एक्स्प्लोर

एसआयपी करताना फक्त 'ही' चार सूत्रं पाळा, मालामाल व्हा; मिळवा दुप्पट, चौपट परतावा!

एसआयपी करताना हे चार सूत्र पाळले तर गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू शकतो. त्यांनी गुंतवलेले पैसे थेट दुप्पट, चौपट होऊ शकतात. एसआयपी करताना शिस्त पाळणे फार गरजेचे आहे.

मुंबई : सध्याच्या काळात म्यूच्यूअल फंड (Mutual Fund) हा गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय आहे. एसआयपीच्या माध्यमातून म्यूच्यूअल फंडमध्ये आपल्या सोईनुसार गुंतवणूक करता येते. एसआयपीच्या माध्यमातून दीर्घ काळासाठी गुंतवणूक केल्यास तुम्ही जमा केलेल्या पैशांतून चांगला परतावा मिळू शकतो. विशेष म्हणजे एसआयपीमध्ये चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो. त्यामुळे गुंतवलेल्या पैशांचे मुल्य वाढते. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मतानुसार एसआयपी (SIP) केल्यास तुम्ही गुंतवलेल्या पैशांवर साधारण 12 टक्के रिटर्न्स मिळतात. या रिटर्न्सचे प्रमाण हे कधीकधी 15 टक्क्यांपर्यंत जाते. सध्या कोणतीही शसकीय गुंतवणूक योजना एवढ्या मोठ्या प्रमाणात रिटर्न्स देत नाही. मात्र एसआयपी करताना काही काळजी घेणेदेखील गरजेचे आहे. एसआयपीच्या माध्यमातून पैशांची गुंतवणूक करताना खालील चार गोष्टींची काळजी घेतल्यास, तुमचे पैसे दुप्पट, तिप्पट, चारपटही होऊ शकतात.  

दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करा 

एसआयपीच्या माध्यमातून तुम्हाला चांगले पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला एसआयपीच्या माध्यमातून दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणे गरजेचे आहे. ही गुंतवणूक 15, 20, 25 वर्षे किंवा यापेक्षा अधिक काळासाठी केल्यास तुम्ही जमा केलेल्या रकमेचे मूल्य अधिक वाढेल. महिन्याला कमी रक्कम गुंतवूनदेखील तुम्ही कोट्यधीश होऊ शकता. पण त्यासाठी तुम्हाला ही गुंतवणूक दीर्घ मुदतीसाठी करावी लागेल. 

गुंतवणुकीसाठी शिस्त पाळा

तुम्हाला गुंतवणुकीच्या माध्यमातून पैसे कमवायचे असतील तर शिस्त पाळणए गरजेचे आहे. तुम्ही एकदा गुंतवणूक चालू केल्यास, काहीही झाले तरी ती मध्येच थांबवू नये. दीर्घ मुदतीच्या एसआयपीवरही महिन्याला गुंतवणूक चालूच ठेवावी. काही लोक आपत्कालीन स्थितीत मध्येच पैसे काढतात. पण तसे करणे योग्य नाही. तुम्ही कमी रकमेसह पैशांची गुंतवणूक केली तरी हरकत नाही, पण ती प्रत्येक महिन्याला, शिस्तबद्ध पद्धतीने, खंड न पडू देता करणे गरजेचे आहे. 

मोठ्या रकमेची एसआयपी चालू करू नका 

तुम्ही दीर्घ मुदतीसाठी एसआयपी करत असाल तर महिन्याला मोठी रक्कम गुंतवू नका.  एसआयपीसाठी तुम्ही मोठी रक्कम गुंतवत असाल तर कठीण काळात ही रक्कम भरणे कठीण होऊन बसते आणि एसआयपी बंद होते. परिणामी एसआयपीतून मिळणारा परतावा हा मिळत नाही. तुम्ही कितीही एसआयपी चालू करू शकता. एसआयपीच्या संख्येवर कोणतेही बंधन नाही. त्यामुळे जास्त पैशांनी एसआयपी चालू करू शकतो, असे तुम्हाला वाटत असेल तर त्या वेळी नवी एसआयपी चालू करावी.  

