एक्स्प्लोर

Palghar News : श्रीनिवास वनगांनतर माजी आमदार गायब, अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले भाजपचे अमित घोडा 24 तासांपासून नॉट रिचेबल

Amit Ghoda : पालघरमधील नेत्यांची नॉट रिचेबल होण्याची मालिका सुरु झाली आहे. भाजपचे माजी आमदार अमित घोडा सध्या नॉट रिचेबल आहेत. गेल्या 24 तासांपासून ते बेपत्ता आहेत.

पालघर : राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यावेळी पालघर विधानसभा मतदारसंघ राज्यभर चर्चेत आहे. शिवसेनेतील बंडावेळी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारे आमदार श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी नाकारल्यानंतर जे घडलं त्यामुळं पालघरची जोरदार चर्चा सुरु होती. पालघरमधून उमेदवारी नाकारताच श्रीनिवास वनगा यांनी पहिल्यांदा उद्धव ठाकरे देवमाणूस असल्याचं म्हणत त्यांची माफी मागायची असल्याचं म्हटलं. त्यानंतर ते काही दिवस संपर्काबाहेर होते. श्रीनिवास वनगा यांनी पुन्हा भूमिका बदल एकनाथ शिंदेंसोबत असल्याचं म्हटलं. एक प्रकरण शांत होत असतानाच भाजप नेते माजी आमदार अमित घोडा नॉट रिचेबल झाले आहेत. 
  
राज्यात विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. लवकरच प्रचाराला सुरुवात होणार आहे. पण पालघरमध्ये नॉट रिचेबल होण्याचा ड्रामा सुरूच आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते श्रीनिवास वनगा तिकीट न दिल्यामुळे चार दिवस बेपत्ता झाले होते. आता पालघरमध्येच आणखी एक उमेदवार मागील 24 तासांपासून बेपत्ता आहे. त्यांचं नाव माजी आमदार अमित घोडा आहे.


भाजप नेते  माजी आमदार अमित घोडा यांनी पालघर विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते गेल्या 24 तासापासून नॉट रीचेबल झाले आहेत त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. महायुतीत ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे. त्यांनी भाजपाकडून आयात करण्यात आलेल्या माजी खासदार शिवसेनेचे राजेंद्र गावित यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. 

अमित घोडा अर्ज कायम ठेवणार?

अमित घोडा सध्या नॉट रिचेबल असून उमेदवारी अर्ज मागं घेण्याची तारीख 4 नोव्हेंबर आहे. त्या दिवसापर्यंत अमित घोडा यांनी माघार न घेतल्यास पालघरमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळेल.  महाविकास आघाडी कडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून  जयेंद्र दुबळा निवडणूक लढवत आहेत. श्रीनिवास वनगा यांना विधानपरिषदेवर घेण्याचा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती समोर आली होती. आता, वनगांच्यानंतर अमित घोडा यांची समजूत कशा प्रकारे काढली जाणार हे पाहावं लागेल. 

प्रचाराचा जोर वाढणार

महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं 4 नोव्हेंबरची तारीख महत्त्वाची आहे. त्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतली जातील. यानंतर 5 नोव्हेंबरपासून 18 नोव्हेंबर पर्यंत राज्यभरात प्रचाराचा धुरळा उडालेला पाहायला मिळेल. महाराष्ट्रात एका टप्प्यात सर्व जागांवर मतदान होणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. 

इतर बातम्या : 

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
Embed widget