एक्स्प्लोर

....म्हणून नगरमध्ये कोणाचाच प्रचार करणार नाही : राधाकृष्ण विखे पाटील

सुजय विखे पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

मुंबई : "शरद पवार यांनी माझ्या वडिलांबद्दल जे मत व्यक्त केलं, त्यामुळे मी प्रचाराला जाणार नाही. मी नगरमध्ये कोणाचाच प्रचार करणार नाही," असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलं. याचाच अर्थ विखे पाटील सुजय यांच्याविरोधातही प्रचार करणार नाहीत. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर येऊन भूमिका मांडली. सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणार अशीही चर्चा रंगली होती. परंतु आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी सुजय विखे यांचा भाजप प्रवेश, शरद पवार यांच्याबद्दल नाराजी याबद्दल भाष्य केलं. म्हणून नगरच्या जागेची मागणी "औरंगाबाद आणि अहमदनगरच्या जागेच्या बाबतीत समन्वय साधण्याचा प्रयत्न होता. राज्यात जास्तीत जास्त जागा निवडून याव्यात त्यासाठी नगरच्या जागेची मागणी केली होती. राष्ट्रवादीनेही काही जागा बदलून मागितल्या होत्या. 2004, 2009 आणि 2014 मध्ये राष्ट्रवादी पक्ष नगरच्या जागेवर हरला आहे. ती जागा आम्ही जिंकू शकतो," असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. नगरमध्ये कोणाचाच प्रचार करणार नाही "पवारसाहेबांनी माझे वडील बाळाकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे दु:ख झालं. माझे वडील हयात नाहीत. त्यामुळे ज्येष्ठ नेत्याने टिप्पणी करावी, हे दुर्दैवी गोष्ट आहे. शरद पवारांच्या मनात विखेंबद्दल अजूनही द्वेष आहे. त्यांच्या वक्तव्याने वेदना झाल्या, अशा शब्दात विखे पाटील यांनी खेद व्यक्त केला. तसंच शरद पवारांनी माझ्या वडिलांबद्दल जे मत व्यक्त केलं, त्यामुळे मी प्रचार करणार नाही. मी गेलो तर पुन्हा संशय घेतील. त्यामुळे मी नगरमध्ये कोणाचाच प्रचार करणार नाही," असं विखे यांनी जाहीर केलं. सुजयचा निर्णय वैयक्तिक "मुलासाठी संघर्ष उभा राहिला असं म्हणणं चुकीचं आहे. सुजयने त्याचा निर्णय घेतला. तो वैयक्तिक होता. विरोधी पक्षनेता म्हणून माझी जबाबदारी होती, गालबोट लागेल असं विधान माझ्याकडून होणार नाही, याची मी काळजी घेतली. आघाडी धर्म पाळला. आता पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल," असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. थोरात हायकमांडपेक्षा मोठे आहेत का? काँग्रेसने विखे कुटुंबाला खूप काही दिलं आहे. त्यांच्या सगळ्या अपेक्षा पक्षाने पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे विखेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली होती. त्यावर मला जे सांगायचं आहे ते हायकमांडला सांगेन. बाळासाहेब थोरात हायकमांडपेक्षा मोठे आहेत का? मी त्यांना सांगण्यास बांधील नाही. बाळासाहेब थोरात यांच्याकडे कपबशी, नारळ, रोलर कुठून आले हे मला माहित आहे. त्यांनी मला पक्ष निष्ठा सांगू नये," असं उत्तर राधाकृष्ण विखे पाटील दिलं. राधाकृष्ण विखे पाटील यांची पत्रकार परिषद :

महत्त्वाच्या बातम्या

Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
Embed widget