टॉप अप एसआयपी करा 

एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही एक मोठा फंड तयार करू सकते. मात्र एसआयपी करताना तुम्हाला आणखी परतावा हवा असेल तर टॉप अप एसआयपीचा पर्याय निवडायला हवा. म्हणजेच तुम्ही करत असलेल्या एसआयपीमध्ये प्रत्येक वर्षाला थोडी-थोडी वाढ करायला हवी.  तुम्ही तुमच्या एसआयपीवर प्रत्येक वर्षाला 10 किंवा 5 टक्क्यांनी वाढ करत असाल तर तुम्हाला भविष्यात जबरदस्त फायदा होऊ शकतो. तुम्ही गुंतवलेला पैसा लवकरच दुप्पट, चौपट होऊ शकतो. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेही वाचा :

SBI चे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर सावधान, 'हा' नवा नियम जाणून घ्या; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान!

सोने खरेदी करताना काय काळजी घ्यावी? अन्यथा होऊ शकते फसवणूक

भारतीय केशरला सोन्याचा दर, 1 किलोसाठी तब्बल 4.95 लाख रुपये, दर वाढण्याचं कारण काय? 

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK : ठरलं... भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
Udayanraje Bhonsle :  उमेदवारी ज्यांना मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये, भविष्यात चांगली संधी देऊ, उदयनराजे भोसलेंची नाराजांना साद
अमोल मोहितेंसाठी उदयनराजे- शिवेंद्रराजेंची संयुक्त पत्रकार परिषद, नाराजांच्या उमेदवारीबाबत म्हणाले...
Uddhav Thackeray : शिवसेनेचा जन्म संघर्षासाठी, आम्हाला मुंबई जिंकायची आहे आणि जिंकणारचं, ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा
2014 ला आत्मनिर्भर भारत होईल असं वाटलेलं, अजून भाजप आत्मनिर्भर झाला नाही,उद्धव ठाकरेंची टीका
पालघर प्रकरणात चौधरीचा समावेश नसेल तर फडणवीस अन् भाजपनं त्याची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागावी : उद्धव ठाकरे
... तर भाजप आणि फडणवीसांनी शिवसेनेची आणि हिंदूंची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ambadas Danve :संजय राऊतांचा ब्रेक, दानवेंकडे माईक; राऊतांऐवजी सरकारवर दानवे कडाडणार Special Report
Nawab Malik : मलिक 'कॅप्टन' महायुतीत टशन; राष्ट्रवादीचे लाडके, भाजपचे दोडके Special Report
Sangli Shaurya Death : मारकुट्या शिक्षिका, शौर्यची शोकांतिका Special Report
Chikhaldara Nagarparishad : बिनविरोध मामेभाऊ, निशाण्यावर देवाभाऊ Special Report
Shahaji Bapu:निराशेचे 'डोंगर', आरोपांची 'झाडी', शहाजी बापूंचा मुख्यमंत्र्यांवर संताप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK : ठरलं... भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
Udayanraje Bhonsle :  उमेदवारी ज्यांना मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये, भविष्यात चांगली संधी देऊ, उदयनराजे भोसलेंची नाराजांना साद
अमोल मोहितेंसाठी उदयनराजे- शिवेंद्रराजेंची संयुक्त पत्रकार परिषद, नाराजांच्या उमेदवारीबाबत म्हणाले...
Uddhav Thackeray : शिवसेनेचा जन्म संघर्षासाठी, आम्हाला मुंबई जिंकायची आहे आणि जिंकणारचं, ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा
2014 ला आत्मनिर्भर भारत होईल असं वाटलेलं, अजून भाजप आत्मनिर्भर झाला नाही,उद्धव ठाकरेंची टीका
पालघर प्रकरणात चौधरीचा समावेश नसेल तर फडणवीस अन् भाजपनं त्याची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागावी : उद्धव ठाकरे
... तर भाजप आणि फडणवीसांनी शिवसेनेची आणि हिंदूंची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
Tamhini Accident: ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला करत एकाची हत्या, जालना शहर हादरलं 
धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला करत एकाची हत्या, जालना शहर हादरलं 
डोंगराळेतील पीडित कुटुंबीयांची भेट, जरांगे पाटील संतापले; म्हणाले, सरकारने फाशीपेक्षा एन्काऊंटर केला पाहिजे
डोंगराळेतील पीडित कुटुंबीयांची भेट, जरांगे पाटील संतापले; म्हणाले, सरकारने फाशीपेक्षा एन्काऊंटर केला पाहिजे
Embed widget