एक्स्प्लोर

Internet Cable Owner : सागरी इंटरनेट केबल्समुळं संपूर्ण जग जोडलं जातं, ऑप्टिकल फायबर केबल्सची मालकी कुणाकडे? उत्तर जाणून बसेल आश्चर्याचा धक्का

Under Sea Internet Cable : जगातील वेगवेगळ्या देशांना इंटरनेटनं जोडण्यासाठी सर्वात मजबूत आणि विश्वासार्ह पद्धत समुद्राच्या तळाशी असलेल्या ऑप्टिकल फायबर केबल्स आहे. 

नवी दिल्ली : सध्या इंटरनेट सुरु असणं ही प्रत्येकाची गज बनली आहे. सोशल मिडिया, व्हिडिओ कॉल, ऑनलाईन शॉपिंग, यूट्यूब, ऑफिसचं काम इंटरनेटवर अवलंबून असते. मात्र, तुम्ही कधी विचार केला आहे का इंटरनेट कुठून येतं. अनेक लोकांना इंटरनेट आकाशातून म्हणजेच सॅटेलाईट किंवा मोबाईल टॉवर द्वारे येतं असं वाटतं. मात्र, जगातील 99 टक्के इंटरनेट समुद्राच्या तळाशी असलेल्या ऑप्टिकल फायबर केबलच्या माध्यमातून येतं. म्हणजेच इंटरनेट आकाशातून नव्हे तर समुद्राच्या तळाशी असलेल्या केबलमधून येतं. 

जगातील विविध देशांना इंटरनेटद्वारे जोडण्याचा मजतूब आणि विश्वासार्ह मार्ग म्हणजे समुद्राच्या तळाशी असलेल्या ऑप्टिकल फायबर केबल हा आहे. या केबल हजारो किलोमीटर लांबीच्या असतात. ज्या समुद्राच्या तळाशी टाकलेल्या असतात. यापद्धतीनं जगातील एका भागातून दुसऱ्या भागात इंटरनेटद्वारे डेटा पाठवला जातो आणि स्वीकारला जातो. इंटरनेटच्या समुद्राच्या तळाशी असलेल्या केबलचं मालक कोण असतं जाणून घेऊयात

इंटरनेट केबल्सचा इतिहास (Internet Cables History)

इंटरनेट केबल्सची सुरुवात 1830 च्या दशकात झाली होती. जेव्हा टेलिग्राफची सुरुवात झाली होती. त्यावेळी संदेशवहनासाठी तारसेवा वापरली जायची.  त्यानंतर 1858 मध्ये अमेरिकेचे उद्योजक सॉयरस वेस्टफील्ड यांनी अटलांटिक महासागराच्या तळाशी पहिली टेलिग्राफ केबल टाकली.ज्याद्वारे अमेरिका आणि ब्रिटन जोडले गेले. ही केबल फार दिवस चालली नाही, मात्र ती सुरुवात होती. 1866 मध्ये पहिली स्थायी अंडर सी केबल यशस्वीपणे टाकण्यात आली. ज्यानंतर समुद्राच्या तळाशी टेलिग्राफ आणि इंटरनेट केबल्स टाकण्यात आल्या. 

सध्या जगाला जोडणाऱ्या 14 लाख किलोमीटर लांबीच्या अंडर सी केबल्स आहेत. जगातील 99 टक्के इंटरनेट त्या केबल्समधून येतं. भारतात बहुतांश इंटरनेट सागरी केबल्स मधून येतं. जवळपास 95 टक्के  इंटरनॅनशल डेटा ऑप्टिक फायबर केबल्स द्वारे देशात येतो. भारतात एकूण 17 इंटरनेट केबल्स येतात ज्या 14 सागरी स्टेशन्स सोबत जोडलेल्या आहेत. ही स्टेशन प्रामुख्यानं मुंबई, चेन्नई , कोचीन, तूतीकोरिन, त्रिवेंद्रम मध्ये आहेत. या ठिकाणी समुद्राच्या तळातून केबल्स येतात. तिथून देशाच्या विविध भागात इंटरनेट पोहोचवलं जातं. 

समुद्राच्या तळाशी असलेल्या इंटरनेट केबलची मालकी कुणाकडे? 

इंटरनेट समुद्राच्या तळाशी असलेल्या हजारो किलोमीटर लांबीच्या फायबर ऑप्टिक केबलच्या माध्यमातून पोहोचतं. समुद्राच्या तळाशी असलेल्या फायबर ऑप्टिक केबलची मालकी सरकारकडे नसते. म्हणजेच भारत सरकार किंवा अमेरिका सरकारकडे मालकी नसते. ऑप्टिक फायबर केबलची मालकी खासगी टेलिकॉम किंवा तंत्रज्ञान कंपन्या असतात. ज्यांच्याकडे आवश्यक पैसे, तंत्रज्ञान आणि संसाधनं असतात,त्याद्वारे ते समुद्राच्या तळाशी असलेल्या केबल्सची देखभाल करतात, त्याचा वापर करुन इंटरनेट डेटा जगभरात पाठवतात. भारतात ज्या कंपन्या अंडरसी केबल्स टाकण्याचं आणि चालवण्याचं काम करतात त्या देशातील इंटरनेट कनेक्शनचा आधार आहेत. या कंपन्यांमध्ये टाटा कम्युनिकेशन्स, रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, सिफी टेक्नोलॉजीज आणि बीएसएनलचा समावेश आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Municipal Election 2026: नाशिकच्या प्रभाग 8 मध्ये जादूटोणा? हळद, कुंकू, तांदूळ आढळल्याने खळबळ, शिवसेनेच्या विलास शिंदेंचा विरोधकांवर गंभीर आरोप
नाशिकच्या प्रभाग 8 मध्ये जादूटोणा? हळद, कुंकू, तांदूळ आढळल्याने खळबळ, शिवसेनेच्या विलास शिंदेंचा विरोधकांवर गंभीर आरोप
Gold Rate Weekly Update : आठवड्यात सोनं स्वस्त झालं की महाग, चांदी दरातील तेजी सुरुच, जाणून घ्या बाजारात काय घडलं?
आठवड्यात सोनं स्वस्त झालं की महाग, चांदी दरातील तेजी सुरुच, जाणून घ्या बाजारात काय घडलं?
इरई नदीपात्रात 3 वर्षीय वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; वन विभाग आले, पोस्टमार्टमसाठी पाठवले
इरई नदीपात्रात 3 वर्षीय वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; वन विभाग आले, पोस्टमार्टमसाठी पाठवले
श्रेय चोरणारी टोळी सक्रीय झाली, त्यांचं मराठीवरचं प्रेम 'पुतना मावशीचं' आहे, त्यांचा वचननामा म्हणजे फक्त टोमणेनामा, घोटाळेनामा; ठाकरे बंधूंना उद्देशून एकनाथ शिंदे काय काय म्हणाले?
श्रेय चोरणारी टोळी सक्रीय झाली, त्यांचं मराठीवरचं प्रेम 'पुतना मावशीचं' आहे, त्यांचा वचननामा म्हणजे फक्त टोमणेनामा, घोटाळेनामा; ठाकरे बंधूंना उद्देशून एकनाथ शिंदे काय काय म्हणाले?

