एक्स्प्लोर

हौसेने चप्पल चिन्ह घेतलं, आता आचारसंहितेच्या कचाट्यात, मतदानाला चप्पल घालून येण्यास बंदी

मतदानाला येणाऱ्यांना अनवाणी पायानंच यावं लागणार का? अशी चर्चा रंगली आहे. या अपक्ष उमेदवाराच्या पत्रकाची सध्या जोरदार चर्चा आहे.

Maharashtra Assembly Election 2024: राज्यात विधानसभेच्या मतदानाला आता अवघे ३ दिवस उरले आहेत. आपापल्या पक्षाचा झेंडा फडकवत राजकीय प्रचाराला रंग चढला आहे. दरम्यान, एका अपक्ष उमेदवाराच्या पत्रकानं निवडणूक अधिकाऱ्यांनाही टेन्शन घ्यायची वेळ आली आहे. आधी हौसेनं निवडणुकीचं चिन्ह घेतल्यानंतर हा उमेदवार आचारसंहितेच्या कचाट्यात सापडल्याचं दिसतंय. चप्पल निशाणी असल्यानं मतदानाच्या दिवशी बुथच्या २०० मी अंतरामध्ये कोणीही पायात चप्पल घातली तर त्यांच्यावर आचारसंहिताभंगाची कारवाई करण्यात यावी असं पत्रकच या अपक्ष उमेदवारानं काढलंय. सध्या या पत्रकाची जोरदार चर्चा आहे.

मतदानादिवशी चपला घालयच्या की नाही? चर्चा रंगली

धाराशिव जिल्ह्यातील परंडा मतदारसंघातून अपक्ष उभारलेले उमेदवार गुरुदास संभाजी कांबळे यांनी 'आदर्श आचारसंहिते'चा भंग होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिलंय. चप्पल ही माझी निशाणी असल्यानं ती पायात घातल्यानं माझा प्रचार व प्रसार होऊ शकतो. त्यामुळं बुथपासून २०० मीटरच्या आत मतदानाच्या दिवशी जर कोणी चप्पल घालून आलं तर त्याच्यावर आचारसंहिता भंग केल्याबद्दल कडक कारवाई करण्यात यावी असं या पत्रात या उमेदवारानं म्हटलंय. त्यामुळं आता परंड्यात मतदानाला येणाऱ्यांना अनवाणी पायानंच यावं लागणार का? अशी चर्चा रंगली आहे.

काय म्हणलंय पत्रकामध्ये?

'मी गुरुदास संभाजी कांबळे अपक्ष उमेदवार अनुक्रमांक 12 निशाणी चप्पल आपणास कळवू इच्छितो की सध्या आदर्श आचारसंहिता लक्षात घेता नियमाप्रमाणे मतदान बुत पासून 200 मीटरच्या आत कोणत्याही उमेदवाराचे चिन्ह प्रकाशित किंवा प्रदर्शित करण्यास सक्त मनाई असल्याने आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ शकतो व आचारसंहितेचा कुठल्याही प्रकारचा भंग होऊ नये म्हणून मी गुरुदास कांबळे आपणास लेखी अर्ज करतो की माझी निशाणी चप्पला असून त्याचा प्रचार व प्रसार मतदान बूथ पासून 200 मीटर च्या आत त आचारसंहिता भंग होऊ नये याची मी स्वतः दखल घेत असून त्याकरिता दिनांक 20/11/2024 रोजी मतदानाच्या दिवशी मतदान बूथच्या 200 मीटर अंतरामध्ये कोणतेही कर्मचारी पदाधिकारी उमेदवार व मतदार यांनी जर 200 मीटरच्या आत चप्पल घालून प्रवेश केल्यास त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी.'कारण चप्पल ही माझी निशाणी असल्यामुळे ती पायात घातल्याने माझा प्रचार व प्रसार लोकांनी पायात घालून प्रवेश केल्याने होऊ शकतो व आचार सहिता भंग होणार याच्यात शंकाच नाही. असं या पत्रकात म्हटलं आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आर्थिक निकषाच्या आधारे विक्रम काकडेंना उमेदवारी, विलास लांडेंचा घणाघात, वळसे पाटलांकडून मनधरणीचे प्रयत्न
आर्थिक निकषाच्या आधारे विक्रम काकडेंना उमेदवारी, विलास लांडेंचा घणाघात, वळसे पाटलांकडून मनधरणीचे प्रयत्न
भाजपाने 12 ट्रॅव्हल्स बुकिंग केल्या; विधानपरिषदेची उमेदवारी भरताच मतदारांना पर्यटनासाठी नेलं, भंडाऱ्यात राजकीय सामना
भाजपाने 12 ट्रॅव्हल्स बुकिंग केल्या; विधानपरिषदेची उमेदवारी भरताच मतदारांना पर्यटनासाठी नेलं, भंडाऱ्यात राजकीय सामना
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार नाहीच, कारण आलं समोर; ठाकरेंच्या शिवसेनेचा कुणाला पाठिंबा कुणाला?
नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार नाहीच, कारण आलं समोर; ठाकरेंच्या शिवसेनेचा कुणाला पाठिंबा कुणाला?

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Embed widget