एक्स्प्लोर

आम्ही मंत्रालयात पोहोचलो पण 'टिळक भवन'ला विसरलो, काँग्रेस विस्ताराकडे दुर्लक्ष झाल्याची थोरातांची कबुली

केंद्रात दोन टर्म आणि राज्यात तीन टर्म सत्ता मिळालेल्या काँग्रेसचं २०१४नंतर सुरू झालेलं अध:पतन काही थांबायचं नाव घेत नाहीये. देशभरात एकेक राज्य 'काँग्रेस मुक्त' होत असतानाच, महाराष्ट्रात तर काँग्रेस पक्ष 'नेते मुक्त' होऊ लागलाय. याचं मुख्य कारण ठरलं ते पक्षानं वर्षानुवर्ष पोसलेली विशिष्ट नेत्यांची मिरासदारी आणि नेत्यांची दुसरी फळी न घडवणं. 'एबीपी माझा'च्या 'तोंडी परीक्षे'त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही याचीच कबुली दिली.

मुंबई: आम्ही सत्तेत आलो, मंत्रालयात गेलो मात्र 'टिळक भवन'ला विसरलो, या शब्दात काँग्रेसचे नव्यानंच पदभार स्वीकारलेले प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षवाढीसाठी सर्वच नेते कमी पडल्याची कबुली दिली. मात्र, त्याचवेळी राहुल गांधींनंतर पुन्हा एकदा सोनिया गांधींच्या रूपानं 'गांधी'च पक्षाध्यक्ष होण्याचं समर्थनही त्यांनी केलं.  'एबीपी माझा'च्या 'तोंडी परीक्षे'त ते बोलत होते.  'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर आणि अन्य सहकाऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारले. मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा, विखे-पाटलांशी पक्षात असताना आणि नंतर राहिलेला संघर्ष, ईडीच्या चौकशीचा ससेमिरा, उर्मिला मातोंडकरचा पक्षत्याग, भाजपची लाट, नेत्यांचं आऊटगोईंग अशा अनेक विषयांवर थोरात यांनी मनमोकळी उत्तरं दिली. पाच वर्षांपूर्वी कुणाला ईडी माहितीही नव्हतं मात्र, आता सगळीकडे याची चर्चा आहे. सत्ताधाऱ्यांकडून त्याचा शस्त्रासारखा वापर होतोय, असंही थोरात म्हणाले. काँग्रेसमध्ये मुळीच मरगळ नसून, उलट जुने नेते गेल्यानं आता नवीन रक्ताला वाव मिळेल असं म्हणतानाच, यापूर्वीही काँग्रेस संपली असं म्हटलं जात असताना इंदिरा गांधी मोठ्या बहुमतासह निवडून आल्या, याची आठवणही त्यांनी करून दिली. विखेंवरील प्रश्नाला उत्तर देताना, आपल्याला शेजारी निवडता येत नाहीतस, अशी मिश्किल टिपण्णीही त्यांनी केली. वंचित बहुजन आघाडी, मनसे यातील मनसेशी युती करण्याचा कोणताही मनसुबा नव्हता हे स्पष्ट करतानाच, वंचितचे आंबेडकर अशक्य मागण्या करत असल्यानं त्यांच्याशी आघाडी होऊ शकली नाही, हे थोरातांनी स्पष्ट केलं. या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला बहुमत मिळाल्यास मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेणं आवडेल का? या प्रश्नावर थोरातांनी कोणताही आडपडदा न ठेवता राजकारणी असल्यानं महत्वाकांक्षा असतेच, त्यामुळे अशी जबाबदारी आपण स्वीकारू हे मान्य केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
Embed widget