एक्स्प्लोर

एबी फॉर्म म्हणजे काय? एबी फॉर्म महत्त्वाचा का असतो?

सध्याच्या राजकीय रणधुमाळीतील परवलीचा शब्द म्हणजे 'एबी फॉर्म'. काल शिवसेनेने 'मातोश्री'वर आपल्या काही उमेदवारांना 'एबी फॉर्म' दिले. नेमका काय असतो हा 'एबी फॉर्म'? प्रत्येक राजकीय कार्यकर्ता या 'एबी फॉर्म'साठी का जोर लावतो? राजकीय पक्षाची उमेदवारी आणि चिन्हासाठी का महत्त्वाचा आहे 'एबी फॉर्म'? पाहूयात स्पेशल रिपोर्ट...

अकोला : महाराष्ट्र राजकीय घडामोडी आणि रणधुमाळीत पार रंगून गेला आहे. पक्षांतर, चढाओढ, शह-काटशह असं सारं काही. हे सारं चाललंय सत्ता अन् त्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या आमदारकीसाठी. पक्षाची आमदारकी पाहिजे असेल तर त्यासाठी महत्त्वाचा आहे 'एबी फॉर्म'. काल शिवसेनेन राज्यातील अनेक ठिकाणच्या उमेदवारांना 'एबी फॉर्म' दिले. अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातून शिवसेनेचा 'एबी फॉर्म' मिळालेल्या नितीन देशमुखांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहतोय. कारण, आता त्यांचं तिकीट कन्फर्म झालं आहे.
निवडणूक प्रक्रियेत याच 'एबी फॉर्म'ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण, यामुळेच संबंधित उमेदवार हा 'एबी फॉर्म' देणाऱ्या पक्षाचा अधिकृत उमदेवार समजला जातो आणि त्याला संबंधित पक्षाचं अधिकृत चिन्हंही दिलं जातं. 
काय आहे 'एबी फॉर्म'?
* एबी फॉर्म' हा पक्ष आणि त्या पक्षाचं अधिकृत चिन्हं मिळवण्यासाठीचा महत्त्वाचा दस्तावेज आहे.
* ए फॉर्म' हा त्या पक्षाची मान्यता आणि चिन्ह यासाठीचा अधिकृत दस्तावेज आहे.
* ए फॉर्म'वर पक्षाने तिकीट वाटपासाठी अधिकृत केलेल्या व्यक्तीची स्वाक्षरी असते.
* 'बी फॉर्म' हा अधिकृत उमेदवारासंदर्भातील दस्तावेज आहे.
* 'बी फॉर्म'वर पक्षाच्या अधिकृत उमेदवारासह पक्षाने सूचवलेल्या आणखी एका उमेदवाराचं नावं असतं. काही कारणास्तव पहिल्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला गेला तर दुसऱ्याला निवडणूक आयोग अधिकृत करु शकतो.
 
उमेदवारी अर्ज भरताना सर्वच गोष्टी अगदी काटेकोरपणे तपासल्या जातात. त्यात 'एबी फॉर्म' हा सर्वात महत्त्वाचा दस्तावेज ठरतो. उमदेवारीच्या वेळी पक्षाचा उल्लेख करणाऱ्या उमेदवाराला 'एबी फॉर्म' द्यावाच लागतो. तो 'एबी फॉर्म' सादर करु शकला नाही तर त्याचा दावा न्यायालयही ग्राह्य धरत नाही.
सध्याची राजकीय लढाई ही प्रामुख्याने तिकीटासाठी आहे. म्हणजेच राजकारणाचं चक्रव्यूहच 'एबी फॉर्म'चं भेदण्यासाठी असतं. त्यामुळे याच 'एबी फॉर्म'वरुन पुढच्या आठवडाभरात महाराष्ट्रात रणकंदन माजणार आहे हे मात्र निश्चित.
अतिरिक्त आणि महत्त्वाची माहिती
आपल्या देशात अनेक राजकीय पक्ष आहेत. निवडणुकांमध्ये हे पक्ष त्यांचे अधिकृत म्हणून काही उमेदवार रिंगणात उतरवतात. त्यांना संबंधित राजकीय पक्षाकडून 'ए' फॉर्म दिला जातो. त्यात उमेदवाराचं नाव, पक्षातील पद आणि कोणत्या मतदारसंघातून पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे, याची माहिती द्यावी लागते. उमेदवारी अर्ज भरताना अनेक कागदपत्रं, प्रतिज्ञापत्र काळजीपूर्वक द्यावी लागतात. काहीवेळा अधिकृत उमेदवाराने अर्ज भरल्यानंतरही छाननीच्या वेळी त्यात काही त्रुटी निघाल्या, तर अर्ज बाद ठरु शकतो. त्यामुळे पक्षाचा अधिकृत उमेदवार रिंगणातून बाहेर पडतो. अशा वेळी पक्षाचा कुणीतरी पर्यायी उमेदवार असावा यासाठी राजकीय पक्षांकडून 'बी' फॉर्म दिला जातो. त्यात प्रथम पसंतीच्या उमेदवारासह पर्यायी उमेदवाराचं नाव दिलेलं असतं. जर पडताळणीदरम्यान अधिकृत उमेदवाराचा अर्ज बाद ठरल्यास किंवा त्याने उमेदवारी मागे घेतल्यास पर्यायी उमेदवार संबंधित पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवतो. राज्यसभा किंवा विधानपरिषद निवडणुकीसाठी हे फॉर्म 'एए' आणि 'बीबी' म्हणून ओळखले जातात.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Harshwardhan Sapkal On Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी काँग्रेस उमेदवार जाहीर करणार; अंबादास दानवेंची आमदारकी धोक्यात?, निवडणुकीत ट्विस्ट
विधान परिषदेसाठी काँग्रेस उमेदवार जाहीर करणार; अंबादास दानवेंची आमदारकी धोक्यात?, निवडणुकीत ट्विस्ट
NCP Vidhan Parishad : राष्ट्रवादीचा विधानपरिषदेसाठी उमेदवार ठरला; माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना दिली संधी
राष्ट्रवादीचा विधानपरिषदेसाठी उमेदवार ठरला; माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना दिली संधी
Bacchu Kadu On Vidhan Parishad Election 2026: बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता; विधान परिषदेआधी मोठी घडामोड, प्रहार जनशक्ती संघटनेचं काय?
मोठी बातमी: बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता; विधान परिषदेआधी मोठी घडामोड, प्रहार जनशक्ती संघटनेचं काय?
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: ठाकरेंनी अंबादास दानवेंचं नाव जाहीर करताच भाजपने पत्ता उघडला; विधान परिषदेच्या निवडणुकीत ट्विस्ट!
ठाकरेंनी अंबादास दानवेंचं नाव जाहीर करताच भाजपने पत्ता उघडला; विधान परिषदेच्या निवडणुकीत ट्विस्ट!

