासाठी राजकीय पक्षांकडून 'बी' फॉर्म दिला जातो. त्यात प्रथम पसंतीच्या उमेदवारासह पर्यायी उमेदवाराचं नाव दिलेलं असतं. जर पडताळणीदरम्यान अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद ठरल्यास किंवा त्याने उमेदवारी मागे घेतल्यास पर्यायी उमेदवार संबंधित पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवतो. राज्यसभा किंवा विधानपरिषद निवडणुकीसाठी हे फॉर्म 'एए' आणि 'बीबी' म्हणून ओळखले जातात.

महत्त्वाच्या बातम्या

Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
पत्नीसह आई वडिलांनीही नाकारलं! भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत, दारुन पराभव झाल्यानं देशभर चर्चा
पत्नीसह आई वडिलांनीही नाकारलं! भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत, दारुन पराभव झाल्यानं देशभर चर्चा
Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!

व्हिडीओ

Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप |Amit Shah On Hindi Language
Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Murlidhar Mohol : पुण्यात केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्याला दुचाकीवरुन कट मारला, 32 वर्षीय तरुण अडकला; मध्यरात्री पोलिस घरात धडकले, नेमकं काय घडलं?
पुण्यात केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्याला दुचाकीवरुन कट मारला, 32 वर्षीय तरुण अडकला; मध्यरात्री पोलिस घरात धडकले, नेमकं काय घडलं?
Manoj Jarange Protest: मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच पत्नीसह मुली संतापल्या; म्हणाल्या, 'वडिलांना काही झाल्यास डोळे पुसायला रुमाल...'
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना होताच पत्नीसह मुली संतापल्या; म्हणाल्या, 'वडिलांना काही झाल्यास डोळे पुसायला रुमाल...'
Maharashtra Goverment Cabinet Decision: मोठी बातमी! राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी, कारखानदारांना दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय
मोठी बातमी! राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी, कारखानदारांना दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय
प्रांताधिकाऱ्याचा त्रास, मनमानी कारभार; नाशिकमध्ये निलंबनाच्या कारवाईविरुद्ध 800 तलाठी, ग्रामसेवक एकटवले
प्रांताधिकाऱ्याचा त्रास, मनमानी कारभार; नाशिकमध्ये निलंबनाच्या कारवाईविरुद्ध 800 तलाठी, ग्रामसेवक एकटवले
Manoj Jarange Patil Mumbai : मनोज जरांगे मुंबईला निघताच समर्थक अन् नागरिकांची गर्दी; चोरट्याने मोबाईल, पैशांवर मारला डल्ला; आंदोलकांनी रंगेहाथ पकडून चोपलं
मनोज जरांगे मुंबईला निघताच समर्थक अन् नागरिकांची गर्दी; चोरट्याने मोबाईल, पैशांवर मारला डल्ला; आंदोलकांनी रंगेहाथ पकडून चोपलं
Rohit Patil: 'दुष्काळाचे संकट दूर होऊ दे अन्...', अंजनी ते तासगाव पायी प्रवास करत तासगावच्या गणरायाच्या चरणी रोहित पाटलांचं साकडं
'दुष्काळाचे संकट दूर होऊ दे अन्...', अंजनी ते तासगाव पायी प्रवास करत तासगावच्या गणरायाच्या चरणी रोहित पाटलांचं साकडं
Rain Update: बळीराजाची चिंता वाढवणारी बातमी; पुढील 15 दिवस पाऊस मारणार दडी, नागपूर वेधशाळेनं शेतकऱ्यांना दिला पावसाची वाट न पाहण्याचा सल्ला
बळीराजाची चिंता वाढवणारी बातमी; पुढील 15 दिवस पाऊस मारणार दडी, नागपूर वेधशाळेनं शेतकऱ्यांना दिला पावसाची वाट न पाहण्याचा सल्ला
Sangali News: अभिनेत्री राजकन्या भाग्यश्रीनं बाप्पाची आरती केल्यानं वाद, गणपती पंचायतन संस्थानाचा खरा उत्तराधिकारी कोण? यावरुन वातावरण तापलं, नेमकं घडलं काय?
अभिनेत्री राजकन्या भाग्यश्रीनं बाप्पाची आरती केल्यानं वाद, गणपती पंचायतन संस्थानाचा खरा उत्तराधिकारी कोण? यावरुन वातावरण तापलं, नेमकं घडलं काय?
Embed widget