Jalgaon Accident: धक्कादायक! दोन नंबरप्लेटवाल्या कारने चौघांना उडवलं; एर्टिंगातील चालक फरार, जळगावमधील घटना
पोलिसांकडून अपघाताची नोंद करण्यात आली असून फरार चालकाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.

Jalgaon Accident: जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात भीषण अपघात झालाय. मुंबई- नागपूर महामार्गावर भरधाव कारने चौघांना उडवल्याच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडालीय. या अपघातात चारही जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. ही घटना मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा गावाजवळील फाट्याजवळ घडली. धक्कादायक बाब म्हणजे या कारला दोन नंबरप्लेट असल्याने आणि अपघातानंतर कारमधील व्यक्ती घटनास्थळावरून फरार झाला.
Jalgaon Accident: नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-नागपूर महामार्गावरून एक एर्टिगा कार राँग साइडने येत होती. यावेळी रस्त्यावर असलेल्या चौघांना कारने जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की चौघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. सध्या जखमींवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. मुक्ताईनगरच्या हरताळा गाव जवळील ही घटना आहे.
दरम्यान, या घटनेत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. अपघात करणाऱ्या कारवर दोन वेगवेगळ्या नंबर प्लेट असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. त्यामुळे या घटनेबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. अपघातानंतर कारमधील चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहितीही मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून अपघाताची नोंद करण्यात आली असून फरार चालकाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.
पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा परिसरात आग
पुण्यातील ऐतिहासिकशनिवार वाडा परिसरात अचानक आग लागल्याने परिसरात काही काळ धावपळ उडाली. शनिवार वाड्याजवळील देसाई कॉलेजसमोर झाडांचा पालापाचोळा आणि फांद्यांना मोठ्या प्रमाणात आग लागली होती. त्यामुळे धुराचे लोट परिसरात पसरले. घटनेची माहिती मिळताचअग्निशमन दलाची गाडी तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि जवानांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाले नाही. मात्र वाळलेले गवत व पालापाचोळा साचल्यामुळे स्वच्छतेचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे.























