एक्स्प्लोर

नरेंद्र मोदी स्वबळावर पहिल्यापेक्षा जास्त जागा जिंकणारे पहिले पंतप्रधान

फिर एक बार मोदी सरकार म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपने दिल्लीतील सत्ता कायम राखलीय. पहिल्या टर्मपेक्षा दुसऱ्या टर्ममध्ये जास्त जागा जिंकणारे ते पहिले पंतप्रधान ठरले आहेत. यापूर्वी इंदिरा गांधी यांनी 1967 आणि 1971 या सलगच्या दोन निवडणुकात पहिल्या टर्मपेक्षा जास्त जागा जिंकल्या होत्या, पण पहिल्यावेळी म्हणजे 1967 ला त्यांचा पक्ष राष्ट्रीय काँग्रेस होता तर 71 ला त्यांचा पक्ष इंदिरा काँग्रेस होता. प्रस्थापितांच्या सिंडिकेट काँग्रेस विरोधात त्यांनी स्वतःचा नवा गट उभा केला होता. त्यानंतर 1980 आणि 84 या सलगच्या दोन निवडणुकात काँग्रेसला पहिल्यापेक्षा जास्त मते मिळाली खरी पण 1980 ला इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या आणि 1984 ला राजीव गांधी पंतप्रधान झाले, इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर मिळालेल्या सहानुभूतीमुळे त्यांना अभूतपूर्व यश मिळालं होतं. मात्र नरेंद्र मोदी याचं यश हे निश्चितच वरील दोन्ही प्रकारातलं नाही

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे सर्व जागांवरील कल हाती आले आहेत. या निकालात भाजपसह मित्र पक्षांनी मोठी मुसंडी मारली आहे. मागील 2014 च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अधिक जागा मिळतील असं एकूण चित्र आहे. भाजप जवळपास 350 जागांवर आघाडीवर आहे. भाजप आणि मित्रपक्षांची ही आघाडी शेवटपर्यंत टिकली तर सलग दुसऱ्या टर्ममध्ये आधीपेक्षा अधिक जागा मिळवणारा भाजप पक्ष आणि नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान ठरणार आहेत.

2014 लोकसभा निवडणुकीत भाजपने 282 जागांवर विजय मिळवला होता. तर यंदा भाजप 299 जागांवर आघाडीवर आहे. 2014 लोकसभा निवडणुकीत भाजपसह मित्रपक्षांनी 336 जागांवर विजय मिळवला होता. तर यंदा भाजपसह मित्रपक्ष 344 जागावर आघाडीवर आहेत.

विरोधकांचा आक्रमक पवित्रा फेल

निवडणुकीच्या आधी काँग्रेस आणि विरोधीपक्षांनी भाजप विरोधात मोठी मोहीम उघडली होती. यामध्ये नोटाबंदी, राफेल घोटाळा, शेतकऱ्यांचे प्रश्न, जीएसटी, बेरोजगारी अशा विविध मुद्द्यांवर विरोधकांनी मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधकांचा हा प्रयत्न फेल झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

काँग्रेसने याआधी 1967-70 मध्ये इंदिरा गांधींच्या नेतृत्वात 520 पैकी 283 जागा जिंकून सत्ता स्थापन केली होती. त्यानंतरच्या 1971 च्या निवडणुकीत 520 पैकी 352 जागा काँग्रेसला मिळाल्या, मात्र त्यावेळी त्यांचा पक्ष वेगळा होता. प्रस्थापित काँग्रेस नेत्यांच्या विरोधात काँग्रेस इंडिकेट हा गट स्थापन करुन त्यांनी निवडणूक लढवली होती. प्रस्थापित काँग्रेसला त्यावेळी सिंडिकेट काँग्रेस म्हणायचे. याच 1971-77 टर्ममध्ये इंदिरा गांधींनी देशात दीड वर्ष आणीबाणी लागू केली.

आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत जनता पक्षाचं सरकार आलं. आता सत्तेत असलेल्या भाजपचा जुना अवतार म्हणजे जनसंघ जनता पक्षात सत्तेतील भागीदार होता. 1977 ते 79 या तीन वर्षात देशात मोरारजी देसाई आणि चौधरी चरणसिंग असे दोन पंतप्रधान झाले. त्यानंतर 1980 साली झालेल्या निवडणुकीत 353 जागा जिंकत इंदिरा गांधींनी पुनरागमन केलं. ऑक्टोबर 1984 मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाली.

त्यानंतर 1984 साली काँग्रेसने 404 जागा जिंकत पुन्हा सत्ता स्थापन केली आणि राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले. आजवरच्या इतिहासात लोकसभा निवडणुकीत एका पक्षाने जिंकलेल्या या सर्वाधिक जागा आहेत. मात्र इंदिरा गांधीच्या हत्येमुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीचा फायदा त्यावेळी काँग्रेसला मिळाला.

