एक्स्प्लोर

Maharashtra Gram Panchayat Election 2022: ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 74 टक्के मतदान, 20 डिसेंबरला लागणार निकाल, जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात किती झालं मतदान

Maharashtra Gram Panchayat Election 2022: राज्यातील 7 हजार 682 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

Maharashtra Gram Panchayat Election 2022: राज्यभरातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे 74 टक्के मतदान झाले. यावेळी सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले.  राज्य निवडणूक आयोगाने 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या,  तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे आज प्रत्यक्षात 7 हजार 135  ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30  ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान झाले. दुपारी 3.30 पर्यंत प्राथमिक माहितीनुसार सरासरी 67 टक्के मतदान झाले होते. नक्षलग्रस्तभागात दुपारी 3.30 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती. सर्व ठिकाणी 20 डिसेंबर 2022 रोजी  मतमोजणी होईल. ग्रामपंचायतींच्या या निवडणुकीत नागरिकांमध्ये चांगलाच उत्साह पाहायला मिळाला आहे. यामध्ये तरुणांसह वृद्धांनीही पुढे येऊन मोठ्या प्राणात मतदान केलं. यातच ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत कोणत्या जिल्ह्यात किती मतदान झालं हे जाणून घेऊ...

Raigad Gram Panchayat Election  :  रायगड जिल्ह्यात दुपारी 3.30 वाजेपर्यंत सुमारे 70.82 टक्के मतदान
 
रायगड जिल्ह्यात दुपारी 3.30 वाजेपर्यंत सुमारे 70.82 टक्के मतदान झाले आहे. उरण येथे सर्वाधिक 77.81 टक्के मतदान झाले.  म्हसळा येथे 59.08 टक्के मतदान झाले.

Gram Panchayat Election  : धुळे जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक, दुपारी 3.30 वाजेपर्यंत 65.90 % मतदान

धुळे जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक, दुपारी 3.30 वाजेपर्यंत 65.90 टक्के मतदान झाले आहे.

Akola Gram Panchayat Election : जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी दुपारी 3.30 वाजेपर्यंत 60.60 टक्के मतदान

जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी दुपारी 3.30 वाजेपर्यंत 60.60 टक्के मतदान झाले. जिल्ह्यात 266 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले आहे.

Sindhudurg Gram Panchayat Election : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 59.08 टक्के मतदान

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 59.08 टक्के मतदान झालं आहे.

Bhandara Gram Panchayat Election : भंडाऱ्यात दुपारी 3.30 वाजेपर्यंत 64.62 टक्के मतदान
 
भंडारा जिल्ह्यातील 303 ग्रामपंचायतची निवडणूक पूर्णपणे शांततेत पार पडली. 1049 मतदान केंद्रावर ही निवडणूक पार पडली. दुपारी 3.30 वाजेपर्यंत 64.62 टक्के मतदान झाले आहे. 

Wardha Gram Panchayat Election : वर्धा जिल्ह्यात दुपारी 3.30 वाजेपर्यंत 66.17%मतदान झालंय


वर्धा जिल्ह्यातील 113 ग्रामपंचायत निवडणूकांसाठी दुपारी 3.30 वाजेपर्यंत 66.17 टक्के मतदान झालं.

Gram Panchayat Election : जळगाव जिल्ह्यात दुपारी साडेतीन वाजतापर्यंत मतदान टक्केवारी 68.58 

जळगाव जिल्ह्यात दुपारी साडेतीन वाजतापर्यंत मतदान टक्केवारी 68.58 इतकी आहे. 

Gram Panchayat Election : यवतमाळ  जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी दुपारी 3.30 वाजेपर्यंत 60.45 टक्के मतदान

जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी दुपारी 3.30 वाजेपर्यंत 60.45 टक्के मतदान झालं आहे. जिल्ह्यात 93 ग्रामपंचायतीसाठी मतदान झालं.

Gram Panchayat Election : दुपारी  3:30 वाजेपर्यंत अहमदनगर ग्रामपंचायत मतदान टक्केवारी

अहमदनगर ग्रामपंचायत मतदान टक्केवारी : अहमदनगर जिल्ह्यात 190 ग्रामपंचायतीसाठी दुपारी  3:30 वाजेपर्यंत 69.42 टक्के मतदान झालं आहे.

प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या

ठाणे - 35, पालघर - 62, रायगड - 191, रत्नागिरी - 163, सिंधुदुर्ग - 291, नाशिक - 188, धुळे - 118, जळगाव - 122, अहमदनगर - 195, नंदुरबार - 117, पुणे - 176, सोलापूर - 169, सातारा - 259, सांगली - 416, कोल्हापूर - 429, औरंगाबाद - 208, बीड - 671, नांदेड - 160, उस्मानाबाद- 165, परभणी - 119, जालना - 254, लातूर - 338, हिंगोली - 61, अमरावती - 252, अकोला - 265, यवतमाळ - 93, बुलडाणा - 261, वाशीम - 280, नागपूर - 234, वर्धा - 111, चंद्रपूर - 58, भंडारा - 304, गोंदिया - 345, गडचिरोली- 25. एकूण - 7,135.   

संबंधित बातमी: 

Maharashtra Gram Panchayat Election 2022 : नवरी मंडपात जाण्याआधी मतदान केंद्रावर, 104 वर्षांच्या आजोबांनीही बजावला हक्क; गावगाड्यात मतदानाचा उत्साह

महत्त्वाच्या बातम्या

SIR In Maharashtra: मतदार यादीत आपले नाव नोंदवणाऱ्या प्रत्येक नवीन मतदाराला त्यांच्या पालकांचा SIR तपशील द्यावा लागणार! निवडणूक आयोगाने हा नियम का केला?
मतदार यादीत आपले नाव नोंदवणाऱ्या प्रत्येक नवीन मतदाराला त्यांच्या पालकांचा SIR तपशील द्यावा लागणार! निवडणूक आयोगाने हा नियम का केला?
Actor Sanjeeb Singh Dies Of Heart Attack: 13 तासांचं वर्किंग शेड्यूल, शुटिंगवेळीच अस्वस्थ वाटू लागलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
13 तासांचं वर्किंग शेड्यूल, शुटिंगवेळीच अस्वस्थ वाटू लागलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
Ahilyanagar Shrirampur Band : श्रीरामपुरात गुन्हेगारीविरोधात जनक्षोभ! हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येनंतर सलग दुसऱ्या दिवशी शहर कडकडीत बंद; मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून आंदोलन, नेमकं काय घडलं?
श्रीरामपुरात गुन्हेगारीविरोधात जनक्षोभ! हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येनंतर सलग दुसऱ्या दिवशी शहर कडकडीत बंद; मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून आंदोलन, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut: सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SIR In Maharashtra: मतदार यादीत आपले नाव नोंदवणाऱ्या प्रत्येक नवीन मतदाराला त्यांच्या पालकांचा SIR तपशील द्यावा लागणार! निवडणूक आयोगाने हा नियम का केला?
मतदार यादीत आपले नाव नोंदवणाऱ्या प्रत्येक नवीन मतदाराला त्यांच्या पालकांचा SIR तपशील द्यावा लागणार! निवडणूक आयोगाने हा नियम का केला?
Actor Sanjeeb Singh Dies Of Heart Attack: 13 तासांचं वर्किंग शेड्यूल, शुटिंगवेळीच अस्वस्थ वाटू लागलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
13 तासांचं वर्किंग शेड्यूल, शुटिंगवेळीच अस्वस्थ वाटू लागलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
Ahilyanagar Shrirampur Band : श्रीरामपुरात गुन्हेगारीविरोधात जनक्षोभ! हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येनंतर सलग दुसऱ्या दिवशी शहर कडकडीत बंद; मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून आंदोलन, नेमकं काय घडलं?
श्रीरामपुरात गुन्हेगारीविरोधात जनक्षोभ! हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येनंतर सलग दुसऱ्या दिवशी शहर कडकडीत बंद; मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून आंदोलन, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut: सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Eknath Khadse and Sudhir Mungantiwar: Eknath Khadse and Sudhir Mungantiwar: नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, मुनगंटीवार म्हणाले, 'जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा खडसेंनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय'
नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, मुनगंटीवार म्हणाले, 'जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा खडसेंनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय'
Sanjay Ghadi : दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
Sachin Ahir on Omraje Nimbalkar: टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
NCP on Chief Minister Post: 'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
Embed widget