एक्स्प्लोर

Maharashtra Gram Panchayat Election 2022: ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 74 टक्के मतदान, 20 डिसेंबरला लागणार निकाल, जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात किती झालं मतदान

Maharashtra Gram Panchayat Election 2022: राज्यातील 7 हजार 682 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

Maharashtra Gram Panchayat Election 2022: राज्यभरातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे 74 टक्के मतदान झाले. यावेळी सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले.  राज्य निवडणूक आयोगाने 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या,  तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे आज प्रत्यक्षात 7 हजार 135  ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30  ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान झाले. दुपारी 3.30 पर्यंत प्राथमिक माहितीनुसार सरासरी 67 टक्के मतदान झाले होते. नक्षलग्रस्तभागात दुपारी 3.30 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ होती. सर्व ठिकाणी 20 डिसेंबर 2022 रोजी  मतमोजणी होईल. ग्रामपंचायतींच्या या निवडणुकीत नागरिकांमध्ये चांगलाच उत्साह पाहायला मिळाला आहे. यामध्ये तरुणांसह वृद्धांनीही पुढे येऊन मोठ्या प्राणात मतदान केलं. यातच ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत कोणत्या जिल्ह्यात किती मतदान झालं हे जाणून घेऊ...

Raigad Gram Panchayat Election  :  रायगड जिल्ह्यात दुपारी 3.30 वाजेपर्यंत सुमारे 70.82 टक्के मतदान
 
रायगड जिल्ह्यात दुपारी 3.30 वाजेपर्यंत सुमारे 70.82 टक्के मतदान झाले आहे. उरण येथे सर्वाधिक 77.81 टक्के मतदान झाले.  म्हसळा येथे 59.08 टक्के मतदान झाले.

Gram Panchayat Election  : धुळे जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक, दुपारी 3.30 वाजेपर्यंत 65.90 % मतदान

धुळे जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक, दुपारी 3.30 वाजेपर्यंत 65.90 टक्के मतदान झाले आहे.

Akola Gram Panchayat Election : जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी दुपारी 3.30 वाजेपर्यंत 60.60 टक्के मतदान

जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी दुपारी 3.30 वाजेपर्यंत 60.60 टक्के मतदान झाले. जिल्ह्यात 266 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले आहे.

Sindhudurg Gram Panchayat Election : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 59.08 टक्के मतदान

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 59.08 टक्के मतदान झालं आहे.

Bhandara Gram Panchayat Election : भंडाऱ्यात दुपारी 3.30 वाजेपर्यंत 64.62 टक्के मतदान
 
भंडारा जिल्ह्यातील 303 ग्रामपंचायतची निवडणूक पूर्णपणे शांततेत पार पडली. 1049 मतदान केंद्रावर ही निवडणूक पार पडली. दुपारी 3.30 वाजेपर्यंत 64.62 टक्के मतदान झाले आहे. 

Wardha Gram Panchayat Election : वर्धा जिल्ह्यात दुपारी 3.30 वाजेपर्यंत 66.17%मतदान झालंय


वर्धा जिल्ह्यातील 113 ग्रामपंचायत निवडणूकांसाठी दुपारी 3.30 वाजेपर्यंत 66.17 टक्के मतदान झालं.

Gram Panchayat Election : जळगाव जिल्ह्यात दुपारी साडेतीन वाजतापर्यंत मतदान टक्केवारी 68.58 

जळगाव जिल्ह्यात दुपारी साडेतीन वाजतापर्यंत मतदान टक्केवारी 68.58 इतकी आहे. 

Gram Panchayat Election : यवतमाळ  जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी दुपारी 3.30 वाजेपर्यंत 60.45 टक्के मतदान

जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी दुपारी 3.30 वाजेपर्यंत 60.45 टक्के मतदान झालं आहे. जिल्ह्यात 93 ग्रामपंचायतीसाठी मतदान झालं.

Gram Panchayat Election : दुपारी  3:30 वाजेपर्यंत अहमदनगर ग्रामपंचायत मतदान टक्केवारी

अहमदनगर ग्रामपंचायत मतदान टक्केवारी : अहमदनगर जिल्ह्यात 190 ग्रामपंचायतीसाठी दुपारी  3:30 वाजेपर्यंत 69.42 टक्के मतदान झालं आहे.

प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या

ठाणे - 35, पालघर - 62, रायगड - 191, रत्नागिरी - 163, सिंधुदुर्ग - 291, नाशिक - 188, धुळे - 118, जळगाव - 122, अहमदनगर - 195, नंदुरबार - 117, पुणे - 176, सोलापूर - 169, सातारा - 259, सांगली - 416, कोल्हापूर - 429, औरंगाबाद - 208, बीड - 671, नांदेड - 160, उस्मानाबाद- 165, परभणी - 119, जालना - 254, लातूर - 338, हिंगोली - 61, अमरावती - 252, अकोला - 265, यवतमाळ - 93, बुलडाणा - 261, वाशीम - 280, नागपूर - 234, वर्धा - 111, चंद्रपूर - 58, भंडारा - 304, गोंदिया - 345, गडचिरोली- 25. एकूण - 7,135.   

संबंधित बातमी: 

Maharashtra Gram Panchayat Election 2022 : नवरी मंडपात जाण्याआधी मतदान केंद्रावर, 104 वर्षांच्या आजोबांनीही बजावला हक्क; गावगाड्यात मतदानाचा उत्साह

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध

व्हिडीओ

Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण
Dhanashree Kolge vs Tajasvee GHosalkar : TV वरील चेहरा वि.रस्त्यावरील चेहरा, घोसाळकरांविरुद्ध रणशिंग
Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?
Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
Embed widget