एक्स्प्लोर

Sahar Shaikh VIDEO : एमआयएमच्या 'पतंगा'मुळे मुंब्राच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला; सहर शेखचे जितेंद्र आव्हाडांना थेट आव्हान

Sahar Shaikh Mumbra Election : जितेंद्र आव्हाडांना अहंकार होता, आम्ही हरणार असं त्यांना वाटायचं. म्हणूनच 'कैसे हराया' हे शब्द हृदयापासून आले असं सहर शेख म्हणाली. 

ठाणे : जितेंद्र आव्हाडांनी उमेदवारी देतो असा शब्द दिला होता, पण त्यांनी तो फिरवला. निष्ठावंतांना फसवणाऱ्या अशा नेत्यांना मी जर आव्हान दिलं नसतं तर अल्लाहला काय उत्तर दिलं असतं?  आव्हाडांनी माझी एक उमेदवारी कापली, मी त्यांचे चार नगरसेवक पाडले असं वक्तव्य मुंब्राची नवनियुक्त नगरसेविका सहर शेखने (Sahar Shaikh) केलं. एमआयएमच्या झेंड्याचा रंग हिरवा आहे म्हणून संपूर्ण मुंब्रा हिरवा करणार असं म्हटलं होतं, तो वेगळा रंग असता तर तसं म्हटलं असतं असंही ती म्हणाली. भविष्यात शिक्षण आणि आरोग्याच्या प्रश्नावर काम करणार असल्याचं सहर शेखने स्पष्ट केलं.

शरद पवारांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला असलेल्या मुंब्रामध्ये एमआयएमने मुसंडी मारली. त्यामध्ये सहर शेख ही तरुणी तब्बल साडेपाच हजारांच्या मताधिक्याने निवडून आली. त्यानंतर एबीपी माझाशी त्यांनी खास संवाद साधला. एमआयएमच्या 'पतंगा'मुळे मुंब्राच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे असं सहर शेख म्हणाली. 

जितेंद्र आव्हाडांनी शब्द फिरवला

जितेंद्र आव्हाडांनी पालिका निवडणुकीत उमेदवारीचा शब्द देऊनही तो फिरवला. त्यामुळे त्यांना आव्हान देणं गरजेचं होतं. तसं केलं नसतं तर मी अल्लाहला काय उत्तर दिलं असतं? असं सहर शेख म्हणाली. 

सहर शेख म्हणाली की, "शरद पवारांची राष्ट्रवादी ज्या दिवसापासून स्थापन झाली होती त्या दिवसापासून माझे वडील राष्ट्रवादीचे मुंब्रा ब्लॉक अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळायला हवी होती, त्यांचा तो अधिकार होता. त्यांनी जितेंद्र आव्हाडांना पाठिंबा दिला आणि त्यांना जिंकवून आणलं. जितेंद्र आव्हाडांनीच माझं नाव आधी जाहीर केलं होतं. आव्हाडांनी तसा अनेक लोकांसमोर माझ्या वडिलांना शब्द दिला होता. पण नंतर त्यांनी तो शब्द फिरवला. त्यामुळेच त्यांना जर आम्ही आव्हान दिलं नसतं तर ते आमच्यासाठी चुकीचं ठरलं असतं, अल्लाहला आम्ही काय उत्तर दिलं असतं?

एमआयएमचे तिकीट कसे मिळाले?

सहर शेख म्हणाली की, "शेवटच्या दिवसापर्यंत मला तिकीट देणार असल्याचं जितेंद्र आव्हाड सांगत होते. त्यावेळी आम्ही सर्वात मोठी रॅली काढली. तरीही त्यांनी दिलेला शब्द फिरवला. हे असे नेते लोकांना शब्द देतात, त्याच्यामागचा त्यांचा हेतू समजवून घ्यावा लागेल. शेवटच्या क्षणापर्यंत असे आपल्याला ताटकळत ठेवतात म्हणजे आपण इकडचे पण राहणार नाही आणि तिकडचेही राहणार नाही. आम्हाला जर आधीच माहिती असतं तर आमच्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी तयार होती. पण ते भाजपसोबत असल्यामुळे आम्ही त्यांना नाही म्हटलं. त्यामुळेच ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचं ठरवलं."

ज्यावेळी फॉर्म भरायले गेले त्यावेळी आतमध्ये काँग्रेस आणि एमआयएमचे लोक समोर एबी फॉर्म घेऊन उभे होते. त्यावेळी एमआयएमची ऑफर आल्यानंतर ती मला अल्लाहने पाठवल्याचा भास झाला. त्याचवेळी मी त्यांची ऑफर स्वीकारली आणि एमआयएममधून लढून जिंकले असं सहर शेख म्हणाली.

अल्लाहने बुद्धी दिली

इतर उमेदवारांचा प्रचार केला असता तर संपूर्ण मुंब्रामध्ये एमआयएमचे नगरसेवक निवडून आले असते असं सहर शेख म्हणाली. ती म्हणाली की, तुतारीवाले उमेदवार एमआयएमच्या विरोधात फक्त 200-300 मतांच्या फरकाने जिंकले आहेत. पण माझा विजय हा साडे पाच हजार मतांनी झाला आहे. मी त्यावेळी इतर उमेदवारांचा प्रचार केला असता तर संपूर्ण मुंब्रामध्ये एमआयएमचे उमेदवार निवडून आले असते असा माझा विश्वास आहे."

प्रचार करताना माझ्या वडिलांना सौम्य हृदयविकाराचा धक्का बसला होता. पण अशावेळीही मला अल्लाहने बुद्धी दिली, ताकद दिली. स्वतंत्र लढले असते तर मी निवडून आले असते, पण त्यासाठी अजून कष्ठ करावे लागले असते. त्यामुळे एमआयएमची उमेदवारी घेतल्याचं सहर शेखने स्पष्ट केलं.

कोणताही पक्ष धर्मनिरपेक्ष किंवा धर्मांध नसते, तर तुमचा विचार तसा असतो. तुमचे विचार हे धर्मनिरपेक्ष असायला हवेत, मग पक्ष कोणताही असो असं सहर शेखने स्पष्ट केलं. एमआयएमच्या 'पतंगा'मुळे मुंब्राच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. जितेंद्र आव्हाडांनी माझी एक उमेदवारी कापली, मी त्यांचा चार नगरसेवक पाडले अशा शब्दात तिने आव्हाडांवर टीका केली. 

व्हायरल व्हिडीओवर काय म्हणाली?

'कैसा हराया' असं वक्तव्य करणारा सहर शेखचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यावर बोलताना सहर शेख म्हणाली की, "ते बोलणं गरजेचं होतं, कारण जितेंद्र आव्हाडांना अहंकार होता. आम्ही हरणार असं त्यांना वाटायचं. त्यांनी माझी एक उमेदवारी कापली, मी त्यांचे चार नगरसेवक कापले. त्यामुळे चारही जागा जिंकल्यानंतर ते वाक्य हृदयातून आलेलं वाक्य होतं."

एमआयएमचे हा एक असा पक्ष आहे ज्याचे विचार धर्मनिरपेक्ष आहेत. आम्ही फक्त बोलण्यातून धर्मनिरपेक्ष नाही तर विचारांनेही धर्मनिरपेक्ष आहोत. आम्ही सर्वांना एकत्र घेऊन जाणार आहोत. शिक्षण, आरोग्यावर यापुढे काम करणार असं सहर शेख म्हणाली.

मुंब्रामध्ये नोटाला 12 हजार मतदान मिळालं आहे. त्यावर बोलताना सहर शेख म्हणाली की, "ज्या ठिकाणी एमआयएमचे उमेदवार नव्हते त्या ठिकाणी नोटाला मतदान करा असं आवाहन केलं होतं. ते मुंब्रामध्ये कामाला आलं, कारण आव्हाडांच्या एकाही उमेदवाराला एकही मत जाऊ नये असं माझं मत होतं."

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
Baramati : बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर? निवडणूक जाहीर होताच नवी अपडेट, नेमकं काय घडलं?
बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर? निवडणूक जाहीर होताच नवी अपडेट
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
Baramati and Rahuri By Election : बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जाहीर, 23 एप्रिलला मतदान, मतमोजणी 'या' दिवशी, निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक, जाणून घ्या
बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक जाहीर, 23 एप्रिलला मतदान, मतमोजणी 'या' दिवशी, निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
West Bengal Election in 2 phases: केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
Embed widget