एक्स्प्लोर

Devendra Fadnavis Maharashtra CM: देवेंद्र फडणवीसांभोवती वादळ घोंघावतंय, ते शांत न झाल्यास...; 'सामना'च्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय?

Devendra Fadnavis Maharashtra CM: आज सामना अग्रलेखातून देखील देवेंद्र फडणवीसांना होय, ते पुन्हा आले असं म्हणत शुभेच्छा आणि टोला लगावला. 

Devendra Fadnavis Maharashtra CM: महायुती सरकारचा शपथविधी गुरुवारी (5 नोव्हेंबर) आझाद मैदानावर संपन्न झाला. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री, तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रिपद आणि गोपनियतेची शपथ घेतली. या शपथविधीनंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराची उत्सुकता आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यातील विविध नेत्यांनी तिघांनाही शुभेच्छा दिल्या. आज सामना अग्रलेखातून देखील देवेंद्र फडणवीसांना होय, ते पुन्हा आले असं म्हणत शुभेच्छा आणि टोला लगावला. 

सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय?

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसणे म्हणजे आता काटेरी खुर्चीवर विराजमान होण्यासारखेच आहे. देवेंद्र फडणवीस त्या महान खुर्चीवर पुन्हा विराजमान झाले. ही त्यांची जिद्द होतीच. त्यांनी दिवसाढवळ्या शपथ घेतली. राज्य बहुमताचे आहे, पण बहुमत खोटे आहे यासाठी लोक गावागावांत रस्त्यावर उतरले आहेत. न्यायालये, निवडणूक आयोग, ईव्हीएम या त्रिवेणी संगमातून महाराष्ट्रात नवे राज्य आले. तरीही देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन!! विधानसभेचे निकाल लागल्यावर तब्बल बारा दिवसांनीमहाराष्ट्रात नवे सरकार विराजमान झाले आहे. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस पुन्हा आले. फडणवीस मुख्यमंत्री झाले म्हणजे गुजरातचे बाहुले शिंदे उडाले, हा त्याचा सरळ अर्थ. मात्र त्या शिंद्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांचे उपमुख्यमंत्रीपद तर ध्रुव बाळाप्रमाणे अढळ आहे, पण संघर्ष, अपमान, अवहेलना यांचे हलाहल पचवून फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले हे महत्त्वाचे. 

फडणवीसांनी पक्षांतर्गत व बाहेरच्या विरोधकांचा काटा काढला-

आता मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांना रात्री-अपरात्री वेषांतर करून, काळोखात लपून-छपून भेटीगाठी घ्याव्या लागल्या नाहीत. विधानसभेचा कौल भाजप व त्यांच्या मित्रपक्षांच्या बाजूने लागला. पूर्ण बहुमत मिळाले. इतकी 'धो-धो' मते पडून आपण विजयी झालो कसे? हा प्रश्न फडणवीस यांच्यासह समस्त भाजपला पडला. त्याच अचंबित चेहऱ्याने फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. 'शपथविधीच्या सोहळ्यासाठी आझाद मैदानावर चला', अशा जाहिराती वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाल्या. महाराष्ट्राचे दिवाळे वाजत असले तरी शपथ सोहळ्याची दिवाळी साजरी केली गेली. भारतीय जनता पक्षाला 132 जागा मिळाल्या. त्यांचे दोन मित्रपक्ष मिळून सवादोनशेचे पाशवी बहुमत असतानाही बारा दिवसांचा कालावधी सरकार स्थापनेसाठी का लागला? या काळात मावळत्या मुख्यमंत्र्यांचे रुसवे-फुगवे महाराष्ट्राने पाहिले. मीच पुन्हा मुख्यमंत्री होणार व तसे आपल्याला दिल्लीचे वचन आहे हा त्यांचा दावा होता. मी काम केले म्हणून हा विजय भाजपला मिळाल्याचे ते बोलत राहिले. मुख्यमंत्रीपदाशिवाय खाली काहीच घेणार नाही हा त्यांचा हट्ट होता. त्या हट्टाला न जुमानता फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. फडणवीस यांचे सरकार स्थानापन्न होत असताना महाराष्ट्रात आनंदाचे मोठे वातावरण आहे असे दिसत नाही. कारण जनतेला भाजपच्या विजयाचा संशय आहे. हा विजय खरा नाही हे सांगण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. पुन्हा मतदान घ्या, अशी मागणी गावागावांत सुरू आहे. मारकडवाडीसारख्या ठिकाणी लोकांनी मतपत्रिकेवर पुन्हा मतदान घेण्याचा प्रयत्न केला, पण 144 कलम लावून पोलिसी दडपशाहीने तेथे लोकशाहीचा गळा घोटला. मारकडवाडीचे हे लोण राज्यातील गावागावांत पसरत गेले तर कायदा- सुव्यवस्थेचे संकट निर्माण होईल. अशा वेळी नवे मुख्यमंत्री दडपशाही करणार की संयमाने वागणार? हा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस हे जातीयवादी व सुडाने वागणारे आहेत हा त्यांच्यावरचा ठपका ते कसा पुसणार? यंत्रणांचा गैरवापर व त्यातून दहशत निर्माण करून फडणवीस यांनी पक्षांतर्गत व बाहेरच्या विरोधकांचा काटा काढला.

फडणवीस गिधाडांचा बंदोबस्त करण्याची हिंमत दाखवतील काय?

फडणवीस पुन्हा असेच वागणार असतील तर बहुमत कुचकामी ठरेल. बहुमताचा स्वीकार नम्रपणे करावा व महाराष्ट्र हितासाठी ते कारणी लावावे, असे त्यांच्या चाहत्यांना नक्कीच वाटत असेल. राज्यात अनेक प्रश्न थैमान घालीत आहेत. मराठा आरक्षणापासून रोजगारापर्यंत, शेतकऱ्यांच्या आत्महत्येपासून शेतमालास भाव देण्यापर्यंत. भाजपचा विजय झाल्यापासून मुंबईसारख्या शहरात मराठीद्वेष्टे साप वळवळू व फूत्कार सोडू लागले. मुंबईत मराठी माणूस अपमानित करण्याची एकही संधी हे लोक सोडत नाहीत. मराठीस अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचा डंका वाजवला, पण मुंबईत मराठी बोलण्यावर व मराठी जगण्यावर दहशतीची गिधाडे फडफडत आहेत व ही गिधाडे स्वतःला भाजप समर्थक म्हणवून घेत असतील तर मुख्यमंत्री म्हणून फडणवीस या गिधाडांचा बंदोबस्त करण्याची हिंमत दाखवतील काय? हे राज्य मराठी भाषिक आहे व त्यासाठी मराठी माणसाने रक्त सांडले आहे याचे स्मरण नव्या सरकारने ठेवायला हवे. राज्याच्या सर्वोच्च खुर्चीवर बसून देवेंद्र फडणवीस कोणत्या दिशेने जाणार आहेत? लाडक्या बहिणींच्या योजनेमुळे 44 हजार कोटींचा बोजा राज्यावर आहे. 1500 ऐवजी बहिणींना 2100 रुपये देऊ असे या मंडळींनी निवडणूक प्रचारात वचन दिले. त्यामुळे बोजा वाढत जाईल. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचेही वचन आहे. ही वचने पूर्ण करण्यासाठी त्यांना आर्थिक नियोजन व शिस्त लावावी लागेल. मिंधे काळात झालेल्या लुटमारीस पायबंद घालून हे राज्य चोर-दरोडेखोरांच्या हातून सुटले आहे, असा विश्वास जनतेला द्यावा लागेल. मराठा आरक्षणाचे काय करणार? जरांगे नावाचे वादळ फडणवीस यांच्या भोवती घोंघावत आहे. ते शांत झाले नाही तर राज्यात अनेक प्रश्न नव्याने उभे राहतील व सरकार अंतर्गत नवे विरोधक काड्या लावण्याचे काम हौसेने करतील. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसणे म्हणजे आता काटेरी खुर्चीवर विराजमान होण्यासारखेच आहे. देवेंद्र फडणवीस त्या महान खुर्चीवर पुन्हा विराजमान झाले. ही त्यांची जिद्द होतीच. त्यांनी दिवसाढवळ्या शपथ घेतली. राज्य बहुमताचे आहे, पण बहुमत खोटे आहे यासाठी लोक गावागावांत रस्त्यावर उतरले आहेत. न्यायालये, निवडणूक आयोग, ईव्हीएम या त्रिवेणी संगमातून महाराष्ट्रात नवे राज्य आले. तरीही देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन!! 

संबंधित बातमी:

Eknath Shinde : आता मी DCM आहे, डेडीकेटेड टू कॉमन मॅन, 24 बाय 7 काम करणार, देवेंद्रजींना पूर्ण सहकार्य देणार : एकनाथ शिंदे