व्हिडीओ

Ambadas Danve Vidhanparishad : उद्धव ठाकरेंकडून अंबादास दानवेंनाच उमेदवारी का?
Raj Thackeray Speech Pune : भैय्यांना मराठी शिकवलं तर उद्या मराठी पुरस्कार घेताना भैय्या दिसतील
Beed MassaJog Election : संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव कसा झाला?  Special Report
Pune Christian Conversion : पुण्यात पर्यटक म्हणून आले... धर्मप्रचाराला लागले Special Report
Bacchu Kadu Vidhan Parishad Election : बच्चू कडूंना परिषदेची उमेदवारी मिळणार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडू म्हणाले होते, आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते, विधानसभेला निवडून येण्याची क्षमता संपली का?' संजय राऊतांचा खोचक सवाल
'माझा पक्ष विलीन करायला मी मूर्ख आहे का? असं बच्चू कडू म्हणाले होते, आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते, विधानसभेला निवडून येण्याची क्षमता संपली का?' संजय राऊतांचा खोचक सवाल
एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग लागून अल्पवयीन मुलीसह 5 जण जिवंत जळाले; फक्त हाडं सापडली, मुलाची नोकरीची इच्छा पूर्ण झाली म्हणून गेले होते वैष्णो देवीच्या दर्शनाला
एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग लागून अल्पवयीन मुलीसह 5 जण जिवंत जळाले; फक्त हाडं सापडली, मुलाची नोकरीची इच्छा पूर्ण झाली म्हणून गेले होते वैष्णो देवीच्या दर्शनाला
राष्ट्रीय महामार्गावर शंभरीच्या स्पीडने सुसाट, टायर फुटताच पिकअप पलटीवर पलटी मारत दुभाजकाच्या पल्याड जात समोरुन येणाऱ्या स्कॉर्पिओवर धडकला; तब्बल 16 जणांचा करुण अंत
राष्ट्रीय महामार्गावर शंभरीच्या स्पीडने सुसाट, टायर फुटताच पिकअप पलटीवर पलटी मारत दुभाजकाच्या पल्याड जात समोरुन येणाऱ्या स्कॉर्पिओवर धडकला; तब्बल 16 जणांचा करुण अंत
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra News Live Updates: विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Mankhurd Traffic Jam : 15 मिनिटांच्या अंतरासाठी 5-6 तास वाहतूक कोंडी, मानखुर्द क्रेन दुर्घटनेनंतर प्रवाशांचे अतोनात हाल, पाणी नाही, टॉयलेट, बाथरूम नाही; सोशल मिडीयावर नागरिकांचा संताप
15 मिनिटांच्या अंतरासाठी 5-6 तास वाहतूक कोंडी, मानखुर्द क्रेन दुर्घटनेनंतर प्रवाशांचे अतोनात हाल, पाणी नाही, टॉयलेट, बाथरूम नाही; सोशल मिडीयावर नागरिकांचा संताप
रितेश देशमुख याच्या 'राजा शिवाजी' सिनेमाची रिलीजपूर्वीच धुवांधार कमाई; कमाईत 'धुरंधर 2'ला मागे टाकणार?
रितेश देशमुख याच्या 'राजा शिवाजी' सिनेमाची रिलीजपूर्वीच धुवांधार कमाई; कमाईत 'धुरंधर 2'ला मागे टाकणार?
Watermelon Death Case Mumbai: कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात गूढ अधिक वाढलं; डॉक्टरांनी सांगितली हादरवणारी माहिती
कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात गूढ अधिक वाढलं; डॉक्टरांनी सांगितली हादरवणारी माहिती
Pune Crime News: 'बाहेर भेट, तुला संपवून टाकेन', लग्नाच्या मेहंदीत जोरदार राडा; दोन तरुणांना मारहाण करीत 5 लाखांची सोन्याची चैन लंपास, घटनेनं पुण्यात खळबळ
'बाहेर भेट, तुला संपवून टाकेन', लग्नाच्या मेहंदीत जोरदार राडा; दोन तरुणांना मारहाण करीत 5 लाखांची सोन्याची चैन लंपास, घटनेनं पुण्यात खळबळ
Embed widget