एक्स्प्लोर

Amit Thackeray: तुम्हाला लाज वाटली पाहिजे, 365 दिवस उपलब्ध असूनही...; सदा सरवणकरांवर अमित ठाकरेंचा घणाघात

Amit Thackeray Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

Amit Thackeray Mahim Vidhan Sabha मुंबई: मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघ गेल्या काही दिवासांपासून कायम चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे माहीममधून मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. माहीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. यामध्ये मनसेकडून अमित ठाकरे, शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर आणि शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत यांच्यात लढत होणार आहे. अमित ठाकरे, महेश सावंत आणि सदा सरवणकर यांच्याकडून सध्या जोरदार प्रचार सुरु आहे. याचदरम्यान अमित ठाकरेंनी मावळते आमदार आणि शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांच्यावर निशाणा साधला आहे. 

माझ्याविरोधात जे विरोधी उमेदवार आहेत, त्यांच्या प्रचारामधील महत्वाचा मुद्दा नळाला पाणी देणे हा आहे. आता 2024 मध्ये जर नळाला पाणी देऊ हा प्रचाराचा मुद्दा असेल तर तुम्हाला कुठेतरी लाज वाटली पाहिजे, याचा अर्थ कोणालातरी मागची पाच वर्ष पाणी मिळालं नाही असा होतो. मी कोळी बांधवांच्या वसाहतीत गेल्यावर तिथे समजलं की, त्यांना पाणी नसल्यामुळे दिवाळीची पहिली आंघोळ पण करता नाही आली, यापेक्षा अजून लज्जास्पद काय असू शकेल?, असा सवाल अमित ठाकरेंनी बीबीसी मराठीशी बोलताना उपस्थित केला.

तुम्ही 365 दिवस लोकांच्या संपर्कात राहून नक्की काय केलं?- अमित ठाकरेंचा सवाल

मावळते आमदार 365 दिवस लोकांसाठी उपलब्ध होते, तरीसुद्धा जर अशी परिस्थिती असेल तर त्यांना लाज वाटली पाहिजे. शिवाजी पार्क मैदानाची परिस्थिती बघा, समुद्र किनाऱ्याची परिस्थिती बघा...हे सर्व जाऊदेत पण जर कोणाच्या नळाला पाणी येत नसेल तर तुम्ही 365 दिवस लोकांच्या संपर्कात राहून नक्की काय केलं?, असा सवाल अमित ठाकरेंनी उपस्थित केला. मी निवडून आल्यावर माहीम प्रभादेवी आणि दादर अशा तीन ठिकाणी शाखा उघडणार आहे, जिथे त्या विभागातले लोक मला येऊन भेटू शकतात. माझी उपलब्धता ही कायम असणार आहे. हे सर्व बोलण्यापेक्षा मी निवडून आल्यावर नक्कीच सिद्ध करून दाखवेन, असं अमित ठाकरेंनी सांगितले. 

मी प्रामाणिकपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरलोय- अमित ठाकरे

सदा सरवणकर यांनी निवडणुकीतून माघार घेतलेली नाही. त्यामुळे तुम्ही आता माहीमधील तिरंगी लढतीकडे कसे पाहता?, असा प्रश्न अमित ठाकरेंना विचारण्यात आला. यावर ते समोर असते-नसते, तरी मी निवडणूक माझ्या पद्धतीनेच लढवली असती. मी लोकांमध्ये गेलोच असतो. मी प्रामाणिकपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. मला मतदान करायचं की नाही हे लोकांच्या हातात आहे, तर जिंकणार की नाही, हे देवाच्या हातात आहे, असं अमित ठाकरेंनी सांगितले. तसेच मला अजिबात आव्हान वाटत नाही, असंही अमित ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले. 

संबंधित बातमी: 

Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget