एक्स्प्लोर

काँग्रेसवाले आता म्हणताहेत राज ठाकरेंच्या सभा घ्या, शरद पवारांचा खळबळजनक खुलासा

यावेळी राज ठाकरे यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना पवार म्हणाले की, मोदी सरकार जावं ही मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भूमिका आहे. मी अनेकदा या विषयी त्यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांना लोकसभेत रस नाही, विधानसभा मात्र ते लढविणार आहेत

बारामती : राज ठाकरे यांना लोकसभा निवडणुका लढविण्यात रस नाही. मात्र ते या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींच्या विरोधात सभा घेणार आहेत. लोकसभेसाठी मनसेला आघाडीत घेण्याविषयी काँग्रेस उत्सुक नव्हती. मात्र आता काँग्रेसवालेच सांगताहेत की राज ठाकरेंची सभा घ्या, असा खुलासा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
VIDEO | प्रत्येक प्रश्नाला नेमकी उत्तरे, शरद पवारांची 'पवार'फुल' मुलाखत | भाग 1 | विचारसंहिता | एबीपी माझा
'विचारसंहिता' या एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमांतर्गत एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर आणि लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी शरद पवार यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर दिलखुलास उत्तरे दिली.
यावेळी राज ठाकरे यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना पवार म्हणाले की, मोदी सरकार जावं ही मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भूमिका आहे. मी अनेकदा या विषयी त्यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांना लोकसभेत रस नाही, विधानसभा मात्र ते लढविणार आहेत.  ते जर मोदींच्या विरोधी मतप्रवाह तयार करत असतील, तर त्यांची मदत होऊ  शकते. ते स्वतंत्र भूमिका ठेवतील. म्हणून त्यांच्याशी सुसंवाद ठेवला, असे पवार म्हणाले.
ठाकरे यांनी काही लोकसभा मतदारसंघात सभा घेणार आहोत, असे सांगितले आहे. म्हणून आम्ही काही सूचना दिल्या आहेत. काँग्रेस राज ठाकरेंबाबत अनुकुल नव्हती, मात्र आता तेच सांगताहेत की राज ठाकरेंची सभा घ्या. राज ठाकरेंना सोबत घ्यायला हवं होतं, असंही पवार म्हणाले.
मी माढ्यातून लढणार नव्हतो, विजयसिंह मोहितेंना लढवायचं होतं : शरद पवार माढ्याची जागा सुरुवातीपासून आमच्याकडे आहे. ही जागा आणण्यासाठी अधिक काळजी घ्यावी म्हणून मी केवळ तिथून निवडणूक लढवणार असे सिग्नल देत होतो. मात्र मी तिथून लढणार नव्हतो. तसा माझा विचार नव्हता. आम्हाला विजयसिंह मोहितेंना तिथून लढवायचं होतं. मात्र त्या मतदारसंघात बाकीच्या 5 विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या नावाला विरोध होता. मात्र इथला उमेदवार हा त्यांच्या सहकार्याने दिला असता, असे प्रतिपादन  शरद पवार यांनी केले.
अहमदनगरच्या जागेच्या वादावरून बोलताना ते म्हणाले की, अहमदनगरच्या जागेविषयी काँग्रेसचे जे राज्यातील अन्य घटक होते ते आम्हाला सांगायचे की इथे तुमची ताकत जास्त आहे. ही जागा नेहमी राष्ट्रवादीने जिंकलीय, असे पवार यांनी सांगितले. अहमदनगरचा संघर्ष माझ्यामुळे नाही झाला. त्यावेळी राजीव गांधींनी ही जागा जिंकायचीय असं मला सांगितलं होतं, म्हणून मी लढलो आणि त्यावेळी जिंकलो. यावेळीही मी त्यांचं नावही घेतलं नव्हतं, असे पवार यांनी विखे पाटलांचे नाव न घेता सांगितलं. अहमदनगरचं गणित स्पष्ट आहे. राष्ट्रवादीकडे मत जास्त होती. हे माझ्या सहकाऱ्यांचा सामूहिक मत होतं, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला, असे ते म्हणाले.
मोदींएवढी व्यक्तिगत टीका कुणी केली नाही, शरद पवारांचे मोदींवर टीकास्त्र राजकारणात आतापर्यंत केवळ धोरणात्मक टीका व्हायची. मात्र नरेंद्र मोदींऐवढी व्यक्तिगत टीका दुसरा कोणताच नेता करत नाही, अशा शब्दात शरद पवारांनी पंतप्रधानांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. तिहारमधील कैद्यानं राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडवल्याचा गौप्यस्फोट काल मोदींनी गोंदियात आयोजित सभेत केला होता. तसंच पवार कुटुंबांमध्ये कलह सुरू असल्याचं विधान मोदींनी वर्ध्यामधल्या सभेत केलं होतं. यावेळी पवार म्हणाले की, आज देशातील आणि राज्यातील राजकीय हवा बदलली आहे. आजच्या राज्यकर्त्यांच्या संदर्भात ग्रामीण भागातील नागरिकांच्या संतप्त भावना आहेत. अशी परिस्थिती आजवर कधी पाहिली नाही. देशाच्या पातळीवर बदल व्हावा अशी भावना लोकांची आहे, असे पवार म्हणाले. आता मोदींच्या प्रचाराची दिशा धार्मिक पाच वर्षापूर्वी गुजरात पॅटर्न हे विकासाचे मॉडेल आहे अशी भावना लोकांच्या मनात होती.  पाच वर्षांपूर्वी विकासाचे आश्वासन देत हे एनडीए सरकारमध्ये आले. विकास ही त्यांच्या प्रचाराची दिशा होती. मात्र आता मोदींच्या प्रचाराची दिशा धार्मिक आहे, अशी टीका पवारांनी केली. पाच वर्षात अपेक्षेची पूर्तता झाली नाही. मागील निवडणुकांत एकदाही हिंदू शब्द वापरला नाही, विकास हाच शब्द वापरला, आता मात्र हिंदू आणि दहशतवाद या शब्दाचा वापर करून निवडणुका लढवत आहेत, अशी घणाघाती टीका पवार यांनी केली. सत्ताधाऱ्यांना हल्ल्यांचा राजकीय फायदा घ्यायचाय मोदी हे 56 इंचाची छाती आहे, असे ज्या दिवसापासून सांगायला लागले तेव्हापासून यांचा उद्देश समोर येऊ लागला. दहशतवाद्यांवर आणि पाकिस्तानवर काँग्रेसच्या काळातही अनेक हल्ले केले, मात्र त्याचा गाजावाजा कधी केला नाही. या हल्ल्यांचे श्रेय हे सैन्याला दिलं पाहिजे. यात राजकारण आणू नये. मात्र यावेळी सरळ दिसत होतं की, यांना या हल्ल्यांचा राजकीय फायदा घ्यायचा आहे, असेही पवार म्हणाले. विखुरलेल्या विरोधकांना एकत्रित आणण्याचे प्रयत्न करू यावेळी ते म्हणाले की, देशात परिवर्तनाची गरज आहे. त्यासाठी आम्ही देशभरात मोदींच्या विरोधात एकत्र आलो. यासाठी मी पुढाकार घेतला. मी पुढाकार घेतल्याने मोदी नाराज झाले. माझा प्रामाणिक प्रयत्न असा होता की एनडीएविरोधी घटकांना एकत्र आणायचं. किमान संवाद व्हायला हवा, अशी माझी भूमिका होती. या लोकसभा निवडणुकीनंतरही विखुरलेल्या विरोधकांना एकत्रित आणण्याचे प्रयत्न करू, असेही पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप

व्हिडीओ

Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Embed widget