एक्स्प्लोर

तुमसर-मोहाडी मतदारसंघ : बालेकिल्ला भाजपचा पण शोध सक्षम उमेदवाराचा

तुमसर विधानसभा मतदारसंघ हा भंडारा जिल्ह्यातील एक महत्वाचा मतदारसंघ. भाजपच्या मधुकर कुकडेंनी तब्बल तीनवेळा या मतदारसंघातून आमदारकी जिंकली मात्र एकदा पराभूत झाल्यावर त्यांनी पक्ष सोडला आणि राष्ट्रवादीकडून थेट खासदार झाले. सध्या इथे भाजपचेच आमदार असले तरी मतदारांच्या मनात काय आहे त्याचा ठावठिकाणा लागत नाही

तुमसर हा भंडारा जिल्ह्यातील मतदारसंघ. लोकसभेसाठी भंडारा-गोंदिया असा दोन जिल्ह्याचा मिळून एक मतदारसंघ बनतो. गोंदिया हा राज्याच्या अतिपूर्वेकडील एक जिल्हा. भंडारा-गोंदिया हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल पटेल यांचा गड. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ते मोदी लाटेत पराभूत झाले. मात्र नाना पटोलेंनी भाजपचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने गोंदिया-भंडाऱ्याची जागा पुन्हा खेचून घेतली. २०१४ च्या विधानसभा राज्यात सर्वच मोठ्या पक्षांनी स्वतंत्रपणे लढल्या. तुमसर-मोहाडी विधानसभा मतदारसंघात भाजपचे चरण वाघमारे हे तब्बल २८ हजार मतांनी निवडून आले. तुमसर मोहाडी विधानसभा मतदारसंघ पुन्हा काबीज करण्यात आमदार चरण वाघमारे यांना यश आलं. गेल्या पाच वर्षात आमदार चरण वाघमारे यांनी आपल्या मोठ्या प्रमाणात विकासकामे केल्याचा दावा त्यांचे कार्यकर्ते करतात.
तुमसर विधानसभा मतदारसंघात धान उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. धानाला बोनस, शेतकरी कर्जमाफी, मतदारसंघातली विकास कामे चरण वाघमारे यांच्यासाठी जमेची बाजू ठरतील असं त्यांच्या समर्थकांना वाटतं. या विधानसभा क्षेत्रात सिंचन हा महत्वाचा भाग असल्यामुळे गेल्या पाच वर्षात तीन हजार हेकटर जमिनीवर सिंचन वाढलं आहे. याचा फायदा येथील शेतकऱ्यांना झालेला आहे.
यामध्ये आंतरराज्यीय बावनथडी धरणालगत असलेल्या शेतकऱ्यांचा सिंचन आणि पाण्याचा प्रश्न मोठा आहे. गेल्या २३ वर्षांपासून १५ पेक्षा गावांचा पाणी प्रश्न प्रलंबित आहे. विरोधक या प्रश्नावरून नेहमीच आक्रमक दिसतात. तर ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात असला तरी या भागात गेल्या पाच वर्षात पुरेशा रोजगाराच्या संधी निर्माण झालेल्या नाहीत. त्यामुळे सीमावर्ती भागातील बेरोजगार तरुण दरवर्षी मोठ्या शहराकडे पलायन करत असल्याचं दिसतं. त्यामुळे आज या विधानसभा क्षेत्रात विविध योजना राबविल्या गेल्या असल्या तरी अजूनही अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. भारतीय जनता पक्षाचा गड समजल्या जाणाऱ्या तुमसर - मोहाडी विधानसभा मतदारसंघाचं १९९५ ते २००९ पर्यंत भाजप आमदार म्हणून मधुकर कुकडे यांनी सलग १५ वर्षे नेतृत्व केलं. मात्र २००९ मध्ये मधुकर कुकडे यांना काँग्रेसच्या अनिल बावनकर यांनी पराभूत केलं. मात्र २०१४ साली पुन्हा तुमसर मोहाडी विधानसभा मतदारसंघ भाजपच्या चरण वाघमारेंनी जिंकला.
भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचा विचार केला असता. भंडारा जिल्ह्यात भंडारा, तुमसर, साकोली हे तीन विधानभा मतदारसंघ आहेत. या तिनही ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत देखील देशात मोदी लाट असल्याने ती तिन्ही विधानसभा क्षेत्रासह लोकसभा मतदारसंघही भाजपने जिंकला होता. मात्र भाजप खासदार नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद मोदी शेतकऱ्याचे प्रश्न ऐकून घेत नसल्याचा आरोप करीत भाजप खासदारकीचा २०१७ मध्ये राजीनामा दिला. नाना पटोले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१८ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध राष्टवादीच्या लढतीत राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे हे निवडून आले. तुमसरमधून भाजपच्या तिकीटावर तब्बल तीनवेळा निवडून आलेले मधुकर कुकडे राष्ट्रवादीच्या तिकिटावर दिल्लीला पोहोचले. मात्र २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुनील मेंढे हे तब्ब्ल दोन लाख मतांनी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात निवडून आले.

महत्त्वाच्या बातम्या

CJP : ''जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : ''जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget