एक्स्प्लोर

भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत CRISIL चा नवा अंदाज, 2031 पर्यंत  GDP मध्ये किती होणार वाढ?

CRISIL Report : भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत ( Indian Economy) वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जातायेत. क्रेडिट रेटिंग एजन्सी क्रिसिलने (CRISIL) देखील अर्थव्यवस्थेबाबत अंदाज व्यक्त केला आहे.

CRISIL Report : भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत ( Indian Economy) वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जातायेत. क्रेडिट रेटिंग एजन्सी क्रिसिलने (CRISIL) देखील अर्थव्यवस्थेबाबत अंदाज व्यक्त केला आहे. क्रिसिलने भारताच्या अर्थव्यवस्थेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. 2024 ते 2031 पर्यंत भारताचा GDP 6.7 टक्के दराने वाढण्याचा अंदाज CRISIL ने व्यक्त केला आहे.

क्रेडिट रेटिंग एजन्सी क्रिसिलने (CRISIL)  भारताच्या अर्थव्यवस्थेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. CRISIL च्या अलीकडील अहवालात असा अंदाज आहे की 2024 ते 2031 पर्यंत भारताचा GDP 6.7 टक्के दराने वाढेल. येत्या काही वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग संतुलित राहील, असे क्रिसिलने म्हटले आहे. सरकारकडून मिळणाऱ्या भांडवली पाठिंब्यामुळे अर्थव्यवस्था गतिमान राहील.

पुढील  वर्षात GDP 6.4 टक्के राहील

क्रिसिलने आपल्या अहवालात पुढील आर्थिक वर्षात भारताचा जीडीपीचा विकास दर 6.4  टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. भारताचा जीडीपी स्थिरतेकडून वाढीकडे जात आहे. सध्या 2031 पर्यंत यावर कोणताही विपरीत परिणाम होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज क्रिसिलने आपल्या अहवालात व्यक्त केला आहे. CRISIL च्या मते, सरकारची आर्थिक धोरणे GDP ची वाढ सुनिश्चित करत आहेत. याशिवाय खासगी क्षेत्राचेही यामध्ये पूर्ण सहकार्य मिळत आहे. सरकारने भांडवली खर्चाला चालना दिली आहे. याशिवाय राज्यांना बिनव्याजी कर्ज देऊन सरकार गुंतवणुकीला चालना देत आहे. 

चालू आर्थिक वर्षात आर्थिक विकास दर 7.3 टक्के असूनही, क्रिसिलने पुढील आर्थिक वर्षात जीडीपी 6.4 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षांचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. याचा ऊर्जा क्षेत्रावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचं क्रिसिलने म्हटले आहे. याशिवाय शिपिंग खर्च वाढल्यामुळं आयात-निर्यात महाग होऊ शकते. याचा अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होणार आहे. डिसेंबर 2023 मध्ये भारतातील चलनवाढीचा दर 5.7 टक्के होता. देशात भाजीपाला आणि अन्नधान्याच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. खाद्यपदार्थांमध्ये येणारी ही महागाई लक्षात घेण्यासारखी असल्याचं क्रिसिलने म्हटलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) महागाई दर 4 टक्के ठेवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पण, खाद्यपदार्थांच्या किमतींवर नियंत्रण ठेवले नाही तर हे लक्ष्य गाठणे फार कठीण होऊ शकते. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती देखील कमी होऊ शकतात असा अंदाज क्रिसिलने व्यक्त केला आहे. 

क्रिसिलची स्थापना 1987 

क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ऑफ इंडिया (CRISIL) ही SEBI नोंदणीकृत क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे. ही भारताची पहिली रेटिंग एजन्सी आहे. क्रिसिलची स्थापना 1987 मध्ये झाली आहे.

महत्वाच्या बातम्या:

IREDA Multibagger Share : सरकारच्या निर्णयामुळे गुंतवणूकदारांची चांदी! 'या' निर्णयामुळे IREDA चे शेअर्स दोन महिन्यांत 32 रुपयांवरून 195 रुपयांवर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
IND vs PAK : पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, नामिबियाच्या फलंदाजांनी धुलाई केल्यानं सुनील गावस्कर नाराज,  'या' खेळाडूचं नाव सूचवलं 
पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, सुनील गावस्कर यांचा सूर्यकुमार यादवला सल्ला, कोणाचं नाव सूचवलं?
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार

व्हिडीओ

Amol Mitkari On Ajit Pawar 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने अजित पवारांना अमोल मिटकरांचं भावनिक पत्र
Sunil Tatkare PC : विलिनीकरणासंदर्भात प्रस्ताव आल्यावर पक्षांतर्गत चर्चा करु, तटकरेंची भूमिका
NCP Merger : विलिनीकरणाचा फायदा, तोटा कुणाला? राष्ट्रवादींची गणितं कधी सुटणार?
Sanjay Raut PC : ज्यांनी शेण खाल्ले त्यांना जाब विचारला जाईल,चंद्रपूर महापौर प्रकरणावर राऊतांचा संताप
Shashikant Shinde NCP Merger :दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर अजितदादांकडेच नेतृत्व देणार होतो

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
IND vs PAK : पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, नामिबियाच्या फलंदाजांनी धुलाई केल्यानं सुनील गावस्कर नाराज,  'या' खेळाडूचं नाव सूचवलं 
पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, सुनील गावस्कर यांचा सूर्यकुमार यादवला सल्ला, कोणाचं नाव सूचवलं?
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची 15 दिवसात निवड; सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार?
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची 15 दिवसात निवड; सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
AUS vs ZIM : टी 20 वर्ल्ड कपमध्ये झिम्बॉब्वेविरुद्ध लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन ट्रेविस हेडनं पराभवाचं खापर कशावर फोडलं? 
ऑस्ट्रेलियावर टी 20 वर्ल्ड कपबाहेर जाण्याचं संकट, झिम्बॉब्वेविरुद्ध पराभव, ट्रेविस हेड म्हणाला, 2023 ला असंच घडलेलं....
'मुंबईच्या महापौरांचे लक्ष सध्या फक्त बांगलादेशींवर, केंद्रात गेली दहा वर्ष भाजप सरकार मग देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, अनेक भाजपशासित राज्यांतून बांगलादेशी कसे पोहोचले?'
'मुंबईच्या महापौरांचे लक्ष सध्या फक्त बांगलादेशींवर, केंद्रात गेली दहा वर्ष भाजप सरकार मग देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, अनेक भाजपशासित राज्यांतून बांगलादेशी कसे पोहोचले?'
Embed widget