एक्स्प्लोर

Narendra Modi : आता काँग्रेस आणखी एकदा फुटणार, बिहार विधानसभा निवडणूक जिंकताच नरेंद्र मोदींचा नवा अंदाज

Narendra Modi : बिहार विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी नकारात्मक राजकारणामुळं काँग्रेस आणखी एकदा फुटणार असल्याचा दावा केला.

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएनं दणदणीत विजय मिळवला. भाजप, जदयू, लोजपा रामविलास, हिंदुस्थानी आवाम मोर्चा यांच्या एनडीएनं 202 जागांवर विजय मिळवत पुन्हा बिहारची सत्ता मिळवली आहे. भाजपनं बिहारच्या विजयानिमित्त विजयोत्सव दिल्लीत आयोजित केला होता. त्या विजयोत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि राजदवर जोरदार हल्लाबोल केला. बिहारच्या जनतेनं पुन्हा सत्ता सोपवल्याबद्दल त्यांना नमन करतो, असं मोदी म्हणाले. यावेळी नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणखी एकदा फुटणार असल्याचं म्हटलं.

नरेंद्र मोदींनी बिहारच्या जनतेनं सर्वात मोठा जनादेश एनडीएला दिल्याचं म्हटलं सर्व पक्षांतर्फे बिहारच्या जनतेला नमन करतो, असं मोदी म्हणाले. नरेंद्र मोदींनी यावेळी लोकनायक जयप्रकाश नारायण आणि भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांना नमम करत असल्याचं मोदी म्हणाले. बिहारमध्ये काही पक्षांनी मुस्लीम यादव फॉर्म्युला बनवला होता. मात्र, आजच्या विजयानं हे समीकरण बदलून महिला आणि युवा असं झालं आहे.

नरेंद्र मोदींनी आता बिहारमध्ये पुन्हा कट्टा संरकार कधी येणार नाही, असं म्हटलं. निवडणूक प्रचारात बिहारच्या जनतेला रेकॉर्डब्रेक मतदानाचा आग्रह केलेला, बिहारच्या लोकांनी सर्व रेकॉर्ड मोडले, एनडीएला प्रचंड मोठा विजय मिळवून देण्याचं आवाहन केलं होतं, त्याला बिहारच्या जनतेनं साथ दिली, असं मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या या विजयामुळं निवडणूक आयोगावरील लोकांचा विश्वास मजबूत झाल्याचं म्हटलं. गेल्या काही वर्षात मतदानातील टक्केवारी वाढली आहे. निवडणूक आयोगासाठी ही चांगली बाब राहिली आहे. बिहार कधी काळी माओवाद्यांमुळं त्रस्त होता. नक्षलवाद प्रभावित भागात 3 वाजता मतदान बंद करावं लागत होतं, आता एकाही ठिकाणी तसं होत नसल्याचं मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी यांनी पुढं म्हटलं की देशातील मतदारांनी, युवा मतदारांनी SIR ला गांभीर्यानं घेतलं आहे. बिहारच्या युवा मतदारांनी जोरदार पाठिंबा दिला आहे. आता प्रत्येक पक्षानं पोलिंग बूथवर पार्टीतील लोकांना सक्रीय करावं आणि SIR च्या कामाशी सोडून घ्यावं, असं मोदी म्हणाले. बिहारची ही भूमी आहे ज्याला भारताच्या लोकशाहीची जननी म्हटलं जातं. त्याच धरतीनं लोकशाहीवर हल्ला करणाऱ्या शक्तींना धूळ चारली आहे. बिहारनं पुन्हा दाखवलं असत्य पराभूत होतं, लोकांचा विश्वास जिकंतो, असं मोदी म्हणाले. बिहारनं दाखवून दिलं की जामीनावर असलेल्या लोकांना जनता साथ देणार नाही. देश आता खऱ्या सामाजिक न्यायासाठी मतदान करत आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. प्रत्येक कुटुंबाला संधी, सन्मान आणि समानता मिळावी, असं त्यांना वाटत, मोदींनी म्हटलं. भारताच्या जनतेला केवळ विकास हवाय, असं मोदी म्हणाले.

काँग्रेस आणखी एकदा फुटणार : नरेंद्र मोदी 

ज्या पक्षानं दशकांपर्यंत देशावर राज्य केलं , त्यांच्यावरील जनतेचा विश्वास सातत्यानं घसरत आहे. काँग्रेस अनेक राज्यात कित्येक वर्षांपासून सत्तेबाहेर आहे. बिहारमध्ये 35 वर्ष, गुजरातमध्ये 30 वर्ष, उत्तर प्रदेशात चार दशक आणि पश्चिम बंगालमध्ये पाच दशकांपासून काँग्रेस सत्तेत परत आली नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशातील सहा राज्यात विधानसभा निवडणूक झाली. सहा राज्य मिळून काँग्रेसचे शंभर आमदार विजयी झाले नाहीत. आम्ही आज जिंकलो तितक्या जागाही सहा राज्यात काँग्रेसला मिळवता आल्या नाहीत.काँग्रेसच्या राजकारणाचा आधार नकारात्मक राजकारण झाला आहे. चौकीदार चौर हे का नारा, संसदेचा वेळ वाया घालवणं, प्रत्येक संस्थावर हल्ले करणे, कधी ईव्हीएमवर प्रश्न, निवडणूक आयोगाला शिव्या, मतचोरीची रचलेल्या गोष्टी, देशाच्या दुश्मनांचा अजेंडा पुढं आणण्याचं काम काँग्रेस करतेय. काँग्रेसकडे देशाच्या विकासाचा अजेंडा नाही. आज काँग्रेस मुस्लीम लीगी मावोवादी काँग्रेस झालीय, अशी टीका मोदींनी केली. काँग्रेसचा पूर्ण अजेंडा यावर चालतो, त्यामुळं काँग्रेसच्या आत एक वेगळा गट निर्माण होतोय, जो नकारात्मक राजकारणामुळं अस्वस्थ आहे. काँग्रेसच्या नामदारांप्रती खूप नाराजी वाढलीय. येत्या काळात काँग्रेसचं मोठं विभाजन होईल, असं मोदी म्हणाले. काँग्रेस आपल्या नकारात्मक राजकारणात एकाच वेळी सर्वांना बुडवत आहे, मोदींनी म्हटलं.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
Embed widget