एक्स्प्लोर

Manipur Election: मणिपूरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील 22 जागांसाठी 76.62 टक्के मतदानाची नोंद, 92 उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद

शनिवारी मणिपूर विधानसभेच्या 22 जागांवर मतदान पार पडले. या 22 जागांसाठी 76.62 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

Manipur Election : मणिपूर विधानसभेसाठी काल दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. काल विधानसभेच्या 22 जागांवर मतदान पार पडले. या 22 जागांसाठी 76.62 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. दरम्यान, निवडणुकीपूर्वी आणि नंतरही काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. कडेकोट सुरक्षा व्यवस्था आणि कोरोना प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करत 1 हजार 247 मतदान केंद्रांवर सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली होती. या टप्प्यात एकूण 8.38 लाख मतदार होते. 

दरम्यान, याबाबत मणिपूरचे मुख्य निवडणूक अधिकारी राजेश अग्रवाल यांनी सांगितले की, मणिपूर विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्पाही बहुतांश भागात शांततेत पार पडला. सायंकाळी एकूण 76.62 टक्के मतदान झाले आहे. यादरम्यान करोंग विधानसभा मतदारसंघात मतदानादरम्यान हिंसाचार झाल्याची घटना घडली आहे. या हिंसाचारात सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. यावेळी काही अज्ञात हल्लेखोरांनी इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील लामफेल भागात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) निलंबित नेते सी बिजॉय यांच्या घरावर देशी बनावटीचा बॉम्ब फेकला आहे. मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. 

दरम्यान, मणिपूरमध्ये विधानसभेच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज 10 जिल्ह्यांतील 22 जागांवर मतदान झाले. या मतदानात 92 उमेदवारांचे भविष्य नमतपेटीत बंद झाले आहे.   राज्याच्या बाह्य सर्किटमधील जिल्हे हे नागा पीपल्स फ्रंट (NPF) आणि काँग्रेसचे बालेकिल्ले राहिले आहेत. त्यामुळेच यावेळी हे पक्ष सत्ताधारी भाजपला येथून आवाहन देऊ शकणार का? हे पाहावं लागेल. या 22 जागांमध्ये यामध्ये भारतीय जनता पक्षाचे 12, काँग्रेसचे 18, नॅशनल पीपल्स पार्टीचे 11, जनता दल युनायटेड आणि नागा पीपल्स फ्रंटच्या प्रत्येकी दहा उमेदवारांचा समावेश आहे.

दरम्यान, पच राज्याच्य विधानसभा निवडणकांची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आहे. कारण फक्त उत्तर प्रदेशमधील मतदनाचा एक टप्पा राहिला आहे. बाकी सर्व ठिकाणची मतदान प्रक्रिया पार पडली आहे. गोवा, पंजाब, उत्तराकंड आणि मणिपूर या ठिकाणी सर्व जागंवरचे मतदान झाले आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील मतदानाचे सहा टप्पे पार पडले आहेत. केवळ एका टप्प्यातील मतदान बाकी आहे. या सर्व जागांचा निकाल येत्या 10 मार्चला जाहीर होणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget