एक्स्प्लोर

Reliance : मुकेश अंबांनी यांचे वारसदार ठरले, 18 लाख कोटी रुपयांच्या रिलायन्स उद्योग समूहाचे विभाजन तिघांत होणार 

Mukesh Ambani : रिलायन्सचे विभाजन हे मुकेश अंबानी यांच्या तीन मुलांमध्ये होणार असून प्रत्येकाकडे कोणती जबाबदारी असेल याचा रोडमॅप तयार करण्यात आला आहे. 

मुंबई: देशातल्या सर्वात मोठा उद्योग समूह असलेल्या रिलायन्सचे (Reliance) वारसदार कोण असतील याचे अप्रत्यक्ष संकेत मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी दिले आहेत. गेल्या 45 वर्षांपासून मुकेश अंबानी हे रिलायन्स उद्योग समूहाशी संबंधित आहेत, तर या ग्रुपचे ते दोन दशकांहून जास्त काळ प्रमुख राहिले आहेत. आता याच रिलायन्सचे तीन वारसदार असतील असं अप्रत्यक्षपणे सूचवलं आहे. 

धीरुभाई अंबानींनी 2005 साली रिलायन्स ग्रुपमधील कंपन्यांचं विभाजन मुकेश अनिल अंबानी यांच्यात केलं. यानंतर अनिल अंबानी यांच्याकडील कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या. पण तेच मुकेश अंबानी यांनी जिओसारख्या नव्या कंपन्यांची स्थापना केली, ती वाढवली देखील. आता रिलायन्स ग्रुपच्या महत्त्वाच्या कंपन्यांची कमान आता युवा नेतृत्त्वाकडे असणार आहे. आकाश अंबानी यांच्याकडे जिओची जबाबदारी, ईशा अंबानी यांच्याकडे रिलायन्स रिटेलची तर अनंत अंबानी यांच्याकडे रिलायन्स एनर्जीची जबाबदारी असणार आहे. 

अंबानी यांचा सर्वात लहान मुलगा अनंत यांच्याकडे रिलायन्स एनर्जीची जबाबदारी आहे. या कंपनीमध्ये येत्या काही वर्षांमध्ये 75 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी हे रिलायन्स जिओच्या चेअरमनपदावरुन पायउतार झाले असून त्यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी यांच्याकडे ती जबाबदारी देण्यात आली आहे. 

रिलायन्सच्या 45 व्या बैठकीला संबोधित करताना मुकेश अंबानी म्हणाले की, "आमची पुढची पीढी अत्यंत आत्मविश्वासपूर्व व्यवसायात उतरत आहे. आकाश आणि इशा हे या आधीच जिओ आणि रिटेलमध्ये काम सुरू केलं आहे. तर अंनंत आता आमच्या उर्जा व्यवसायात आत्मविश्वासाने उतरला आहे. तो त्याचा बहुतांश वेळ हा जामनगरच्या प्रकल्पाच्या कामामध्ये घालवतो. रिलायन्सच्या संस्थापकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे तीघेही झोकून देऊन काम करतील."

तीनही मुलांचं शिक्षण परदेशात 

आकाश अंबानी यांचं शिक्षण धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालं. त्यानंतर अमेरिकेच्या ब्राऊन युनिवर्सिटीतून त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. तर ईशा अंबानी यांचं येल आणि स्टेनफोर्ड युनिव्हर्सिटीतून शिक्षण पुर्ण झालं. ईशा अंबानी यांनी 2015 साली व्यवसायात पदार्पण केलं. सुरुवातीला त्या जिओ प्लॅटफॉर्म्स, जियो लिमिटेड, रिलायन्स रिटेल वेंचरच्या बोर्डावर होत्या. 2018 साली त्यांचा अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांच्यासोबत विवाह झाला. 

मुकेश अंबानी यांचा सर्वात लहान मुलगा अनंत अंबानी यांचं अमेरिकेतील ब्राऊन युनिवर्सिटीतून शिक्षण पूर्ण झालं. नंतर त्यांनी व्यवसायात उडी घेतली. रिलायन्स न्यू एनर्जी, रिलायन्स न्यू सोलार आणि जिओ प्लॅटफॉर्मवर सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 

रिलायन्स ग्रुपचे तब्बल 500 हून अधिक ब्रँड्स आहेत. धिरुभाई अंबानींनी सुरु केलेल्या रिलायन्स या एका कंपनीचा आता रिलायन्स समूह झाला आहे. त्यात आता नवे युवा शिलेदार रिलायन्सची ही कमान कशी संभाळणार असल्याचं स्पष्ट झालंय. आता त्यांच्या कारकीर्दीत रिलायन्स समुहाची वाटचाल कशी असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget