एक्स्प्लोर

नरेंद्र मोदी स्वबळावर पहिल्यापेक्षा जास्त जागा जिंकणारे पहिले पंतप्रधान

फिर एक बार मोदी सरकार म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपने दिल्लीतील सत्ता कायम राखलीय. पहिल्या टर्मपेक्षा दुसऱ्या टर्ममध्ये जास्त जागा जिंकणारे ते पहिले पंतप्रधान ठरले आहेत. यापूर्वी इंदिरा गांधी यांनी 1967 आणि 1971 या सलगच्या दोन निवडणुकात पहिल्या टर्मपेक्षा जास्त जागा जिंकल्या होत्या, पण पहिल्यावेळी म्हणजे 1967 ला त्यांचा पक्ष राष्ट्रीय काँग्रेस होता तर 71 ला त्यांचा पक्ष इंदिरा काँग्रेस होता. प्रस्थापितांच्या सिंडिकेट काँग्रेस विरोधात त्यांनी स्वतःचा नवा गट उभा केला होता. त्यानंतर 1980 आणि 84 या सलगच्या दोन निवडणुकात काँग्रेसला पहिल्यापेक्षा जास्त मते मिळाली खरी पण 1980 ला इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या आणि 1984 ला राजीव गांधी पंतप्रधान झाले, इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर मिळालेल्या सहानुभूतीमुळे त्यांना अभूतपूर्व यश मिळालं होतं. मात्र नरेंद्र मोदी याचं यश हे निश्चितच वरील दोन्ही प्रकारातलं नाही

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे सर्व जागांवरील कल हाती आले आहेत. या निकालात भाजपसह मित्र पक्षांनी मोठी मुसंडी मारली आहे. मागील 2014 च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अधिक जागा मिळतील असं एकूण चित्र आहे. भाजप जवळपास 350 जागांवर आघाडीवर आहे. भाजप आणि मित्रपक्षांची ही आघाडी शेवटपर्यंत टिकली तर सलग दुसऱ्या टर्ममध्ये आधीपेक्षा अधिक जागा मिळवणारा भाजप पक्ष आणि नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान ठरणार आहेत.

2014 लोकसभा निवडणुकीत भाजपने 282 जागांवर विजय मिळवला होता. तर यंदा भाजप 299 जागांवर आघाडीवर आहे. 2014 लोकसभा निवडणुकीत भाजपसह मित्रपक्षांनी 336 जागांवर विजय मिळवला होता. तर यंदा भाजपसह मित्रपक्ष 344 जागावर आघाडीवर आहेत.

विरोधकांचा आक्रमक पवित्रा फेल

निवडणुकीच्या आधी काँग्रेस आणि विरोधीपक्षांनी भाजप विरोधात मोठी मोहीम उघडली होती. यामध्ये नोटाबंदी, राफेल घोटाळा, शेतकऱ्यांचे प्रश्न, जीएसटी, बेरोजगारी अशा विविध मुद्द्यांवर विरोधकांनी मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधकांचा हा प्रयत्न फेल झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

काँग्रेसने याआधी 1967-70 मध्ये इंदिरा गांधींच्या नेतृत्वात 520 पैकी 283 जागा जिंकून सत्ता स्थापन केली होती. त्यानंतरच्या 1971 च्या निवडणुकीत 520 पैकी 352 जागा काँग्रेसला मिळाल्या, मात्र त्यावेळी त्यांचा पक्ष वेगळा होता. प्रस्थापित काँग्रेस नेत्यांच्या विरोधात काँग्रेस इंडिकेट हा गट स्थापन करुन त्यांनी निवडणूक लढवली होती. प्रस्थापित काँग्रेसला त्यावेळी सिंडिकेट काँग्रेस म्हणायचे. याच 1971-77 टर्ममध्ये इंदिरा गांधींनी देशात दीड वर्ष आणीबाणी लागू केली.

आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत जनता पक्षाचं सरकार आलं. आता सत्तेत असलेल्या भाजपचा जुना अवतार म्हणजे जनसंघ जनता पक्षात सत्तेतील भागीदार होता. 1977 ते 79 या तीन वर्षात देशात मोरारजी देसाई आणि चौधरी चरणसिंग असे दोन पंतप्रधान झाले. त्यानंतर 1980 साली झालेल्या निवडणुकीत 353 जागा जिंकत इंदिरा गांधींनी पुनरागमन केलं. ऑक्टोबर 1984 मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाली.

त्यानंतर 1984 साली काँग्रेसने 404 जागा जिंकत पुन्हा सत्ता स्थापन केली आणि राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले. आजवरच्या इतिहासात लोकसभा निवडणुकीत एका पक्षाने जिंकलेल्या या सर्वाधिक जागा आहेत. मात्र इंदिरा गांधीच्या हत्येमुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीचा फायदा त्यावेळी काँग्रेसला मिळाला.

2019 लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपला सलग दुसऱ्या टर्ममध्ये आधीपेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र यावेळी कोणतीही सहानुभूतीही नाही किंवा पक्ष बदल अशी परिस्थिती नाही. त्यामुळे केवळ मोदींचा करिष्मा दोन्ही निवडणुकीत पाहायला मिळाला असल्याचं दिसून येत आहे.

VIDEO | बीडमध्ये प्रीतम मुंडे विजयाच्या उंबरठ्यावर, पंकजा आणि प्रीतम मुंडेंशी चर्चा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Mahalakshmi Race Course वर थीम पार्कचा मार्ग मोकळा,120 एकर जागा BMC ला देण्यास मंजुरीMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 26 June 2024Shivnath Darade on Election : मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीत चढाओढ, शिवनाथ दराडे ExclusiveMahendra Bhavsar Dhule : निवडणुकीत विजय आमचाच, महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Embed widget