एक्स्प्लोर

जपानच्या कंपनीवर आता मराठी माणसाचा झेंडा, शार्प इंडिया कंपनीत स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीची 75 टक्के मालकी

पुण्यातील स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीनं जपानच्या शार्प इंडिया कंपनीची मालकी मिळवली आहे. या कंपनीत स्मार्ट सर्व्हिसेची मालकी 75 टक्के असेल.

मुंबई : 1990 च्या दशकात भारतामध्ये जपानच्या शार्प टीव्हीचा एक वेगळा दबदबा होता. जपानी गुणवत्तेच्या चांगल्या पिक्चर क्वालिटीमुळे शार्प टीव्हीला भरपूर मागणी होती. पण नंतरच्या स्पर्धेच्या काळात ही कंपनी मागे पडली. जपानची ही शार्प इंडिया कंपनी आता मराठी माणसाने ताब्यात घेतलीय. पुण्याच्या चंद्रकांत गायकवाड यांच्या स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीने काल जपानमध्ये शार्प कंपनीसोबत शेअर ॲग्रीमेंट करार केला आणि 75 टक्के शेअर्स विकत घेतले. ज्यामुळे आता पुणेस्थित असलेल्या या जपानच्या कंपनीवर मराठी माणसाची मालकी असणार आहे. सध्या या कंपनीत 80 कर्मचारी काम करत असून या कर्मचाऱ्यांची जबाबदारीही स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीने घेतली आहे. स्मार्ट सर्व्हिसेस कंपनी ही हाऊस किपिंग, मॅन पॅावर सप्लायसह विविध क्षेत्रात कार्यरत आहे. या कंपनीची वार्षिक उलाढाल दीड हजार कोटी रुपयांची आहे.

शार्प कंपनीवर ताबा मिळवल्याने स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीचा विस्तार वाढला असून येत्या काळात सेमीकंडक्टर निर्माण करण्याच्या क्षेत्रातही कंपनी पाऊल टाकणार आहे. तसंच शार्प कंपनीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू पुन्हा एकदा प्रत्येक भारतीयांपर्यंत नेण्याचा प्रयत्न कंपनीचा असणार आहे. 

कोण आहेत चंद्रकांत गायकवाड?

फॅसिलिटी मॅनेजमेंट आणि मॅन पॅावर सप्लाय क्षेत्रातील एक विश्वासार्ह नाव. दीड हजार कोटी रूपयांचा टर्नओव्हर असलेल्या स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीचे ते सर्वेसर्वा….महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागांमध्ये सुमारे 40 हजारांहून अधिक कंत्राटी कर्मचारी त्यांच्या याच कंपनीमार्फत सेवा बजावतात. केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादीत न राहता राजस्थान, मध्य प्रदेश,उत्तर प्रदेश, तेलंगणा, दिल्लीसह इतर 10 राज्यांतही त्यांच्या कंपनीचा विस्तार झाला आहे. त्यांची ही  सध्याची प्रगती नजरेत भरणारी असली तरी इथपर्यंतचा त्यांचा प्रवास मात्र संघर्षाने भरलेला आहे.

पुण्यात एका सामान्य कुटुंबातील त्यांचा जन्म …वडिल एका शाळेत शिपाई, आई गृहिणी आणि हे चार भावंडे…घरची आर्थिक स्थिती तशी बेताची असल्याने दहावीनंतरचे शिक्षण त्यांना पार्ट टाईम काम करतच पूर्ण करावे लागले. ॲाफिस बॅाय, असिस्टंट अशी पडेल ती कामं तेव्हा करावी लागली. परंतु शिकण्याची जिद्द असल्याने त्यांनी कायद्याची पदवी पूर्ण करत 2003 ला स्वतःची प्रॅक्टीस सुरू केली आणि 2005 ला कन्सल्टन्सी फर्म सुरू केले.

एका मराठी उद्योजकाकडून प्रेरणा घेत 2009 मध्ये त्यांनी ब्रिस्क कंपनी सुरू करत फॅसिलिटी मॅनेजमेंट क्षेत्रात पाऊल टाकले.विविध महापालिका आणि राज्य सरकारच्या विविध विभागांत कामे सुरू असली तरी 2021-22 पर्यंत कंपनीची वार्षिक उलाढाल शंभर सव्वाशे कोटीपर्यंतच होती. यानंतर मात्र कंपनीने फॅसिलिटी मॅनेजमेंट बरोबरच मॅन पॅावर सप्लाय, मेडिकल इक्विपमेंट सप्लाय सारख्या क्षेत्रात काम करत व्यवसायाच्या कक्षा रूंदावल्या. दरम्यानच्या काळात ब्रिस्क कंपनीचे नामांतर स्मार्ट सर्व्हिसेस असं करण्यात आले.चंद्रकांत गायकवाड यांनी बॅंकिंग क्षेत्रातही पाऊल टाकले असून जयोस्तुते कॅपिटल ही एनबीएफसी त्यांनी सुरू केलीय.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Price Today: ग्राहकांसाठी खुशखबर! सोने-चांदीच्या दरात आजही मोठी घसरण, चांदी तब्बल 12 हजारांनी स्वस्त; पाहा आजचे ताजे दर
ग्राहकांसाठी खुशखबर! सोने-चांदीच्या दरात आजही मोठी घसरण, चांदी तब्बल 12 हजारांनी स्वस्त; पाहा आजचे ताजे दर
Petrol Tax : पेट्रोल निर्यातीवर विंडफॉल टॅक्स, डिझेल आणि एटीएफवरील शुल्कात कपात; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
पेट्रोल निर्यातीवर विंडफॉल टॅक्स, डिझेल आणि एटीएफवरील शुल्कात कपात; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Ladki Bahin Yojana : गुड न्यूज, लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन दिवसात 3000 रुपये जमा, एप्रिलच्या हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात
लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन दिवसात 3000 रुपये जमा, एप्रिलच्या हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात
2014 पासून आत्तापर्यंत देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात नेमकी किती झाली वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 
2014 पासून आत्तापर्यंत देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात नेमकी किती झाली वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Sharad Pawar NCP : तटकरेंसोबत प्रफुल पटेलांनीही घेतली होती शरद पवारांची भेट
Manoj Jarange : 29 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर 30 मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
Embed widget