एक्स्प्लोर

भाजपच्या हंसराज अहिरांचा पराभव म्हणजे दारुबंदीची पहिली विकेट, काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांच वक्तव्य

चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून निवडून आलेले आणि राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यात लागू असलेली दारुबंदी हटविण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी हंसराज अहिर यांचा पराभव दारुबंदीचा परिणाम असल्याचे सूतोवाच केला आहे.

चंद्रपूर : राज्यात आणि देशात भाजपच्या विजयाचा वारु उधळलेला असला तरी चंद्रपुरात मात्र भाजपला 'दारु'ण पराभव पत्करावा लागलाय. केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचा पराभव म्हणजे ही दारुबंदीची पहिली विकेट असल्याचं वक्तव्य काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. आतापर्यंत चार वेळा खासदार असलेले केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचा बाळू धानोरकर यांनी 45 हजार मतांनी पराभव केला. शुक्रवारी चंद्रपुरात मोठ्या दिमाखात काँग्रेसची विजय रॅली निघाली. त्यावेळी काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी ही दारुबंदीची पहिली विकेट असल्याचे म्हटले. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून निवडून आलेले आणि राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यात लागू असलेली दारुबंदी हटविण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी हंसराज अहिर यांचा पराभव दारुबंदीचा परिणाम असल्याचे सूतोवाच केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये निवडणुकीत देखील दारुबंदी वरुन कलगी तुरा रंगला होता. काँग्रेस दारुबंदी फसवी असल्याचे सांगत होती तर भाजप नेते दारुबंदीचे समर्थन करत होते. त्यातच आता काँग्रेसला विजय मिळाल्यामुळे काँग्रेस नेते दारुबंदी हटविण्याची उघडपणे मागणी करत आहे. Liquor Ban | चंद्रपूरमधील दारुबंदी उठवा, काँग्रेस खासदार सुरेश धानोरकरांची मागणी | ABP Majha चंद्रपुरातील दारुबंदी उठवा, खासदार बाळू धानोरकर यांची मागणी चंद्रपुरातील दारुबंदीमुळे महसूल आणि रोजगार बुडाला आहे. त्यामुळे दारुबंदी हटवा अशी मागणी महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी केली. 'एबीपी माझा'च्या 'ब्रेकफास्ट न्यूज' या कार्यक्रमात धानोरकर बोलत होते. धानोरकर म्हणाले की, "दारुबंदी हा विषय चुकीचाच होता. स्वत:च्या विधानसभा मतदारसंघामध्ये 15 हजारांच्या मतांसाठी सुधीर मुनगंटीवार यांनी हा निर्णय घेतला. इथे मोठ्या प्रमाणात लोक बेरोजगार झाले. दारुबंदीसाठी ज्या नियम आणि अटी ठेवल्या होत्या, त्याची कुठलीही अंमलबजावणी झालेली नाही. मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसाय सुरु आहे. सरकारचा महसूल सुद्धा बुडालेला आहे. लोकांना तो पटणारा विषय नाही. एका जिल्हात दारुबंदी करुन काय साध्य करणार आहे. तुमच्या हातात केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश आहे. पूर्ण राज्यात दारुबंदी करायला हवी." दारुबंदीनंतर चंद्रपूरात काय झालं? चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी होण्याआधी सरकारला दर वर्षी जवळपास 700 कोटींचा दारु विक्री आणि बार मधून महसूल मिळायचा. आता हाच महसूल सरकारला मिळायचा बंद झाला आहे. दारुमुळे बार, हॉटेल, इत्यादी व्यवसाय तेजीत होते पण ते आता पूर्णपणे ठप्प झाले आहे. या जिल्ह्यात 513 परवाना दारु विक्रेते होते तर 15 हजार लोकांना थेट रोजगार मिळायचा. आता लाकांचे रोजगाराचे हाल झाले आहे. दारुबंदी झाल्यामुळे बेरोजगार झालेल्या लोकांना स्किल डेवलपमेंट करुन पर्यायी व्यवसाय देता आला असता पण ते झाले नाही. दारुबंदी मुळे जिल्ह्यात शेकडो कोटींची दारु आणि मुद्देमाल जप्त केला गेलाय. हजारो लोकांवर दारुबंदीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तरी देखील दारुबंदी चा परिणाम झालेला नाही. दारुबंदी चा परिणाम काहीही असला तरी दारुबंदी कार्यकर्ते मात्र मागे हटायला तयार नाही. त्यांच्या मते बाळू धानोरकर यांनी नकारात्मक विचार सोडून दारुबंदी च्या प्रभावी अंमलबजावणी साठी पुढाकार घेतला पाहिजे. चंद्रपुरात चार वर्षांपासून दारुबंदी चंद्रपूर जिल्ह्यात चार वर्षांपूर्वी दारुबंदी झाली होती. 20 जानेवारी 2015 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दारुबंदीचा निर्णय घेतल्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. सुधीर मुनगंटीवार यांनी 2014 च्या विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान दारुबंदीचं आश्वासन दिलं होतं. वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात आधीपासूनच दारुबंदी लागू आहे. मात्र चंद्रपूर हा भौगोलिकदृष्ट्या दोन्ही जिल्ह्यांच्या मध्ये येतो. त्यामुळे चंद्रपुरात दारुबंदी नसल्याने वर्धा आणि गडचिरोलीतही दारुबंदीची नीट अंमलबजावणी होऊ शकत नव्हती. चंद्रपुरात राज्यातली सर्वाधिक दारु विक्री होते, असा तज्ज्ञांचा अभ्यास आहे. त्यामुळे चंद्रपुरात दारुबंदी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अभय बंग यांनी विशेष पुढाकार घेतला होता. बंग यांच्या मागणीला प्रतिसाद देत अखेर राज्य सरकारने चंद्रपुरात दारुबंदी लागू केली. दारुबंदी असलेला चंद्रपूर हा राज्यातील तिसरा जिल्हा ठरला. चंद्रपुरात दारुबंदी केल्याने वर्षाला सुमारे दोनशे कोटी रुपये कमी महसूल मिळत आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vinayak Raut On Bal Mane : 'उद्धव ठाकरे अडीच वाजेपर्यंत थांबले, पण हा माणूस...; बाळ मानेंच्या 'त्या' खेळीवर विनायक राऊतांचा गंभीर आरोप, म्हणाले, 'दुसऱ्याला संधी मिळू नये म्हणून'
'उद्धव ठाकरे अडीच वाजेपर्यंत थांबले, पण हा माणूस...; बाळ मानेंच्या 'त्या' खेळीवर विनायक राऊतांचा गंभीर आरोप, म्हणाले, 'दुसऱ्याला संधी मिळू नये म्हणून'
Narayan Rane : बाळ मानेंना सिरीयस घेऊ नका, विश्वास टाकायची गरज नाही; नारायण राणेंकडून घरचा आहेर, काय काय म्हणाले?
बाळ मानेंना सिरीयस घेऊ नका, विश्वास टाकायची गरज नाही; नारायण राणेंकडून घरचा आहेर, काय काय म्हणाले?
Nagpur Crime News: मुलीच्या डॉक्टर बनण्याच्या स्वप्नासाठी मध्य प्रदेशातून नागपुरात आले; पुन्हा नीट परीक्षा देण्याची हिंमत नाही म्हणून विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य, शेवटच्या चिट्ठीत म्हणाली....
मुलीच्या डॉक्टर बनण्याच्या स्वप्नासाठी मध्य प्रदेशातून नागपुरात आले; पुन्हा नीट परीक्षा देण्याची हिंमत नाही म्हणून विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य, शेवटच्या चिट्ठीत म्हणाली....
Nashik Vidhan Parishad Election 2026: 'जाहीर पाठिंबा देण्याचा विषयच येत नाही, निवडणूक खूप पुढे गेलीय'; महाजन-सामंत नाशिकमध्ये असतानाच गोकुळ गीतेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
'जाहीर पाठिंबा देण्याचा विषयच येत नाही, निवडणूक खूप पुढे गेलीय'; महाजन-सामंत नाशिकमध्ये असतानाच गोकुळ गीतेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

