एक्स्प्लोर

अनैतिक संबधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला, दिल्लीतील गुंडांना 30 लाखांची सुपारी देऊन संपवलं

Ambernath Crime : अनैतिक संबधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने दिल्लीहून मारेकरी बोलावले आणि पतीची हत्या केली. अंबरनाथमध्ये ही घटना घडली.

ठाणे: अनैतिक संबधात अडसर ठरलेल्या पतीची पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने दिल्लीच्या गुंडाना तीस लाखांची सुपारी देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना अंबरनाथ पश्चिम भागातील अंबरनाथ-बदलापूर मार्गावरील (Ambernath Crime) एका ढाब्यासमोर घडली होती. 

याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी मुख्य आरोपी पत्नीसह तिचा प्रियकर आणि  सुपारी घेऊन हत्या करणारे दोन मारेकरी गुंडाना  पोलिसांनी अटक केली आहे. यातील तीन आरोपी हे दिल्लीत राहणारे असून सुपारी घेऊन हत्या करणारा एक आरोपी अल्पवयीन असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

मुलाने तक्रार केली

पती मृतक रमेश झा हे मूळचे दिल्लीचे असून ते अंबरनाथ एमआयडीसीमधील एका कंपनीत कामगार म्हणून काम करीत होते. ते अंबरनाथ पश्चिम भागातील सर्वेदयनगर परिसरात आरोपी पत्नी सुमनदेवीसह दोन मुलांसह राहत होते. 25 फेब्रुवारी रोजी रात्री साडे नऊ वाजल्याच्या सुमारास त्यांची अंबरनाथ पश्चिम भागातील अंबरनाथ-बदलापूर मार्गावरील एका ढाब्यासमोर भर रस्त्यात कोणीतरी अज्ञात मारेकऱ्यांनी चाकूने भोसकून हत्या केल्याची तक्रार मृतकाच्या  24 वर्षीय मुलाने अंबरनाथ पोलीस ठाण्यात दिली.

सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा माग

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी समांतर तपास सुरू केला असता, घटनास्थळावरून दोन इसम पळून जात असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असता, दोन्ही मारेकरी रिक्षात बसून दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये जाताना दिसले. त्यातच पोलिसांना तांत्रिक माहिती आणि बातमीदाराकडून माहिती मिळाली की, आरोपी दिल्लीला पळून गेले. पोलिसांनी तातडीने दिल्ली गाठत आरोपीना दिल्ली रेल्वे स्टेशनवर ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता, हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला. 

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडे सखोल चौकशी केली असता,  मृतक रमेश झा यांचा 25 वर्षांपूर्वी आरोपी पत्नी हिच्याशी विवाह होऊन दोन मुलं आहेत. त्यातच गेल्या दहा वर्षापासून आरोपी पत्नी मुलांसह दिल्लीत राहत असताना तिचे  धर्मवीर गुप्ता नावाच्या व्यक्तीशी प्रेमसंबंधातून  अनैतिक संबध प्रस्थापित झाल्याचे पोलीस तपासात समोर आले.

दिल्लीतील आरोपींना हत्येची सुपारी दिली 

त्यानंतर 2022 साली आरोपी पत्नी  दिल्लीतील प्रियकराला सोडून अंबरनाथ शहरात नवऱ्याकडे राहण्यास आली. मात्र मृतक नवरा अनैतिक संबधात अडसर ठरत असल्याचं आरोपी बायकोने तिच्या प्रियकराला सांगितले. त्यामुळे दोघांनी नवऱ्याची हत्या करण्याचा कट रचून दिल्लीतील दोन गुंडांना हत्येची सुपारी दिली. त्यानुसार मृतक नवऱ्यावर मारेकऱ्यांनी दोन ते तीन दिवस पाळत ठेवली होती. विशेष म्हणजे दिल्लीतून आलेले तिन्ही आरोपी अंबरनाथ  शहरातील एका लॉजवर मुक्कामाला असल्याचे पोलीस तपासात समोर आले. 

दरम्यान, पोलिसांनी आरोपी पत्नीचा  प्रियकर धर्मवीर गुप्ताने दिल्लीतील अटक दोन गुंडांना हत्येची सुपारी देताना काही रोख रक्कम तसेच जमिनीचे आमिष दिले होते अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली. 

आरोपी पत्नी, तिचा प्रियकर आणि एक सुपारी घेऊन हत्या करणाऱ्या अशा तिन्ही आरोपीना 5 मार्च पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी भिवंडीतील बालसुधार गृहात करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास अंबरनाथ पोलीस करीत असल्याची माहितीही वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे. 

ही बातमी वाचा: 



अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget