एक्स्प्लोर

आम्ही मंत्रालयात पोहोचलो पण 'टिळक भवन'ला विसरलो, काँग्रेस विस्ताराकडे दुर्लक्ष झाल्याची थोरातांची कबुली

केंद्रात दोन टर्म आणि राज्यात तीन टर्म सत्ता मिळालेल्या काँग्रेसचं २०१४नंतर सुरू झालेलं अध:पतन काही थांबायचं नाव घेत नाहीये. देशभरात एकेक राज्य 'काँग्रेस मुक्त' होत असतानाच, महाराष्ट्रात तर काँग्रेस पक्ष 'नेते मुक्त' होऊ लागलाय. याचं मुख्य कारण ठरलं ते पक्षानं वर्षानुवर्ष पोसलेली विशिष्ट नेत्यांची मिरासदारी आणि नेत्यांची दुसरी फळी न घडवणं. 'एबीपी माझा'च्या 'तोंडी परीक्षे'त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही याचीच कबुली दिली.

मुंबई: आम्ही सत्तेत आलो, मंत्रालयात गेलो मात्र 'टिळक भवन'ला विसरलो, या शब्दात काँग्रेसचे नव्यानंच पदभार स्वीकारलेले प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षवाढीसाठी सर्वच नेते कमी पडल्याची कबुली दिली. मात्र, त्याचवेळी राहुल गांधींनंतर पुन्हा एकदा सोनिया गांधींच्या रूपानं 'गांधी'च पक्षाध्यक्ष होण्याचं समर्थनही त्यांनी केलं.  'एबीपी माझा'च्या 'तोंडी परीक्षे'त ते बोलत होते.  'एबीपी माझा'चे मुख्य संपादक राजीव खांडेकर आणि अन्य सहकाऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारले. मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा, विखे-पाटलांशी पक्षात असताना आणि नंतर राहिलेला संघर्ष, ईडीच्या चौकशीचा ससेमिरा, उर्मिला मातोंडकरचा पक्षत्याग, भाजपची लाट, नेत्यांचं आऊटगोईंग अशा अनेक विषयांवर थोरात यांनी मनमोकळी उत्तरं दिली. पाच वर्षांपूर्वी कुणाला ईडी माहितीही नव्हतं मात्र, आता सगळीकडे याची चर्चा आहे. सत्ताधाऱ्यांकडून त्याचा शस्त्रासारखा वापर होतोय, असंही थोरात म्हणाले. काँग्रेसमध्ये मुळीच मरगळ नसून, उलट जुने नेते गेल्यानं आता नवीन रक्ताला वाव मिळेल असं म्हणतानाच, यापूर्वीही काँग्रेस संपली असं म्हटलं जात असताना इंदिरा गांधी मोठ्या बहुमतासह निवडून आल्या, याची आठवणही त्यांनी करून दिली. विखेंवरील प्रश्नाला उत्तर देताना, आपल्याला शेजारी निवडता येत नाहीतस, अशी मिश्किल टिपण्णीही त्यांनी केली. वंचित बहुजन आघाडी, मनसे यातील मनसेशी युती करण्याचा कोणताही मनसुबा नव्हता हे स्पष्ट करतानाच, वंचितचे आंबेडकर अशक्य मागण्या करत असल्यानं त्यांच्याशी आघाडी होऊ शकली नाही, हे थोरातांनी स्पष्ट केलं. या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला बहुमत मिळाल्यास मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेणं आवडेल का? या प्रश्नावर थोरातांनी कोणताही आडपडदा न ठेवता राजकारणी असल्यानं महत्वाकांक्षा असतेच, त्यामुळे अशी जबाबदारी आपण स्वीकारू हे मान्य केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत महायुतीमधील धुसफूस संपता संपेना! भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार, हाॅटेलवरच्या बैठकीत काय काय ठरलं?
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीमधील धुसफूस संपता संपेना! भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार, हाॅटेलवरच्या बैठकीत काय काय ठरलं?
Gokul Election: गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
पत्नीसह आई वडिलांनीही नाकारलं! भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत, दारुन पराभव झाल्यानं देशभर चर्चा
पत्नीसह आई वडिलांनीही नाकारलं! भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत, दारुन पराभव झाल्यानं देशभर चर्चा

व्हिडीओ

Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report
Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Deepanshu Shokeen : NSUI नं उमेदवारी मागं घ्यायला लावली, अपक्ष लढून अनवाणी फिरत प्रचार केला, अभाविपसह सर्वांच्या उमेदवारांना पराभूत केलं, DUSU चा नवा उपाध्यक्ष दीपांशू शौकीन नेमका कोण?
वडील कंडक्टर आई अंगणवाडी सेविका, DUSU चा उपाध्यक्ष दीपांशू शौकीन ठरला जायंट किलर...
Rahul Gandhi: 'सिस्टीमला विद्यार्थी नकोत अंधभक्त हवेत' राहुल गांधी यांचा इंदूरच्या छात्रों की गूंजमधून हल्लाबोल 
सिस्टीमला विद्यार्थी नकोत अंधभक्त हवेत' राहुल गांधी यांचा इंदूरच्या छात्रों की गूंजमधून हल्लाबोल 
LPG Rule Change : कोट्यवधी LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी, 1 ऑक्टोबरपासून गॅस सिलेंडरचा 'हा' नियम बदलणार, जाणून घ्या
कोट्यवधी LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी, 1 ऑक्टोबरपासून गॅस सिलेंडरचा 'हा' नियम बदलणार, जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
DUSU Election Result : दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला, NSUI चा पराभव, उपाध्यक्षपदी अपक्षानं मारली बाजी 
दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला,उपाध्यक्षपदावर अपक्ष उमेदवाराचा विजय
माजी केंद्रीय मंत्र्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी पंजाब मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अंडी टोमॅटो फेकली; दारुची बाटली दाखवत म्हणाले..
माजी केंद्रीय मंत्र्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी पंजाब मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अंडी टोमॅटो फेकली; दारुची बाटली दाखवत म्हणाले..
Pune Crime News : आधी मामाचा गळा चिरला; नंतर स्वतःही जीवन संपवलं, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत
आधी मामाचा गळा चिरला; नंतर स्वतःही जीवन संपवलं, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत
Varun Sardesai : आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्यांकडे एकजरी पुरावा असेल तर दाखवावा, मग बोलावं, वरुण सरदेसाईंनी सर्व आरोप फेटाळले
आदित्य ठाकरे सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियनला भेटले नव्हते, ओळखत नव्हते : वरुण सरदेसाई
Embed widget