एक्स्प्लोर

अमळनेर विधानसभा मतदारसंघ | दरवेळी वेगळा आमदार देण्याची परंपरा

या ठिकाणी गिरीश महाजन यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. येथील भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांमधील वाद सोडविण्यासाठी गिरीश महाजन यांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहे. तेव्हाच भाजपच्या उमेदवाराचा विजय शक्य होईल, असे येथील राजकीय विश्लेषक सांगतात.

जळगाव जिल्ह्यात अमळनेर हा एक ऐतिहासिक तालुका आहे. येथे साने गुरुजी यांचे वास्तव्य राहिलेले आहे. संत सखाराम महाराज यांची पावन भूमी आहे. जुने मंगळग्रह मंदिर आहे. विप्रोसारख्या कंपनी असतानाही हा मतदारसंघ विकासासाठी आसुसलेला आहे. सामाजिक चळवळीदेखील याठिकाणी आहेत. येथील मतदार राजा हा कुणा एका पक्षाचा दिसून येत नाही. नवा उमेदवार याठिकाणी निवडून येत आहे. याठिकाणी गेल्या 10 वर्षात सर्व प्रमुख पक्षांना मागे टाकून अपक्ष उमेदवार निवडून येत असून त्यांनी सत्ताधारी पक्षाचे सहयोगी आमदार म्हणून राहणे पसंत केलेले आहे. 2009 साली आयत्या वेळी उमेदवारी दाखल करीत अपक्ष आमदार साहेबराव पाटील यांनी विजय संपादन केला होता. तर मागील 2014 साली विधानसभा मतदारसंघात शिरीष चौधरी हे अपक्ष उमेदवार निवडून आले होते. शिरीष चौधरी हे तालुक्याबाहेरील असूनही मतदारांनी त्यांना निवडून दिले आहे. ते भाजपचे सहयोगी आमदार आहेत. दरवेळी वेगळा उमेदवार निवडून देण्याची परंपरा या मतदारसंघात आहेत. यावेळी अपक्ष आमदार म्हणून शिरीष चौधरी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून त्यांच्या बाजूने वोटबँक मजबूत करण्यासाठी ते वर्षभरापासून प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अनिल भाईदास पाटील हे पुन्हा रिंगणात उतरण्याची तयारी करीत असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे सक्षम पर्याय आजतरी नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसची येथे स्थिती मध्यम आहे. कार्यकर्ते आहेत मात्र संघटन करण्यासाठी सक्षम नेतृत्व नाही. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला निवडून येण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागणार आहे. हे ही वाचा - धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ | काँग्रेसपुढे बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचं आव्हान भाजपाकडे या ठिकाणी विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ, त्यांचे पती उदय वाघ, तसेच माजी आमदार बी.एस.पाटील, भिकेश पाटील असे चेहरे भाजपात विधानसभेसाठी इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीतील सभेवेळी अमळनेरात गिरीश महाजन, गुलाबराव पाटील या मंत्र्यांच्या समोरच उदय वाघ यांनी बी.एस.पाटील यांना केलेली मारहाण संपूर्ण जिल्ह्याने पाहिली आहे. त्यामुळे भाजपवर हाणामारीचा हा कलंक लागला आहे. याठिकाणी बी.एस.पाटील आणि उदय वाघ यांच्यातील वाद पाहता नवीन उमेदवार देण्यासाठी भाजपा प्रयत्न करेल अशी चिन्हे आहेत. या शिवाय भाजपात गेलेले माजी अपक्ष आमदार साहेबराव पाटील हेदेखील उमेदवारीच्या रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत. पाडळसरे धरणाचा प्रकल्प संजीवनी देणारा आहे. तो प्रकल्प पूर्ण करण्याची गरज सत्ताधारी पक्षाची आहे. निधीच्या कमतरतेमुळे या धरणाचे काम अपूर्णावस्थेत आहे. या ठिकाणी गिरीश महाजन यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. येथील भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांमधील वाद सोडविण्यासाठी गिरीश महाजन यांना विशेष प्रयत्न करावे लागणार आहे. तेव्हाच भाजपच्या उमेदवाराचा  विजय शक्य होईल, असे येथील राजकीय विश्लेषक सांगतात. एकनाथराव खडसे यांचा या मतदारसंघावर विशेष प्रभाव नाही. हे ही वाचा -जळगाव शहर मतदारसंघ | युतीचं वाढतं वर्चस्व, तर सुरेश जैन यांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई कॉंग्रेस पक्षाकडे अॅड.ललिता पाटील, त्यांचे पती शाम पाटील आणि चिरंजीव तथा युवक अध्यक्ष पराग पाटील असे तिघेही उमेदवारीसाठी पर्याय आहेत. कॉंग्रेस पक्षाचे या ठिकाणी विशेष संघटन नाही. संघटन तयार करण्यासाठी नेत्यांना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. भाजप केंद्र आणि राज्यातील कामकाजाच्या बळावर मते मागण्याची शक्यता असून भाजपच्या विरोधातील मुद्दे उचलून राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस तसेच अपक्ष आमदार रिंगणात उतरतील असे चित्र दिसत आहे. मागील विधानसभेतील चित्र शिरीष चौधरी (अपक्ष) – ६८,१४९ अनिल भाईदास पाटील (भाजपा) – ४६,९१० साहेबराव पाटील (राष्ट्रवादी ) – ४३, ६६२ शिरीष चौधरी २१,२३९ मताधिक्याने विजयी. - जाणून घ्या या मतदारसंघाविषयी  
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Silver News:  सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Embed widget