व्हिडीओ

Rupali Thombare Pune:Ajit Pawar यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या Mahesh Landgeयांच्यावर ठोंबरे संतापल्या
Sanjay Raut Mumbai: फडणवीसांना आव्हान, 11 लाखांचं बक्षीस; ठाकरें बंधूंच्या सभेआधी संजय राऊत काय काय म्हणाले?
Eknath Shinde Majha Katta :मुंबई,श्रेयवाद,ठाकरे बंधू ते महायुती! एकनाथ शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Municipal Election 2026: नाशिकच्या प्रभाग 8 मध्ये जादूटोणा? हळद, कुंकू, तांदूळ आढळल्याने खळबळ, शिवसेनेच्या विलास शिंदेंचा विरोधकांवर गंभीर आरोप
नाशिकच्या प्रभाग 8 मध्ये जादूटोणा? हळद, कुंकू, तांदूळ आढळल्याने खळबळ, शिवसेनेच्या विलास शिंदेंचा विरोधकांवर गंभीर आरोप
Gold Rate Weekly Update : आठवड्यात सोनं स्वस्त झालं की महाग, चांदी दरातील तेजी सुरुच, जाणून घ्या बाजारात काय घडलं?
आठवड्यात सोनं स्वस्त झालं की महाग, चांदी दरातील तेजी सुरुच, जाणून घ्या बाजारात काय घडलं?
इरई नदीपात्रात 3 वर्षीय वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; वन विभाग आले, पोस्टमार्टमसाठी पाठवले
इरई नदीपात्रात 3 वर्षीय वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; वन विभाग आले, पोस्टमार्टमसाठी पाठवले
श्रेय चोरणारी टोळी सक्रीय झाली, त्यांचं मराठीवरचं प्रेम 'पुतना मावशीचं' आहे, त्यांचा वचननामा म्हणजे फक्त टोमणेनामा, घोटाळेनामा; ठाकरे बंधूंना उद्देशून एकनाथ शिंदे काय काय म्हणाले?
श्रेय चोरणारी टोळी सक्रीय झाली, त्यांचं मराठीवरचं प्रेम 'पुतना मावशीचं' आहे, त्यांचा वचननामा म्हणजे फक्त टोमणेनामा, घोटाळेनामा; ठाकरे बंधूंना उद्देशून एकनाथ शिंदे काय काय म्हणाले?
राज ठाकरे म्हणाले मुंबई विमानतळ बंद करुन जागा विकायचा केंद्राचा डाव; प्रकाश महाजनांचं उत्तर अन् टीका
राज ठाकरे म्हणाले मुंबई विमानतळ बंद करुन जागा विकायचा केंद्राचा डाव; प्रकाश महाजनांचं उत्तर अन् टीका
'प्रभास की जय ' म्हणत चित्रपटगृहात फिरवल्या मगरी.. ; प्रेक्षकांही घाबरले, चाहत्यांचा एकच धुमाकूळ; Video व्हायरल
'प्रभास की जय ' म्हणत चित्रपटगृहात फिरवल्या मगरी.. ; प्रेक्षकांही घाबरले, चाहत्यांचा एकच धुमाकूळ; Video व्हायरल
दोन महिने हिंदू मुस्लीम करून जुमलानामा जाहीर केला, पण भाजपच्या 2017 च्या जाहीरनाम्यातील पूरमुक्त मुंबई, 11 लाख घरे, आणि छत्रपती शिवराय, बाबासाहेबांच्या स्मारकांचं काय झाले? काँग्रेसचा हल्लाबोल
दोन महिने हिंदू मुस्लीम करून जुमलानामा जाहीर केला, पण भाजपच्या 2017 च्या जाहीरनाम्यातील पूरमुक्त मुंबई, 11 लाख घरे, आणि छत्रपती शिवराय, बाबासाहेबांच्या स्मारकांचं काय झाले? काँग्रेसचा हल्लाबोल
BMC Election 2026 Mahayuti Manifesto: पाच वर्षांसाठी पाणीपट्टी वाढीला स्थगिती ते लाडक्या बहिणींना बेस्टमध्ये 50 टक्के सवलत; महायुतीकडून मुंबईकरांसाठी घोषणांचा पाऊस
पाच वर्षांसाठी पाणीपट्टी वाढीला स्थगिती ते लाडक्या बहिणींना बेस्टमध्ये 50 टक्के सवलत; महायुतीकडून मुंबईकरांसाठी घोषणांचा पाऊस
Embed widget