एक्स्प्लोर

Palghar News : पालघरमधील वांद्री धरणात बुडून मुंबईच्या दोन तरुणांचा मृत्यू; होळीच्या दिवशी गमावले प्राण

Palghar News : पालघरमधील वांद्री धरणात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला असल्याची दुर्देवी घटना घडली. दोन्ही तरूण मुंबईतील होते.

Palghar News : पालघर तालुक्यातील गांजे ढेकाळे ग्रामपंचायत हद्दीतील वांद्री धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील दोन तरुणांचा वांद्री धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. होळीच्या निमित्ताने सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वांद्री दोघेही धरण परिसरात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. धरणाच्या पाण्यात पोहत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाल्याने दोघांचा मृत्यू झाला. स्वप्निल विजय मस्के (वय 27) आणि अजय पांडुरंग साळवे (वय 26) अशी मयत तरुणांची नावे असून दोघेही मुंबईचे रहिवासी होते. धुळवडीच्या दिवशी पाण्यात बुडून तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना राज्यात इतरत्रही घडली. त्यामुळे सणाला गालबोट लागले. 

मुंबईच्या मालाड आणि कांदिवली भागातील मालवणी परिसरातील स्वप्नील म्हस्के आणि अजय साळवे मंगळवारी दुपारी मुंबई वरून मुंबई अहमदाबाद महामार्गालगतच्या ढेकाळे ग्रामपंचायत हद्दीतील वांद्री धरण परिसरात पर्यटनाच्या निमित्ताने आले होते. धरण परिसरात फिरत असताना वांद्री धरणाच्या पाण्यात पोहण्याचा मोह त्यांना आवरला नाही. त्यामुळे दोघेही पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते. पाण्यात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला.

दोघेही बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. मंगळवारी सायंकाळी उशिरा एक मृतदेह हाती लागला होता. मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गांजे गावच्या ग्रामस्थांनी एकत्र येत धरणाच्या पाण्यात उतरून बुडालेला मृतदेह शोधून काढला. पंचनामा करून दोन्ही मृतदेह मनोर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मनोर ग्रामीण रुग्णालयात हे मृतदेह पाठवण्यात आले.

उमरोळीमध्येदेखील एकाचा मृत्यू

गुजरातमधील अहमदाबाद येथील होळीच्या सुट्टी निमित्त पालघर मधील उमरोळी येथे आलेल्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रदीप बलदेव सिंग परमार अस 25 वर्षीय तरुणाचे नाव असून तो उमरोळीतील पारसनाथ येथे एका नातेवाईकाकडे होळी सण साजरा करण्यासाठी आला होता. मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या प्रदीप सिंग परमार याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला असून स्थानिक पोलिसांनी अग्निशमन दलाला त्याचा मृतदेह शोधण्यात यश आला आहे. 

मावळमध्ये एकाचा मृत्यू

मावळमध्ये धुळवड खेळून रंग धुण्यासाठी गेलेल्या एकाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना मंगळवारी घडली. जयदीप पाटील असं मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे. सात ते आठ जणांचा ग्रुप धुळवड खेळून झाल्यानंतर रंग धुण्यासाठी मावळ मधील वराळे गावामधील इंद्रायणी नदी परिसरात गेले होते. त्यावेळी मयत जयदीप आणि त्याचे काही मित्र रंग धुण्यासाठी पाण्यात उतरेल असता नदीच्या खोलीचा अंदाज न आल्याने जयदीप पाटील यांचा नदीत बुडून मृत्यू झाला. वराळेमधील डॉ डी.वाय. पाटील महाविद्यालयात हे सर्व विद्यार्थी शिक्षण घेत होते तर मयत विद्यार्थी जयदीप पाटील हा मूळचा जळगाव जिल्ह्यातील तारखेड गावातील रहिवासी आहे. 

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: दीड वर्षांचा असताना वडिलांचा मृत्यू; मारेकरी जामिनावर बाहेर येताच मुलगा सूडाने पेटला, कात्रज बोगद्यात 28 वार करुन खेळ संपवला, पोलिसांनी सांगितली ए टू झेड स्टोरी
दीड वर्षांचा असताना वडिलांचा मृत्यू; मारेकरी जामिनावर बाहेर येताच मुलगा सूडाने पेटला, कात्रज बोगद्यात 28 वार करुन खेळ संपवला, पोलिसांनी सांगितली ए टू झेड स्टोरी
Pune Crime News: पुण्यात प्रियकरानेच अश्लील व्हिडीओ काढून गर्लफ्रेंडला ब्लॅकमेल केलं, मित्रांसोबतही नको ते करायला लावलं
पुण्यात प्रियकरानेच अश्लील व्हिडीओ काढून गर्लफ्रेंडला ब्लॅकमेल केलं, मित्रांसोबतही नको ते करायला लावलं
Mumbai Crime News: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
Nashik Crime News: आईला वाचवायला गेला अन् चिमुकल्याचाही जीव गेला; नंतर पतीनेही उचललं टोकाचं पाऊल, नाशिकमधील 'त्या' घटनेचं धक्कादायक कारण समोर
आईला वाचवायला गेला अन् चिमुकल्याचाही जीव गेला; नंतर पतीनेही उचललं टोकाचं पाऊल, नाशिकमधील 'त्या' घटनेचं धक्कादायक कारण समोर

व्हिडीओ

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Update: पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
Sharad Pawar : एकीकडे राहुल गांधींनी मोंदींना निवासस्थानी घेरलं, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शरद पवार मैदानात, थेट जंतम मंतर गाठलं आणि...
एकीकडे राहुल गांधींनी मोंदींना निवासस्थानी घेरलं, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शरद पवार मैदानात, थेट जंतम मंतर गाठलं आणि...
Sonam Wangchuk: मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
Maharashtra Weather Update: मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
CJP Protest in Mumbai : CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
Narendra Modi : CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
Mumbai Crime News: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
Raj Thackeray on Delhi LathiCharge: दिल्लीत पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं, पंतप्रधान मोदींबाबत महत्त्वाची टिप्पणी
दिल्लीत पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं, पंतप्रधान मोदींबाबत महत्त्वाची टिप्पणी
Embed widget