एक्स्प्लोर

सरकारच्या प्रमुख पेन्शन योजनांना लोकांचा पाठिंबा, पाहा कोणची योजना हीट आणि कोणती फ्लॉप 

Govt Pension Schemes : केंद्र सरकार असंघटित क्षेत्रात काम करणारे छोटे व्यापारी, छोटे शेतकरी आणि अल्प उत्पन्न गटांसाठी 3 विशेष पेन्शन योजना राबवत आहे.

Govt Pension Schemes : अल्प उत्पन्न गटातील लोकांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकार काही विशेष योजना राबवत आहे. केंद्र सरकार असंघटित क्षेत्रात काम करणारे छोटे व्यापारी, छोटे शेतकरी आणि अल्प उत्पन्न गटांसाठी 3 विशेष पेन्शन योजना राबवत आहे. या योजनेंतर्गत या श्रेणीतील लोकांना नाममात्र योगदानानंतर वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 3,000 रुपये किंवा वार्षिक 36,000 रुपये पेन्शन मिळू शकते. छोट्या शेतकर्‍यांसाठी पीएम किसान मानधन, छोट्या उद्योजकांसाठी आणि स्वयंरोजगारासाठी राष्ट्रीय पेन्शन योजना आणि असंघटित क्षेत्रात काम करणार्‍यांसाठी पीएम श्रम योगी मानधन योजना यांचा समावेश आहे. यापैकी कोणती योजना लोकप्रिय आहे आणि कोणत्या योजनला फारसा प्रतिसाद मिळाला नाही हे जाणून घेऊया.

पीएम श्रम योगी मानधन
नोंदणी: 49913912 (HIT)

पीएम श्रम योगी मानधन योजना छोट्या कामगारांना समोर ठेवून सुरु करण्यात आली होती आणि ती खूप लोकप्रिय ठरली आहे. 12 सप्टेंबर 2019 रोजी लॉन्च झाल्यापासून आतापर्यंत 4,99,13,912 लोक या सरकारी पेन्शन योजनेत सामील झाले आहेत. यामध्येही पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या जास्त आहे. यामध्ये आतापर्यंत 22,13,487 महिलांनी नोंदणी केली आहे. हे 26 ते 35 वर्षे वयोगटातील लोकांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. हरियाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये या योजनेशी सर्वाधिक लोक जोडलेले आहेत.

योजनेत सहभागी होण्यासाठी विशेष अट

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी आहे, ज्यामध्ये रोजंदारी मजुरांपासून ते मोलकरीण, चालक, इलेक्ट्रिशियन आणि सफाई कामगार किंवा अशा सर्व कामगारांपर्यंत सर्व कामगारांना लाभ मिळेल. यात मुख्य गोष्ट म्हणजे त्यांचे मासिक उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे.

प्रधानमंत्री किसान मानधन योजना
नोंदणी: 1925588 (सेमी HIT)

प्रधानमंत्री किसान मानधन ही योजना लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना मासिक पेन्शन देण्यासाठी आहे, ज्यामध्ये 60 वर्षांनंतर 3 हजार रुपये म्हणजेच 36 हजार वार्षिक पेन्शन दरमहा दिली जाते. साधारणपणे १८ ते ४० वयोगटातील कोणताही शेतकरी यामध्ये नोंदणी करू शकतो. सप्टेंबर 2019 मध्ये लॉन्च झाल्यापासून आतापर्यंत 19,25,588 लोक या योजनेत सामील झाले आहेत. यामध्ये पुरुषांची संख्या 11,86,744 आहे, तर महिलांची संख्या 7,22,799 आहे. 26 ते 35 वर्षे वयोगटातील शेतकऱ्यांमध्ये ही योजना अधिक लोकप्रिय आहे. 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेले शेतकरीच या योजनेत सहभागी होऊ शकतात.

व्यापारी आणि स्वयंरोजगारासाठी राष्ट्रीय पेन्शन योजना
नोंदणी: ५१८७१ (सरासरी)

सप्टेंबर 2019 मध्येच मोदी सरकारने देशातील छोट्या व्यावसायिकांना त्यांच्या वृद्धापकाळात मासिक पेन्शन देण्याची घोषणा केली होती. या योजनेचे नाव आधी प्रधानमंत्री लघु व्यापारी मानधन योजना असे होते. जे आता व्यापारी आणि स्वयंरोजगारांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेत बदलण्यात आले आहे. आतापर्यंत केवळ 51,871 लोक या योजनेत सामील झाले आहेत. लहान व्यावसायिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याचा हा एक उपक्रम आहे, ज्याअंतर्गत त्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर 3000 रुपये मासिक पेन्शन मिळेल.

पेन्शनसाठी पात्रता

योजनेत सामील होणारी व्यक्ती किरकोळ व्यापारी किंवा दुकान मालक किंवा स्वयंरोजगार असलेली असावी. ग्राहकाचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे. ग्राहकांचे वार्षिक उत्पन्न 1.5 कोटींपेक्षा कमी असावे. ईपीएफ/एनपीएस/ईएसआयसी सदस्य असल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही. PM-SYM च्या लाभार्थ्यांना देखील हा लाभ मिळणार नाही. तुम्ही आयकर जमा केल्यास तुम्ही या योजनेत सहभागी होऊ शकत नाही.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget