एक्स्प्लोर

देशाचं चित्र बदलणार! 1337 किमीचा रेल्वे कॉरिडॉर अर्थव्यवस्थेला देणार नवसंजीवनी

भारताचं (India) चित्र बदलणारा प्रकल्प मोदी सरकारनं पूर्ण केला आहे. केवळ एक रेल्वे कॉरिडॉर (Railway corridor)  देशाच्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळणार आहे.

India Economy : देशाच्या विकासासंदर्भातील अनेक कामं मोदी सरकारकडून (Modi Govt) सुरु आहेत. अशातच आता भारताचं (India) चित्र बदलणारा प्रकल्प मोदी सरकारनं पूर्ण केला आहे. केवळ एक रेल्वे कॉरिडॉर (Railway corridor)  देशाच्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळणार आहे. तसेच देशात अनेक नवीन घडामोडी यामुळं घडणार आहेत. यामुळं अनेक शहरं निर्माण होतील, उद्योगधंदे विकसित होतील आणि लोकांसाठी रोजगारही निर्माण होईल. जाणून घेऊयात या कॉरिडॉरबद्दल सविस्तर माहिती. 

देशात अनेक नवीन द्रुतगती मार्ग आणि आर्थिक क्षेत्रे तयार करण्यात आली आहेत. आता भारतात असा 1 हजार 337 किमीचा कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे. जो देशाचा चेहरामोहराच बदलणार नाही तर आर्थिक विकासाचा वेगही अनेक पटींनी वाढवेल. एवढेच नाही तर या कॉरिडॉरमुळे देशात नवीन औद्योगिक हब तयार होतील, नवीन शहरे निर्माण होतील आणि लोकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर' (DFC) हा देशातील दोन प्रमुख बंदर शहरे मुंबई आणि कोलकाता यांना दिल्ली-पंजाब सारख्या क्षेत्रांशी जोडणार आहे. याचाच एक भाग, पूर्व डीएफसी म्हणजेच पश्चिम बंगाल ते पंजाब असा स्पेशल गुड्स ट्रेन रेल्वे कॉरिडॉर आता कार्यरत आहे. गेल्या महिन्यातच त्याच्या एका विभागावर चाचणी घेण्यात आली होती, त्यानंतर हा 1337 किमीचा कॉरिडॉर कार्यान्वित झाला आहे.

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (DFC) म्हणजे काय?

सध्या देशात एकाच रेल्वे मार्गावर प्रवासी आणि मालगाड्या दोन्ही धावतात. सध्या, देशात, मालगाड्या थांबवल्या जातात आणि प्रवाशांना वेळेवर पोहोचवण्याची खात्री करण्यासाठी प्रथम प्रवासी गाड्या पास केल्या जातात. त्यामुळं मालगाड्या वेळेवर माल घेऊन पोहोचू शकत नाहीत. त्यामुळं कंपन्या आणि खरेदीदार ट्रकमधून माल भरण्यास प्राधान्य देतात. आता सरकारनं ही अडचण दूर करण्यासाठी समांतर  मालवाहतूक कॉरिडॉर तयार केले आहेत. स्वतंत्र ट्रॅक उभारले असून यावरुन फक्त मालगाड्या धावणार आहेत. यासंदर्भातील वेळापत्रकही तयार करण्यात आलं आहे. रेल्वेने माल वाहतूक करणं रस्त्याच्या तुलनेत नक्कीच स्वस्त आहे. कारण ते डिझेलऐवजी विजेवर चालते. तसेच, ट्रकच्या तुलनेत, मालगाडी एका वेळी जास्त माल लोड करु शकते.

समांतर फ्रेट कॉरिडॉरचे फायदे

सध्या देशात फक्त पूर्व डीएफसी पूर्ण झाले आहे. जेव्हा मुंबई ते नोएडा पश्चिम डीएफसी तयार होईल, तेव्हा ते देशाच्या अर्थव्यवस्थेला खऱ्या अर्थाने भरभराट देईल. परंतु पूर्व डीएफसी देखील कमी फायदेशीर नाही. देशाच्या विजेच्या गरजा भागवण्यासाठी याचा खूप उपयोग होणार आहे. याचे कारण म्हणजे या कॉरिडॉरचा मोठा भाग भारताच्या 'कोल झोन'मधून जातो. यामुळं पूर्वेकडील राज्यांतील कोळसा खाणींपासून उत्तरेकडील राज्यांतील वीज प्रकल्पांपर्यंत कोळसा वाहून नेणं स्वस्त आणि सोपे होईल. तसेच इतर अनेक फायदे होतील. जागतिक बँकेच्या अहवालानुसार यामुळं देशाचा लॉजिस्टिक खर्च कमी होईल. सध्या ते देशाच्या GDP च्या 13 ते 15 टक्के इतके आहे, जे DFC मुळे 8 टक्क्यांपर्यंत कमी होईल.

शहरातील रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होईल

जर आपण पूर्व DFC आणि रस्त्याद्वारे मालवाहतूक लोडिंगची तुलना केली, तर पूर्व DFC रस्त्यापासून प्रति किलोमीटर 72 ट्रक कमी करेल. त्यामुळे महामार्ग आणि शहरातील रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होईल. जर पूर्व डीएफसी ट्रक कमी करेल, तर ते निश्चितपणे वायू प्रदूषण आणि भारतातील कार्बन उत्सर्जन कमी करेल. यामुळं भारताचा पेट्रोलियम वापर कमी होण्यास मदत होईल, ज्यापैकी बहुतेक आयातीतून येतात. पूर्व ईडीएफसी ज्या भागातून जाईल आणि तिची स्टेशन केंद्रे जिथे विकसित होतील, त्या भागात नवीन औद्योगिक केंद्र विकसित केले जातील.

महत्त्वाच्या बातम्या:

Nagpur : देशातील पहिले फोर लेव्हल वाहतूक कॉरिडॉर नागपुरात, पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन; काय आहेत वैशिष्ट्ये

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Visit Ajit Pawar Home : सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या मातोश्रीची भेटUddhav Thackeray Speech | खुर्चीवरून शिंदेंवर टीका, आरक्षणासाठी मनोज जरांगे, हाकेंना केलं आवाहनMCA Stadium : एमसीए उभारणार ठाण्यामध्ये भव्य स्टेडियम, सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षाManoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
Embed widget