एक्स्प्लोर

Narendra Modi : आता काँग्रेस आणखी एकदा फुटणार, बिहार विधानसभा निवडणूक जिंकताच नरेंद्र मोदींचा नवा अंदाज

Narendra Modi : बिहार विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी नकारात्मक राजकारणामुळं काँग्रेस आणखी एकदा फुटणार असल्याचा दावा केला.

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएनं दणदणीत विजय मिळवला. भाजप, जदयू, लोजपा रामविलास, हिंदुस्थानी आवाम मोर्चा यांच्या एनडीएनं 202 जागांवर विजय मिळवत पुन्हा बिहारची सत्ता मिळवली आहे. भाजपनं बिहारच्या विजयानिमित्त विजयोत्सव दिल्लीत आयोजित केला होता. त्या विजयोत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि राजदवर जोरदार हल्लाबोल केला. बिहारच्या जनतेनं पुन्हा सत्ता सोपवल्याबद्दल त्यांना नमन करतो, असं मोदी म्हणाले. यावेळी नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणखी एकदा फुटणार असल्याचं म्हटलं.

नरेंद्र मोदींनी बिहारच्या जनतेनं सर्वात मोठा जनादेश एनडीएला दिल्याचं म्हटलं सर्व पक्षांतर्फे बिहारच्या जनतेला नमन करतो, असं मोदी म्हणाले. नरेंद्र मोदींनी यावेळी लोकनायक जयप्रकाश नारायण आणि भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांना नमम करत असल्याचं मोदी म्हणाले. बिहारमध्ये काही पक्षांनी मुस्लीम यादव फॉर्म्युला बनवला होता. मात्र, आजच्या विजयानं हे समीकरण बदलून महिला आणि युवा असं झालं आहे.

नरेंद्र मोदींनी आता बिहारमध्ये पुन्हा कट्टा संरकार कधी येणार नाही, असं म्हटलं. निवडणूक प्रचारात बिहारच्या जनतेला रेकॉर्डब्रेक मतदानाचा आग्रह केलेला, बिहारच्या लोकांनी सर्व रेकॉर्ड मोडले, एनडीएला प्रचंड मोठा विजय मिळवून देण्याचं आवाहन केलं होतं, त्याला बिहारच्या जनतेनं साथ दिली, असं मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या या विजयामुळं निवडणूक आयोगावरील लोकांचा विश्वास मजबूत झाल्याचं म्हटलं. गेल्या काही वर्षात मतदानातील टक्केवारी वाढली आहे. निवडणूक आयोगासाठी ही चांगली बाब राहिली आहे. बिहार कधी काळी माओवाद्यांमुळं त्रस्त होता. नक्षलवाद प्रभावित भागात 3 वाजता मतदान बंद करावं लागत होतं, आता एकाही ठिकाणी तसं होत नसल्याचं मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी यांनी पुढं म्हटलं की देशातील मतदारांनी, युवा मतदारांनी SIR ला गांभीर्यानं घेतलं आहे. बिहारच्या युवा मतदारांनी जोरदार पाठिंबा दिला आहे. आता प्रत्येक पक्षानं पोलिंग बूथवर पार्टीतील लोकांना सक्रीय करावं आणि SIR च्या कामाशी सोडून घ्यावं, असं मोदी म्हणाले. बिहारची ही भूमी आहे ज्याला भारताच्या लोकशाहीची जननी म्हटलं जातं. त्याच धरतीनं लोकशाहीवर हल्ला करणाऱ्या शक्तींना धूळ चारली आहे. बिहारनं पुन्हा दाखवलं असत्य पराभूत होतं, लोकांचा विश्वास जिकंतो, असं मोदी म्हणाले. बिहारनं दाखवून दिलं की जामीनावर असलेल्या लोकांना जनता साथ देणार नाही. देश आता खऱ्या सामाजिक न्यायासाठी मतदान करत आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. प्रत्येक कुटुंबाला संधी, सन्मान आणि समानता मिळावी, असं त्यांना वाटत, मोदींनी म्हटलं. भारताच्या जनतेला केवळ विकास हवाय, असं मोदी म्हणाले.

काँग्रेस आणखी एकदा फुटणार : नरेंद्र मोदी 

ज्या पक्षानं दशकांपर्यंत देशावर राज्य केलं , त्यांच्यावरील जनतेचा विश्वास सातत्यानं घसरत आहे. काँग्रेस अनेक राज्यात कित्येक वर्षांपासून सत्तेबाहेर आहे. बिहारमध्ये 35 वर्ष, गुजरातमध्ये 30 वर्ष, उत्तर प्रदेशात चार दशक आणि पश्चिम बंगालमध्ये पाच दशकांपासून काँग्रेस सत्तेत परत आली नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशातील सहा राज्यात विधानसभा निवडणूक झाली. सहा राज्य मिळून काँग्रेसचे शंभर आमदार विजयी झाले नाहीत. आम्ही आज जिंकलो तितक्या जागाही सहा राज्यात काँग्रेसला मिळवता आल्या नाहीत.काँग्रेसच्या राजकारणाचा आधार नकारात्मक राजकारण झाला आहे. चौकीदार चौर हे का नारा, संसदेचा वेळ वाया घालवणं, प्रत्येक संस्थावर हल्ले करणे, कधी ईव्हीएमवर प्रश्न, निवडणूक आयोगाला शिव्या, मतचोरीची रचलेल्या गोष्टी, देशाच्या दुश्मनांचा अजेंडा पुढं आणण्याचं काम काँग्रेस करतेय. काँग्रेसकडे देशाच्या विकासाचा अजेंडा नाही. आज काँग्रेस मुस्लीम लीगी मावोवादी काँग्रेस झालीय, अशी टीका मोदींनी केली. काँग्रेसचा पूर्ण अजेंडा यावर चालतो, त्यामुळं काँग्रेसच्या आत एक वेगळा गट निर्माण होतोय, जो नकारात्मक राजकारणामुळं अस्वस्थ आहे. काँग्रेसच्या नामदारांप्रती खूप नाराजी वाढलीय. येत्या काळात काँग्रेसचं मोठं विभाजन होईल, असं मोदी म्हणाले. काँग्रेस आपल्या नकारात्मक राजकारणात एकाच वेळी सर्वांना बुडवत आहे, मोदींनी म्हटलं.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला

व्हिडीओ

Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?
Eknath Shinde Vidhan Parishad : T 20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजय, शिंदेंकडून अभिनंदन प्रस्ताव
Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
Share Market Crash : युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
Embed widget