व्हिडीओ

Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasant More:
"घोडेबाजार नाही, ही 100% सेटलमेंट!", वसंत मोरेंचा शरद पवार गटावर घणाघात, म्हणाले, 'पुण्यात पाठीत खंजीर खुपसला, मविआतून बाहेर पडा; मी वरिष्ठांना सांगितलंय!'
Bal Mane : विनायक राऊत डोमकावळा, कोकणात शिवसेनेची वाट लावली, शिंदेंचे भाट म्हणून काम करतात, बाळ मानेंचा हल्लाबोल
विनायक राऊतांनी कोकणात शिंदेसेनेची सुपारी घेतली, ते शिंदेसेनेचे भाट, बाळ मानेंचा राणेंच्या घरासमोरुन पलटवार
Gold Silver Rate : आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, शेअर बाजारात तेजी, सोनं 1896 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 6000 रुपयांची घसरण
गुड न्यूज, सोनं 1896 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 6000 रुपयांची घसरण, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
Captain Bharat Bhardwaj Viral Video : दीक्षांत सोहळ्यात गुडघ्यावर बसून प्रपोज करणं तरुणाला महागात पडण्याची शक्यता; भारतीय लष्कर कारवाई करण्याच्या तयारीत
दीक्षांत सोहळ्यात गुडघ्यावर बसून प्रपोज करणं तरुणाला महागात पडण्याची शक्यता; भारतीय लष्कर कारवाई करण्याच्या तयारीत
Girish Mahajan: मंत्री गिरीश महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली 'पिस्तूल', नाशिकमध्ये खळबळ; PHOTO
मंत्री गिरीश महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली 'पिस्तूल', नाशिकमध्ये खळबळ; PHOTO
RBI Policy: रेपो रेट जैसे थे पण आरबीआयकडून तीन स्पष्ट संदेश, महागाईचा धोका ते विदेशी गुंतवणूक वाढीचे प्रयत्न, जाणून घ्या सविस्तर
रेपो रेट जैसे थे पण आरबीआयकडून तीन स्पष्ट संदेश, महागाई वाढीचं संकट ते विदेशी गुंतवणूक वाढीसाठी प्रयत्न, जाणून घ्या सविस्तर
Tukaram Munde News: जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
Aamir Khan Confirm His Wedding With Gauri Spratt: 'होय, खरंय... आम्ही लग्न करतोय!'; आमिर खाननं कन्फर्म केली तिसऱ्या लग्नाची गूड न्यूज, तारीखही सांगून टाकली
'होय, खरंय... आम्ही लग्न करतोय!'; आमिर खाननं कन्फर्म केली तिसऱ्या लग्नाची गूड न्यूज, तारीखही सांगून टाकली
Embed widget