2019 लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपला सलग दुसऱ्या टर्ममध्ये आधीपेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र यावेळी कोणतीही सहानुभूतीही नाही किंवा पक्ष बदल अशी परिस्थिती नाही. त्यामुळे केवळ मोदींचा करिष्मा दोन्ही निवडणुकीत पाहायला मिळाला असल्याचं दिसून येत आहे.

VIDEO | बीडमध्ये प्रीतम मुंडे विजयाच्या उंबरठ्यावर, पंकजा आणि प्रीतम मुंडेंशी चर्चा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat : अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
Satara : साताऱ्यात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण झालं नव्हतं, फुटलेल्यांवर अपात्रतेची कारवाई करणार: मकरंद पाटील
साताऱ्यात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण झालं नव्हतं, फुटलेल्यांवर अपात्रतेची कारवाई करणार: मकरंद पाटील
Rupali Chakankar : अरविंद शिंदे म्हणतात, रुपाली चाकणकरांची बदनामी करु नका, गरज पडल्यास काँग्रेसमध्ये घेण्यासाठी शिफारस करु, यावर अतुल लोंढे म्हणाले...
रुपाली चाकणकरांची बदनामी करु नका, पुणे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची भूमिका; अतुल लोंढे म्हणतात ती शिंदेंची वैयक्तिक भूमिका
Mahesh Shinde : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या निवडणुकीनंतर साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”
साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”

व्हिडीओ

Praful Patel On Rupali Chakankar Ashok Kharat Case मोठी बातमी: अशोक खरात अतिशय घाणेरडा, जे कुणी त्याच्यासोबत...; प्रफुल पटेल यांचं मोठं विधान
Sushma Andhare : चाकणकर रात्री दोन वाजता फोन करून पीडितांना धमक्या द्यायच्या; खरात अन् चाकणकरांमध्ये कोणत्या वेळी काय बोलणं झालं
Iran vs US Israel Conflict : नजर अमेरिकेवर, युद्ध उंबरठ्यावर? Special Report
Raj Thackeray MNS Melava Speech|इराणची बाजू,महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, प्रत्येकाने ऐकावं असं भाषण
Sudhir Mungantiwar Special Report : सुधीर मुनगंटीवार म्हणतात... मी पुन्हा येईन!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat : अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
Satara : साताऱ्यात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण झालं नव्हतं, फुटलेल्यांवर अपात्रतेची कारवाई करणार: मकरंद पाटील
साताऱ्यात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण झालं नव्हतं, फुटलेल्यांवर अपात्रतेची कारवाई करणार: मकरंद पाटील
Rupali Chakankar : अरविंद शिंदे म्हणतात, रुपाली चाकणकरांची बदनामी करु नका, गरज पडल्यास काँग्रेसमध्ये घेण्यासाठी शिफारस करु, यावर अतुल लोंढे म्हणाले...
रुपाली चाकणकरांची बदनामी करु नका, पुणे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची भूमिका; अतुल लोंढे म्हणतात ती शिंदेंची वैयक्तिक भूमिका
Mahesh Shinde : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या निवडणुकीनंतर साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”
साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”
Shambhuraj Desai : सुरुवात भाजपनं केलीय, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शेवट करु, शंभूराज देसाईंचा जिल्हा परिषदेतील घडामोडींनंतर थेट इशारा
कामेश कांबळेंना शिवेंद्रराजे भोसले यांनी दम दिला, जिल्हा परिषदेत काय घडलं? शंभूराज देसाईंनी सगळं सांगितलं
'आगीशी खेळ खेळू नका, तुम्हाला जर खुमखुमी असेल, तर..' जयंत पाटलांनी झेडपी विजयाची 'छुपी मदत' जाहीरपणे सांगताच संजयकाका संतापले! सांगलीत वादाचा नवा अध्याय सुरु
'आगीशी खेळ खेळू नका, तुम्हाला जर खुमखुमी असेल, तर..' जयंत पाटलांनी झेडपी विजयाची 'छुपी मदत' जाहीरपणे सांगताच संजयकाका संतापले! सांगलीत वादाचा नवा अध्याय सुरु
'जर तुम्ही आमच्या रस्त्यांची नासधूस केली तर...' लंडनमध्ये सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकून उकिरडा करणाऱ्या दोन भारतीयांना जबरी दणका
'जर तुम्ही आमच्या रस्त्यांची नासधूस केली तर...' लंडनमध्ये सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकून उकिरडा करणाऱ्या दोन भारतीयांना जबरी दणका
Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषदेत भाजप सत्तेत, राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना पोलिसांनी उचललं तर शंभूराज देसाईंना दुखापत, साताऱ्यात कोण कोण फुटलं?  
सातारा जिल्हा परिषदेत हाय व्होल्टेज ड्रामा, भाजपची सत्ता तर राष्ट्रवादीच्या दोघांना पोलिसांनी उचललं, देसाईंना दुखापत, कोण फुटलं?
Embed widget