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ECI : निवडणूक आयोगाच्या पत्रावर भाजपचा शिक्का, विरोधी पक्षांचं जोरदार टीकास्त्र,निवडणूक आयोगाकडून एकाचं निलंबन, नेमकं काय घडलं?
निवडणूक आयोगाच्या पत्रावर भाजपचा शिक्का, विरोधी पक्षांचं जोरदार टीकास्त्र, नेमकं काय घडलं?
Tamil Nadu NDA Seat Sharing : तामिळनाडूत एनडीएचं जागा वाटप ठरलं, भाजप 234 पैकी किती जागा लढवणार? आकडेवारी समोर
तामिळनाडूत एनडीएचं जागा वाटप ठरलं, भाजप 234 पैकी किती जागा लढवणार? आकडेवारी समोर
मोठी बातमी: संतोष देशमुखांच्या मस्साजोगमध्ये नवा कारभारी निवडला जाणार, 28 एप्रिलला सरपंचपदाची पोटनिवडणूक
संतोष देशमुखांच्या मस्साजोगमध्ये नवा कारभारी निवडला जाणार, 28 एप्रिलला सरपंचपदाची पोटनिवडणूक
Satara Zilla Parishad: साताऱ्यात महायुतीत जुंपली, जिल्हा परिषद निवडणुकीचे पडसाद कॅबिनेट बैठकीत उमटणार; भाजप मंत्र्यांबाबत शिवसेना अन् राष्ट्रवादी नाराजी नोंदवणार
साताऱ्यात महायुतीत जुंपली, जिल्हा परिषद निवडणुकीचे पडसाद कॅबिनेट बैठकीत उमटणार; भाजप मंत्र्यांबाबत शिवसेना अन् राष्ट्रवादी नाराजी नोंदवणार

व्हिडीओ

Ashok Kharat Hearing Nashik : अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी, कोर्टाचा मोठा निर्णय
Shweta Mahale vs Sanjay Gaikwad :संजय गायकवाड म्हणाले, कुणाची माय व्याxxx, श्वेता महालेंचं उत्तर
Supriya Sule on Rupali Chakankar : Devendra Fadnavis यांचे आभार, Ashok Kharat प्रकरणी काय म्हणाल्या?
Sunil Tatkare on Kharat : तुमच्यासमोर खरातने पूजा केलीय का? सुनील तटकरेंचं बेधडक उत्तर
Satara ZP | साताऱ्यात करामती, अडचणीत महायुती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अशोकचं तोंड काळ्या कापडानं झाकलं, कोर्टाबाहेर मोठी गर्दी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तृप्ती देसाईंचाही ठिय्या, फोटो
अशोकचं तोंड काळ्या कापडानं झाकलं, कोर्टाबाहेर मोठी गर्दी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तृप्ती देसाईंचाही ठिय्या, फोटो
Ashok Kharat Case Nashik Sessions Court: स्वत:चं बोट बघत उभा राहिला, कोर्ट म्हणालं, काहो बोलायचंय का? अशोक खरात कोर्टात मोजून 5 वाक्ये बोलला!
स्वत:चं बोट बघत उभा राहिला, कोर्ट म्हणालं, काहो बोलायचंय का? अशोक खरात कोर्टात मोजून 5 वाक्ये बोलला!
Ashok Kharat Case : अशोक खरातला आमच्या ताब्यात द्या, कानाखाली वाजवू; तृप्ती देसाई आक्रमक, कोर्टाबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा
अशोक खरातला आमच्या ताब्यात द्या, कानाखाली वाजवू; तृप्ती देसाई आक्रमक, कोर्टाबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा
Narendra Modi : युद्धाचा परिणाम दीर्घ काळापर्यंत राहणार, नरेंद्र मोदींचं राज्यसभेत निवेदन, राज्य सरकारांवर दोन कामं सोपवली
युद्धाचा परिणाम दीर्घ काळापर्यंत राहणार, नरेंद्र मोदींचं राज्यसभेत निवेदन, राज्य सरकारांवर दोन कामं सोपवली
कोकणच्या हापूसवर अस्मानी संकट; यंदा केवळ 20% उत्पादन होणार? हजारो कोटींच्या व्यवसायाला फटका
कोकणच्या हापूसवर अस्मानी संकट; यंदा केवळ 20% उत्पादन होणार? हजारो कोटींच्या व्यवसायाला फटका
साताऱ्यात देवीच्या यात्रेला निघालेल्या पिकअपला अपघात; घाटात जीप पलटी, 1 महिला ठार, 10 भाविक जखमी
साताऱ्यात देवीच्या यात्रेला निघालेल्या पिकअपला अपघात; घाटात जीप पलटी, 1 महिला ठार, 10 भाविक जखमी
Devendra Fadnavis and Supriya Sule: देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोलकरांचा वारसा पुढे नेताहेत, अशोक खरातला पाठीशी घालणार नाहीत: सुप्रिया सुळे
देवेंद्र फडणवीस हे नरेंद्र दाभोलकरांचा वारसा पुढे नेताहेत, अशोक खरातला पाठीशी घालणार नाहीत: सुप्रिया सुळे
लोकसभेला महिला नेत्या अशोक खरातकडे गेल्या, पूजाही केली; ''धक्कादायक निकाल'' लावण्याचं दिलं होतं आश्वासन
लोकसभेला महिला नेत्या अशोक खरातकडे गेल्या, पूजाही केली; ''धक्कादायक निकाल'' लावण्याचं दिलं होतं आश्वासन
Embed widget